शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

८५ कोटींचे मुद्रांक शुल्क थकीत, अनुदान अदा करण्याची पंडित पाटील यांची सरकारला विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 06:30 IST

राज्य शासनाकडून २०१५-१६ व २०१७-१८ या दोन वित्तीय वर्षांतील मुद्रांक शुल्काची रायगड जिल्हा परिषदेस येणे असलेली ८५ कोटी २० लाख १० हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेस तत्काळ उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक कार्यवाही प्रस्तावित करून हे अनुदान जिल्हा परिषदेस वर्ग करावे,अशी मागणी राज्याच्या वित्त सचिवांकडे आपण केली

अलिबाग - राज्य शासनाकडून २०१५-१६ व २०१७-१८ या दोन वित्तीय वर्षांतील मुद्रांक शुल्काची रायगड जिल्हा परिषदेस येणे असलेली ८५ कोटी २० लाख १० हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेस तत्काळ उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक कार्यवाही प्रस्तावित करून हे अनुदान जिल्हा परिषदेस वर्ग करावे,अशी मागणी राज्याच्या वित्त सचिवांकडे आपण केली असल्याची माहिती अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.‘लोकमत’ अलिबाग (रायगड) कार्यालयाच्या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त कार्यालयात आयोजित पूजेच्या दर्शनाकरिता आ. पंडित पाटील आवर्जून आले होते. त्या वेळी त्यांच्या समवेत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकराव म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रलंबित मुद्रांक शुल्क अनुदानाच्या अनुषंगाने बोलताना आ. पाटील म्हणाले, महाराष्टÑ जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१मधील कलम १५८नुसार मुद्रांक शुल्कापोटी शासनाकडून मिळणाºया अनुदानापैकी ५० टक्के हिस्सा जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातील महत्त्वाचा घटक आहे. त्या अनुषंगाने त्या संबंधित आर्थिक वर्षातील मुद्रांक शुल्कापोटीचे देय अनुदान असे एकूण जिल्हा परिषदेस अपेक्षित उत्पन्न धरून जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प तयार करण्यात येतो. त्यानुसारच जिल्हा परिषदेस ग्रामीण जनतेसाठी सोयी-सुविधा पुरविणे व विकासात्मक तसेच लेखाभिमुख कामे करणे शक्य होत असते; परंतु राज्य शासनाकडून इतकी मोठी रक्कम येणे बाकी असल्याने रायगड जिल्हा परिषदेस ही विकासकामे पूर्ण करण्यात मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली असल्याने ही रक्कम सरकारने तत्काळ अदा करणे आवश्यक असल्याचे आ. पाटील यांनी नमूद केले.‘लोकमत’ विकासाच्या मुद्द्यांसह जनसामान्यांचे प्रश्न जिल्हा प्रशासन व शासन यांच्या समोर सातत्याने मांडून विषय लावून धरला त्यामुळे अनेक प्रश्न सुटले आहेत. जिल्ह्यातील विकासकामांकरिता सर्वांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून कृषी विकास व आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे असल्याचे यावेळी चर्चेत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी नमूद केले. 

टॅग्स :Raigadरायगड