शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

साळाव-रेवदंडा खाडीपुलाचा कठडा तुटला

By admin | Updated: August 18, 2015 02:59 IST

रायगड जिल्ह्यातील साळाव-रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड व रोहा हे तीन तालुके जवळ आलेत. परंतु पुलाचा कठडा तुटल्याने व खड्डे पडल्यामुळे

बोर्ली-मांडला : रायगड जिल्ह्यातील साळाव-रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड व रोहा हे तीन तालुके जवळ आलेत. परंतु पुलाचा कठडा तुटल्याने व खड्डे पडल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली असून येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या तिन्ही तालुक्यांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. साळाव - रेवदंडा पुलाचे काम १९८६ साली करण्यात आले होते. त्यामुळे अलिबाग, रोहा आणि मुरु ड हे तीन तालुके जवळ आले. या पुलामुळे मुरु ड तालुक्यात आर्थिक, सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. या पुलाच्या निर्मितीनंतर मुरु ड तालुक्याला पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली. या पुलाच्या निर्मितीपूर्वी मुंबई, पुणे येथे जाण्यासाठी साळाव - चणेरा - रोहा -नागोठणे - मार्गे वडखळ पेण मार्गे खोपोली पुणे किंवा पेण - पनवेल -मुंबई असा प्रवास करावा लागत असे. हा प्रवास त्याकाळी ७ ते ९ तासांचा होत असे. काही वर्षांपासून अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाकडे दुर्लक्ष केल्याने या पुलाची वाताहत झाली आहे . या पुलाला मे २०१४ मध्ये दुसऱ्यांदा भेग पडली होती. त्यावेळी बांधकाम खात्याने लोखंडी पट्टी लावून त्या ठिकाणी सिमेंट लावले होते. तसेच त्यावेळी पडलेले खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र आता पट्टी लावलेला सिमेंटचा भाग निखळला आहे, पुलाच्या कठड्याचा काही भाग पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)