शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

नेरळ-माले रस्ता गेला वाहून; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:50 IST

शेतकऱ्यांचे नुकसान; पंचनामा करून भरपाईची मागणी

नेरळ : धुवाधार कोसळणाºया पावसामुळे पोशीर-माले रस्ता वाहून गेला असून विद्यार्थी, प्रवासी आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्ता वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीचे पंचनामे करून भरपाई द्या तरच रस्ता तयार करा, अशी आक्रमक भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत पोशीर-माले रस्त्यावरील परिसर जलमय झाला होता. त्या वेळी पावसाचा जोरदार तडाखा बसून माले-पोशीर रस्ता दहा मीटर अंतरापर्यंत वाहून गेला आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण बंद आहे. हा रस्ता वाहून गेल्याने रस्त्याखालील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी हा रस्ता खचतो आणि शेतीचे प्रचंड नुकसान होते. दरवर्षी नुकसान होऊनही येथील शेतकºयांना भरपाई मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.या ठिकाणी बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी केली आहे; परंतु पहिल्यांदा नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करून सर्व शेतकºयांना नुकसानभरपाई द्या; नंतर रस्त्याचे काम करा, अशी भूमिका येथील शेतकºयांनी घेतली आहे. तसेच रस्ता खचल्याने माले, आसे, फराटापाडा, आर्डे येथील विद्यार्थ्यांना पोशीर शाळेत येताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच प्रवासी वाहनचालकही हैराण झाले आहेत, वाहनचालकांना पोशीर येथे येण्यासाठी कळंबवरून वळसा घेऊन यावे लागते आहे. त्यामुळे शेतकºयांना नुकसानभरपाई देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.दरवर्षी पुराच्या पाण्याने रस्ता खचून माती, दगड शेतात येऊन शेतीचे नुकसान होत आहे; परंतु कोणत्याही प्रकारे नुकसानभरपाई दिली जात नसल्याने आमचे प्रचंड नुकसान होत आहे. या वर्षी तर पूर्ण शेतात मातीचा भराव आणि दगड येऊन पडले आहेत, त्यामुळे पहिल्यांदा शेतीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्या; नंतर रस्ता तयार करा, अशी आमची ठाम भूमिका आहे.- रियाज बोंबे, शेतकरी, चिकनपाडाशेतकºयांची मागणीही रास्त आहे, दरवर्षी नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळत नाही, त्यामुळे शासनाने शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच रस्ता खचल्याने विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहनचालकांचेही हाल होत आहेत, यामुळे महसूल विभागाने शेतकºयांची मागणी पूर्ण करावी आणि रस्त्याचे काम सुरू करावे.- हरिश्चंद्र वेहले, ग्रामस्थ, मालेपोशीर-माले रस्त्यावरील चिकनपाडा येथे रस्ता वाहून गेला आहे. त्या ठिकाणी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना जागेवर जाऊन पाहणी करून पंचनामा करण्यास सांगितले आहे. लवकरच नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले जातील.- अविनाश कोष्टी, तहसीदार, कर्जत

टॅग्स :floodपूर