शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

रासायनिक घनकचरा वाहतूक नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 03:28 IST

मुंबई-गोवा महामार्गावरून औद्योगिक क्षेत्रातील घनकचरा वाहतूक करताना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे आणि वाहतूक विभागाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

- सिकंदर अनवारे दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरून औद्योगिक क्षेत्रातील घनकचरा वाहतूक करताना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे आणि वाहतूक विभागाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. रस्त्यावर ओला घनकचरा सांडत जाणारी वाहने मुंबई-गोवा महामार्गावर दिसून येत असून, ओला कचरा वाहनांतून टाकणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक घनकचरा हा संबंधित कंपन्यांनी कंपनीच्या आवारात वाळवून मगच मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सारख्या प्रकल्पांना नष्ट करण्यासाठी देणे अपेक्षित आहे. मात्र, गोवा महामार्गावर हे नियम धाब्यावर बसवून रासायनिक घनकचरा वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. खेड, चिपळूण या परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यातून अशा प्रकारचा रासायनिक घनकचरा वाहतूक होत आहे. महाडपासून पुढे मुंबईपर्यंत वाहनातून कचरा सांडत जाणारी वाहने महामार्गावर दिसून येत आहेत. ज्या वाहनांना रासायनिक घनकचरा वाहतूक करण्याचे मंडळाचे परवाने आहेत, ती वाहनेदेखील वाहनाच्या वरील बाजूस आच्छादन न टाकता वाहतूक करत असल्याने वाहनामधील घनकचरा हवेने मागील बाजूस सांडत आहे. अनेकदा हा घनकचरा ओला असल्याने त्यामधून रासायनिक घनकचरा आणि पाणी मागील बाजूस उडत असल्याने दुचाकीस्वारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.कारखान्यातून बाहेर पडणारा रासायनिक घनकचरा आणि त्यातील घटक हे मानवी आरोग्याला घातक ठरू शकतात. परिणामी, घनकचरा उघड्यावर टाकण्यास मनाई आहे. मात्र, अनेकदा हा घनकचरा रस्त्याच्या कडेला आणि नदीत टाकून देण्याच्या घटना उघड झाल्या आहेत. असे असतानादेखील आजही अशाच प्रकारे वाहतूक होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महाड औद्योगिक क्षेत्रात देखील काही दिवसांपूर्वी मल्लक आॅइल केम या कारखान्यातील घनकचरा वाहतूक करणारे वाहन निदर्शनास आणून दिल्यानंतर महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेतले आहे. आजही हे वाहन महाड औद्योगिक पोलीसठाण्यात उभे करून ठेवण्यात आले आहे. यातील नमुनेदेखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढील तपासणीसाठी पाठवून दिले आहेत.काही दिवसांपूर्वीच महाडजवळ पुन्हा अशाच प्रकारचा घनकचरा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम.एच.०४ सी यू २२४५ आढळून आला. या ट्रकमध्ये घनकचरा गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत होता. मात्र, हा घनकचरा ओला असल्याने मागील बाजूस त्यातील पाणी दुचाकीवरून प्रवास करणाºया प्रवाशांवर उडत होते. हा कचरा खेडमधील घरडा केमिकल या कंपनीचा असल्याचे चालकाजवळील पावतीवरून निदर्शनास आले. मात्र, संबंधित कंपनी अशा प्रकारे ओला कचरा आपल्याकडून गेला नसल्याचे सांगून हात वर करत आहे. या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे देखील नियंत्रण नसल्याचे यातून दिसून येत आहे.खेड, चिपळूण, रत्नागिरी या परिसरांतून महामार्गावरून उघड्या वाहनातून ओला कचरा वाहतूक करत मुंबईपर्यंत नेला जातो. यादरम्यान चिपळूण, खेड, महाड, पुढे पेण, पनवेलपर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्यालये आहेत. मात्र, या कार्यालयाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अशा ओला कचरा कंपनीच्या बाहेर काढणाºया कंपन्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.>पोलीस आणि आर.टी.ओ. प्रशासनाचीही डोळेझाकमुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी पोलीस आणि आर.टी.ओ. प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतात. मात्र, याच महामार्गावर नियम धाब्यावर बसवून रासायनिक घनकचरा वाहतूक करणारी वाहने ये-जा करीत असतात. याबाबत पोलीस आणि परिवहन विभाग डोळेझाक करीत असून या कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खेडमधून निघणारे वाहन हे कशेडी, केंबुर्ली येथील पोलीस पथकाजवळूनच मुंबईकडे जातात. पोलीस आणि परिवहन विभागाकडून कारवाई अपेक्षित आहे.>कारवाई करण्याचे अधिकार आपणास नाहीत. मात्र, जनसामान्यांच्या आरोग्याच्या आणि पर्यावरणाचा विचार करता कारवाईचा प्रस्ताव पाठवू शकतो. यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे निश्चित पाठविण्यात येईल. मुळात कारखानदारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.- रवींद्र आंधळे, उपप्रादेशिक अधिकारी>कंपनीतून गेलेले मटेरियल हे ओल्या प्रकारात गेलेले दिसून येत नाही.- अनिल भोसले, व्यवस्थापक, घरडा केमिकल, खेडओला घनकचरा वाहतूक करणे चुकीचे आहेच, शिवाय ज्या कंपन्या अशा प्रकारे ओला घनकचरा बाहेर काढतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी त्या त्या ठिकाणी असलेल्या उपप्रादेशिक अधिकाºयांची आहे.- दिलीप खेडेकर,प्रादेशिक अधिकारी, कोल्हापूर