शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

खारभूमी बंधाऱ्यांच्या कामासाठी धावाधाव; मनुष्यबळाअभावी यंत्राद्वारे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:16 IST

मान्सूनपूर्व तयारी; खारभूमी विभागातील अधिकाऱ्यांनी कसली कंबर

दत्ता म्हात्रे

पेण : गतवर्षी महापुरात खारभूमी संरक्षक बंधारे फुटून पेण तालुक्यातील कणे, अंतोरे, मोठेवढाव, वाशी ओढांगी या वाशी विभागातील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. या विभागाबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे गडब, खारपाले, कासू भागातील खारपाले, खारढोंबी जुईअब्बास, माचेला चिर्बी तर रावे, कोपर, भाल-विठ्ठलवाडी, वडखळ या खारभूमी क्षेत्रातील तब्बल ९००० एकरावर नापिकीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे यावर्षी मान्सून हंगामापूर्वी या खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे येत्या २५ दिवसांत करण्यासाठी खारभूमी विभागाचे अधिकारी सज्ज झाले आहेत.

गतवर्षी महापुरात फुटलेले समुद्र खाड्यांच्या संरक्षक बंधाºयांची देखभाल दुरुस्ती स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक स्वरूपात केली होती. मात्र, यावर्षी मान्सून हंगामापूर्वी या खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे येत्या २५ दिवसांत करण्यासाठी खारभूमी सर्वेक्षण अन्वेषण विभागासमोर मोठे शिवधनुष्य उचलण्याची कठीण समस्या उभी राहिलेली आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संरक्षक बंधाºयांची कामे जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने करून मजबुती करणाची कामे करण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे कार्यालयीन सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पेणच्या खाडीकिनारच्या गावांना खारभूमी संरक्षक बंधारे फुटून समुद्राचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित अतिवृष्टीच्या वेळी जमते, त्या वेळी महापूर येतो. या महापुराच्या पाण्याचा प्रचंड ओघ गावांमध्ये शिरून त्या, त्या गावाला पुराचा वेढा पडतो. गतवर्षी पेणमधील करणे गावाला पुराचा वेढा पडून पुरात अडकलेल्या ७५ नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू आॅपरेशन करून प्राण वाचविले होते. कणे खारभूमी योजनेतील पूर्व बाजूकडील बंधारे जागोजागी फुटून भोगावती नदीपात्रातील पुराच्या पाण्याचा वेढा संपूर्ण गाव व परिसरातील वाड्यांमध्ये पडला होता. येत्या मान्सून हंगामात आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत महापूर येणार, असा हवामान खात्याने व इतर मान्सूनच्या अंदाज वर्तविणाºया वेधशाळांनी सांगितले आहे. खारभूमी बंधाºयांचे बळकटीकरणाची कामे जानेवारी महिन्यापासून सुरू व्हायला हवी होती. मात्र, योजनांचे आराखडे बनविण्यासाठी व या योजनावर विकास निधीची तरतूद, आॅनलाइन टेंडर प्रक्रियेसाठी वेळ लागतो. मार्च महिन्यांपासून कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. अशा परिस्थितीत आता मे महिना उजाडला असून, मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी सरकारने सवलत दिली आहे.मजूर काम करण्यास तयार नाहीतगेले ४६ दिवस संपूर्ण देश लाकडाउनमध्ये बंद आहे. मजूर कष्टकरी, कोरोना महामारीच्या भीतीपोटी कामांवर येण्यासाठी राजी होत नाहीत. अशा कठीण परिस्थितीत खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे उरकण्यासाठी मनुष्यबळाअभावी यांत्रिक पद्धतीने मातीच्या भरावाने कामे उरकून समुद्रकिनारचे शेती संरक्षक बंधारे सक्षम, बळकट करण्यासाठी खारभूमी विभागातील अधिकाºयांनी कंबर कसली आहे.या वर्षीच्या मान्सून हंगामापूर्वी ही संरक्षक तटबंदीची कामे करणे अत्यंत गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेऊन या सर्व बाबींचा विचार करून खारभूमी संरक्षक बंधाºयांच्या मजबुतीकरण कामे करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, शेतकरी खारभूमी विभागीय कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता गायकवाड व शाखा अभियंता यांच्याकडे कामे उरकून घेण्यासाठी गाठीभेटी घेतल्या आहेत.