शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

साळाव-रेवदंडा खाडीपुलाचा कठडा तुटला

By admin | Updated: August 18, 2015 02:59 IST

रायगड जिल्ह्यातील साळाव-रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड व रोहा हे तीन तालुके जवळ आलेत. परंतु पुलाचा कठडा तुटल्याने व खड्डे पडल्यामुळे

बोर्ली-मांडला : रायगड जिल्ह्यातील साळाव-रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड व रोहा हे तीन तालुके जवळ आलेत. परंतु पुलाचा कठडा तुटल्याने व खड्डे पडल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली असून येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या तिन्ही तालुक्यांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. साळाव - रेवदंडा पुलाचे काम १९८६ साली करण्यात आले होते. त्यामुळे अलिबाग, रोहा आणि मुरु ड हे तीन तालुके जवळ आले. या पुलामुळे मुरु ड तालुक्यात आर्थिक, सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. या पुलाच्या निर्मितीनंतर मुरु ड तालुक्याला पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली. या पुलाच्या निर्मितीपूर्वी मुंबई, पुणे येथे जाण्यासाठी साळाव - चणेरा - रोहा -नागोठणे - मार्गे वडखळ पेण मार्गे खोपोली पुणे किंवा पेण - पनवेल -मुंबई असा प्रवास करावा लागत असे. हा प्रवास त्याकाळी ७ ते ९ तासांचा होत असे. काही वर्षांपासून अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाकडे दुर्लक्ष केल्याने या पुलाची वाताहत झाली आहे . या पुलाला मे २०१४ मध्ये दुसऱ्यांदा भेग पडली होती. त्यावेळी बांधकाम खात्याने लोखंडी पट्टी लावून त्या ठिकाणी सिमेंट लावले होते. तसेच त्यावेळी पडलेले खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र आता पट्टी लावलेला सिमेंटचा भाग निखळला आहे, पुलाच्या कठड्याचा काही भाग पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)