शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेर-आक्कादेवी दरम्यान साकवाचे काम निकृष्ट दर्जाचे; जंगल सत्याग्रहाचे ऐतिहासिक ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 01:17 IST

राजिपचे चौकशी करून कारवाईचे आदेश

उरण : उरणमध्ये लॉकडाउनचा गैरफायदा घेत ठेकेदाराकडून आदिवासींच्या रहदारीसाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत बांधण्यात येणाऱ्या चिरनेर-आक्कादेवी आदिवासीवाडी दरम्यान साकवाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. आदिवासींच्या वर्दळीसाठी उपयुक्त ठरणाºया साकवाच्या कामासाठी पावणेआठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामाचा दर्जा खालावला असून अतिवृष्टीत कधीही कोसळण्याची भीती आदिवासींकडून व्यक्त केली जात आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आक्कादेवी माळरानावर सुमारे २०० जणांची वस्ती आहे. चिरनेर जंगल सत्याग्रहातील आक्कादेवी माळरानही ऐतिहासिक ठिकाण आहे. याच ठिकाणी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचेही स्मारक असून दरवर्षी ३० सष्टेंबर रोजी हुतात्मा दिनाच्या निमित्ताने अभिवादन, मानवंदना देण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो.

आक्कादेवी माळरानावर वास्तव्य करणाºया ग्रामस्थांना रस्त्यात येणारे वाहते नाले पार करून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वाहत असल्याने वर्दळ करणे अवघड होते. शिवाय जीवासही धोका संभवतो. आदिवासींची समस्या हेरून रायगड जिल्हा परिषदेमार्फत चिरनेर - आक्कादेवी आदिवासीवाडी साकव बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

उभारण्यात येत असलेल्या सुमारे १५ मीटर लांबीच्या साकवाच्या बांधकामासाठी ७ लाख ७६ हजार ८४३ खर्चाच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून ठेकेदाराने कामालाही सुरुवात केली आहे. मात्र लॉकडाउनचा गैरफायदा उठवत ठेकेदाराकडून साकवाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. पीसीसी, स्टील, सिमेंट, काँक्रीटच्या बांधकामात चक्क दगड, माती आणि तत्सम निरुपयोगी सामानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

एम-१२, एम-१५, एम-२०, एम-३५ आदी ग्रेडमधील बांधकामात निविदाप्रमाणे वायब्रेटिंग, क्युरिंग, सेंटरिंग आदींचा ठेकेदाराकडून वापरच केला जात नाही. कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत येथील काही आदिवासींनी उरण पंचायत समिती आणि राजिप सदस्यांच्या भेटीगाठी घेऊन माहिती देऊन नाराजी व्यक्त केली आहे.

राजिप सदस्य विजय भोईर यांनी ही गंभीर बाब राजिप मुख्याधिकारी दिलीप हळदे यांच्याही निदर्शनास आणून दिली आहे. अद्यापही कारवाई केली नसल्याचे आदिवासींकडून सांगण्यात येत आहे. अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराला एक प्रकारे पाठबळच मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात दुर्घटना झाल्यास त्यास संबंधित अधिकारी, ठेकेदार जबाबदार असतील, सरकारचा आदिवासींच्या विकासासाठी लाखोंचा होणारा खर्चही पाण्यात जात असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.

मुख्याधिकाºयांच्या आदेशानंतर कारवाई

च्चिरनेर - आक्कादेवी आदिवासीवाडी दरम्यान साकवाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत राजिप मुख्याधिकारी दिलीप हळदे यांच्या आदेशानंतर चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना राजिपचे पनवेल-उरण विभागाचे उपअभियंता बारदेशकर यांना दिल्याची माहिती राजिपचे अतिरिक्त मुख्याधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड