शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

नेरळ-माले रस्ता गेला वाहून; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:50 IST

शेतकऱ्यांचे नुकसान; पंचनामा करून भरपाईची मागणी

नेरळ : धुवाधार कोसळणाºया पावसामुळे पोशीर-माले रस्ता वाहून गेला असून विद्यार्थी, प्रवासी आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्ता वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीचे पंचनामे करून भरपाई द्या तरच रस्ता तयार करा, अशी आक्रमक भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत पोशीर-माले रस्त्यावरील परिसर जलमय झाला होता. त्या वेळी पावसाचा जोरदार तडाखा बसून माले-पोशीर रस्ता दहा मीटर अंतरापर्यंत वाहून गेला आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण बंद आहे. हा रस्ता वाहून गेल्याने रस्त्याखालील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी हा रस्ता खचतो आणि शेतीचे प्रचंड नुकसान होते. दरवर्षी नुकसान होऊनही येथील शेतकºयांना भरपाई मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.या ठिकाणी बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी केली आहे; परंतु पहिल्यांदा नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करून सर्व शेतकºयांना नुकसानभरपाई द्या; नंतर रस्त्याचे काम करा, अशी भूमिका येथील शेतकºयांनी घेतली आहे. तसेच रस्ता खचल्याने माले, आसे, फराटापाडा, आर्डे येथील विद्यार्थ्यांना पोशीर शाळेत येताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच प्रवासी वाहनचालकही हैराण झाले आहेत, वाहनचालकांना पोशीर येथे येण्यासाठी कळंबवरून वळसा घेऊन यावे लागते आहे. त्यामुळे शेतकºयांना नुकसानभरपाई देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.दरवर्षी पुराच्या पाण्याने रस्ता खचून माती, दगड शेतात येऊन शेतीचे नुकसान होत आहे; परंतु कोणत्याही प्रकारे नुकसानभरपाई दिली जात नसल्याने आमचे प्रचंड नुकसान होत आहे. या वर्षी तर पूर्ण शेतात मातीचा भराव आणि दगड येऊन पडले आहेत, त्यामुळे पहिल्यांदा शेतीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्या; नंतर रस्ता तयार करा, अशी आमची ठाम भूमिका आहे.- रियाज बोंबे, शेतकरी, चिकनपाडाशेतकºयांची मागणीही रास्त आहे, दरवर्षी नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळत नाही, त्यामुळे शासनाने शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच रस्ता खचल्याने विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहनचालकांचेही हाल होत आहेत, यामुळे महसूल विभागाने शेतकºयांची मागणी पूर्ण करावी आणि रस्त्याचे काम सुरू करावे.- हरिश्चंद्र वेहले, ग्रामस्थ, मालेपोशीर-माले रस्त्यावरील चिकनपाडा येथे रस्ता वाहून गेला आहे. त्या ठिकाणी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना जागेवर जाऊन पाहणी करून पंचनामा करण्यास सांगितले आहे. लवकरच नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले जातील.- अविनाश कोष्टी, तहसीदार, कर्जत

टॅग्स :floodपूर