शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

चिरनेर-आक्कादेवी दरम्यान साकवाचे काम निकृष्ट दर्जाचे; जंगल सत्याग्रहाचे ऐतिहासिक ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 01:17 IST

राजिपचे चौकशी करून कारवाईचे आदेश

उरण : उरणमध्ये लॉकडाउनचा गैरफायदा घेत ठेकेदाराकडून आदिवासींच्या रहदारीसाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत बांधण्यात येणाऱ्या चिरनेर-आक्कादेवी आदिवासीवाडी दरम्यान साकवाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. आदिवासींच्या वर्दळीसाठी उपयुक्त ठरणाºया साकवाच्या कामासाठी पावणेआठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामाचा दर्जा खालावला असून अतिवृष्टीत कधीही कोसळण्याची भीती आदिवासींकडून व्यक्त केली जात आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आक्कादेवी माळरानावर सुमारे २०० जणांची वस्ती आहे. चिरनेर जंगल सत्याग्रहातील आक्कादेवी माळरानही ऐतिहासिक ठिकाण आहे. याच ठिकाणी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचेही स्मारक असून दरवर्षी ३० सष्टेंबर रोजी हुतात्मा दिनाच्या निमित्ताने अभिवादन, मानवंदना देण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो.

आक्कादेवी माळरानावर वास्तव्य करणाºया ग्रामस्थांना रस्त्यात येणारे वाहते नाले पार करून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वाहत असल्याने वर्दळ करणे अवघड होते. शिवाय जीवासही धोका संभवतो. आदिवासींची समस्या हेरून रायगड जिल्हा परिषदेमार्फत चिरनेर - आक्कादेवी आदिवासीवाडी साकव बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

उभारण्यात येत असलेल्या सुमारे १५ मीटर लांबीच्या साकवाच्या बांधकामासाठी ७ लाख ७६ हजार ८४३ खर्चाच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून ठेकेदाराने कामालाही सुरुवात केली आहे. मात्र लॉकडाउनचा गैरफायदा उठवत ठेकेदाराकडून साकवाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. पीसीसी, स्टील, सिमेंट, काँक्रीटच्या बांधकामात चक्क दगड, माती आणि तत्सम निरुपयोगी सामानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

एम-१२, एम-१५, एम-२०, एम-३५ आदी ग्रेडमधील बांधकामात निविदाप्रमाणे वायब्रेटिंग, क्युरिंग, सेंटरिंग आदींचा ठेकेदाराकडून वापरच केला जात नाही. कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत येथील काही आदिवासींनी उरण पंचायत समिती आणि राजिप सदस्यांच्या भेटीगाठी घेऊन माहिती देऊन नाराजी व्यक्त केली आहे.

राजिप सदस्य विजय भोईर यांनी ही गंभीर बाब राजिप मुख्याधिकारी दिलीप हळदे यांच्याही निदर्शनास आणून दिली आहे. अद्यापही कारवाई केली नसल्याचे आदिवासींकडून सांगण्यात येत आहे. अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराला एक प्रकारे पाठबळच मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात दुर्घटना झाल्यास त्यास संबंधित अधिकारी, ठेकेदार जबाबदार असतील, सरकारचा आदिवासींच्या विकासासाठी लाखोंचा होणारा खर्चही पाण्यात जात असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.

मुख्याधिकाºयांच्या आदेशानंतर कारवाई

च्चिरनेर - आक्कादेवी आदिवासीवाडी दरम्यान साकवाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत राजिप मुख्याधिकारी दिलीप हळदे यांच्या आदेशानंतर चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना राजिपचे पनवेल-उरण विभागाचे उपअभियंता बारदेशकर यांना दिल्याची माहिती राजिपचे अतिरिक्त मुख्याधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड