शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

खारभूमी बंधाऱ्यांच्या कामासाठी धावाधाव; मनुष्यबळाअभावी यंत्राद्वारे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:16 IST

मान्सूनपूर्व तयारी; खारभूमी विभागातील अधिकाऱ्यांनी कसली कंबर

दत्ता म्हात्रे

पेण : गतवर्षी महापुरात खारभूमी संरक्षक बंधारे फुटून पेण तालुक्यातील कणे, अंतोरे, मोठेवढाव, वाशी ओढांगी या वाशी विभागातील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. या विभागाबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे गडब, खारपाले, कासू भागातील खारपाले, खारढोंबी जुईअब्बास, माचेला चिर्बी तर रावे, कोपर, भाल-विठ्ठलवाडी, वडखळ या खारभूमी क्षेत्रातील तब्बल ९००० एकरावर नापिकीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे यावर्षी मान्सून हंगामापूर्वी या खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे येत्या २५ दिवसांत करण्यासाठी खारभूमी विभागाचे अधिकारी सज्ज झाले आहेत.

गतवर्षी महापुरात फुटलेले समुद्र खाड्यांच्या संरक्षक बंधाºयांची देखभाल दुरुस्ती स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक स्वरूपात केली होती. मात्र, यावर्षी मान्सून हंगामापूर्वी या खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे येत्या २५ दिवसांत करण्यासाठी खारभूमी सर्वेक्षण अन्वेषण विभागासमोर मोठे शिवधनुष्य उचलण्याची कठीण समस्या उभी राहिलेली आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संरक्षक बंधाºयांची कामे जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने करून मजबुती करणाची कामे करण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे कार्यालयीन सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पेणच्या खाडीकिनारच्या गावांना खारभूमी संरक्षक बंधारे फुटून समुद्राचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित अतिवृष्टीच्या वेळी जमते, त्या वेळी महापूर येतो. या महापुराच्या पाण्याचा प्रचंड ओघ गावांमध्ये शिरून त्या, त्या गावाला पुराचा वेढा पडतो. गतवर्षी पेणमधील करणे गावाला पुराचा वेढा पडून पुरात अडकलेल्या ७५ नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू आॅपरेशन करून प्राण वाचविले होते. कणे खारभूमी योजनेतील पूर्व बाजूकडील बंधारे जागोजागी फुटून भोगावती नदीपात्रातील पुराच्या पाण्याचा वेढा संपूर्ण गाव व परिसरातील वाड्यांमध्ये पडला होता. येत्या मान्सून हंगामात आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत महापूर येणार, असा हवामान खात्याने व इतर मान्सूनच्या अंदाज वर्तविणाºया वेधशाळांनी सांगितले आहे. खारभूमी बंधाºयांचे बळकटीकरणाची कामे जानेवारी महिन्यापासून सुरू व्हायला हवी होती. मात्र, योजनांचे आराखडे बनविण्यासाठी व या योजनावर विकास निधीची तरतूद, आॅनलाइन टेंडर प्रक्रियेसाठी वेळ लागतो. मार्च महिन्यांपासून कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. अशा परिस्थितीत आता मे महिना उजाडला असून, मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी सरकारने सवलत दिली आहे.मजूर काम करण्यास तयार नाहीतगेले ४६ दिवस संपूर्ण देश लाकडाउनमध्ये बंद आहे. मजूर कष्टकरी, कोरोना महामारीच्या भीतीपोटी कामांवर येण्यासाठी राजी होत नाहीत. अशा कठीण परिस्थितीत खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे उरकण्यासाठी मनुष्यबळाअभावी यांत्रिक पद्धतीने मातीच्या भरावाने कामे उरकून समुद्रकिनारचे शेती संरक्षक बंधारे सक्षम, बळकट करण्यासाठी खारभूमी विभागातील अधिकाºयांनी कंबर कसली आहे.या वर्षीच्या मान्सून हंगामापूर्वी ही संरक्षक तटबंदीची कामे करणे अत्यंत गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेऊन या सर्व बाबींचा विचार करून खारभूमी संरक्षक बंधाºयांच्या मजबुतीकरण कामे करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, शेतकरी खारभूमी विभागीय कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता गायकवाड व शाखा अभियंता यांच्याकडे कामे उरकून घेण्यासाठी गाठीभेटी घेतल्या आहेत.