शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

चिरनेर-आक्कादेवी दरम्यान साकवाचे काम निकृष्ट दर्जाचे; जंगल सत्याग्रहाचे ऐतिहासिक ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 01:17 IST

राजिपचे चौकशी करून कारवाईचे आदेश

उरण : उरणमध्ये लॉकडाउनचा गैरफायदा घेत ठेकेदाराकडून आदिवासींच्या रहदारीसाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत बांधण्यात येणाऱ्या चिरनेर-आक्कादेवी आदिवासीवाडी दरम्यान साकवाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. आदिवासींच्या वर्दळीसाठी उपयुक्त ठरणाºया साकवाच्या कामासाठी पावणेआठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामाचा दर्जा खालावला असून अतिवृष्टीत कधीही कोसळण्याची भीती आदिवासींकडून व्यक्त केली जात आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आक्कादेवी माळरानावर सुमारे २०० जणांची वस्ती आहे. चिरनेर जंगल सत्याग्रहातील आक्कादेवी माळरानही ऐतिहासिक ठिकाण आहे. याच ठिकाणी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचेही स्मारक असून दरवर्षी ३० सष्टेंबर रोजी हुतात्मा दिनाच्या निमित्ताने अभिवादन, मानवंदना देण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो.

आक्कादेवी माळरानावर वास्तव्य करणाºया ग्रामस्थांना रस्त्यात येणारे वाहते नाले पार करून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वाहत असल्याने वर्दळ करणे अवघड होते. शिवाय जीवासही धोका संभवतो. आदिवासींची समस्या हेरून रायगड जिल्हा परिषदेमार्फत चिरनेर - आक्कादेवी आदिवासीवाडी साकव बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

उभारण्यात येत असलेल्या सुमारे १५ मीटर लांबीच्या साकवाच्या बांधकामासाठी ७ लाख ७६ हजार ८४३ खर्चाच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून ठेकेदाराने कामालाही सुरुवात केली आहे. मात्र लॉकडाउनचा गैरफायदा उठवत ठेकेदाराकडून साकवाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. पीसीसी, स्टील, सिमेंट, काँक्रीटच्या बांधकामात चक्क दगड, माती आणि तत्सम निरुपयोगी सामानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

एम-१२, एम-१५, एम-२०, एम-३५ आदी ग्रेडमधील बांधकामात निविदाप्रमाणे वायब्रेटिंग, क्युरिंग, सेंटरिंग आदींचा ठेकेदाराकडून वापरच केला जात नाही. कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत येथील काही आदिवासींनी उरण पंचायत समिती आणि राजिप सदस्यांच्या भेटीगाठी घेऊन माहिती देऊन नाराजी व्यक्त केली आहे.

राजिप सदस्य विजय भोईर यांनी ही गंभीर बाब राजिप मुख्याधिकारी दिलीप हळदे यांच्याही निदर्शनास आणून दिली आहे. अद्यापही कारवाई केली नसल्याचे आदिवासींकडून सांगण्यात येत आहे. अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराला एक प्रकारे पाठबळच मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात दुर्घटना झाल्यास त्यास संबंधित अधिकारी, ठेकेदार जबाबदार असतील, सरकारचा आदिवासींच्या विकासासाठी लाखोंचा होणारा खर्चही पाण्यात जात असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.

मुख्याधिकाºयांच्या आदेशानंतर कारवाई

च्चिरनेर - आक्कादेवी आदिवासीवाडी दरम्यान साकवाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत राजिप मुख्याधिकारी दिलीप हळदे यांच्या आदेशानंतर चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना राजिपचे पनवेल-उरण विभागाचे उपअभियंता बारदेशकर यांना दिल्याची माहिती राजिपचे अतिरिक्त मुख्याधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड