शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

खारभूमी बंधाऱ्यांच्या कामासाठी धावाधाव; मनुष्यबळाअभावी यंत्राद्वारे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:16 IST

मान्सूनपूर्व तयारी; खारभूमी विभागातील अधिकाऱ्यांनी कसली कंबर

दत्ता म्हात्रे

पेण : गतवर्षी महापुरात खारभूमी संरक्षक बंधारे फुटून पेण तालुक्यातील कणे, अंतोरे, मोठेवढाव, वाशी ओढांगी या वाशी विभागातील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. या विभागाबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे गडब, खारपाले, कासू भागातील खारपाले, खारढोंबी जुईअब्बास, माचेला चिर्बी तर रावे, कोपर, भाल-विठ्ठलवाडी, वडखळ या खारभूमी क्षेत्रातील तब्बल ९००० एकरावर नापिकीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे यावर्षी मान्सून हंगामापूर्वी या खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे येत्या २५ दिवसांत करण्यासाठी खारभूमी विभागाचे अधिकारी सज्ज झाले आहेत.

गतवर्षी महापुरात फुटलेले समुद्र खाड्यांच्या संरक्षक बंधाºयांची देखभाल दुरुस्ती स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक स्वरूपात केली होती. मात्र, यावर्षी मान्सून हंगामापूर्वी या खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे येत्या २५ दिवसांत करण्यासाठी खारभूमी सर्वेक्षण अन्वेषण विभागासमोर मोठे शिवधनुष्य उचलण्याची कठीण समस्या उभी राहिलेली आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संरक्षक बंधाºयांची कामे जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने करून मजबुती करणाची कामे करण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे कार्यालयीन सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पेणच्या खाडीकिनारच्या गावांना खारभूमी संरक्षक बंधारे फुटून समुद्राचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित अतिवृष्टीच्या वेळी जमते, त्या वेळी महापूर येतो. या महापुराच्या पाण्याचा प्रचंड ओघ गावांमध्ये शिरून त्या, त्या गावाला पुराचा वेढा पडतो. गतवर्षी पेणमधील करणे गावाला पुराचा वेढा पडून पुरात अडकलेल्या ७५ नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू आॅपरेशन करून प्राण वाचविले होते. कणे खारभूमी योजनेतील पूर्व बाजूकडील बंधारे जागोजागी फुटून भोगावती नदीपात्रातील पुराच्या पाण्याचा वेढा संपूर्ण गाव व परिसरातील वाड्यांमध्ये पडला होता. येत्या मान्सून हंगामात आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत महापूर येणार, असा हवामान खात्याने व इतर मान्सूनच्या अंदाज वर्तविणाºया वेधशाळांनी सांगितले आहे. खारभूमी बंधाºयांचे बळकटीकरणाची कामे जानेवारी महिन्यापासून सुरू व्हायला हवी होती. मात्र, योजनांचे आराखडे बनविण्यासाठी व या योजनावर विकास निधीची तरतूद, आॅनलाइन टेंडर प्रक्रियेसाठी वेळ लागतो. मार्च महिन्यांपासून कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. अशा परिस्थितीत आता मे महिना उजाडला असून, मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी सरकारने सवलत दिली आहे.मजूर काम करण्यास तयार नाहीतगेले ४६ दिवस संपूर्ण देश लाकडाउनमध्ये बंद आहे. मजूर कष्टकरी, कोरोना महामारीच्या भीतीपोटी कामांवर येण्यासाठी राजी होत नाहीत. अशा कठीण परिस्थितीत खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे उरकण्यासाठी मनुष्यबळाअभावी यांत्रिक पद्धतीने मातीच्या भरावाने कामे उरकून समुद्रकिनारचे शेती संरक्षक बंधारे सक्षम, बळकट करण्यासाठी खारभूमी विभागातील अधिकाºयांनी कंबर कसली आहे.या वर्षीच्या मान्सून हंगामापूर्वी ही संरक्षक तटबंदीची कामे करणे अत्यंत गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेऊन या सर्व बाबींचा विचार करून खारभूमी संरक्षक बंधाºयांच्या मजबुतीकरण कामे करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, शेतकरी खारभूमी विभागीय कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता गायकवाड व शाखा अभियंता यांच्याकडे कामे उरकून घेण्यासाठी गाठीभेटी घेतल्या आहेत.