शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

८५ कोटींचे मुद्रांक शुल्क थकीत, अनुदान अदा करण्याची पंडित पाटील यांची सरकारला विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 06:30 IST

राज्य शासनाकडून २०१५-१६ व २०१७-१८ या दोन वित्तीय वर्षांतील मुद्रांक शुल्काची रायगड जिल्हा परिषदेस येणे असलेली ८५ कोटी २० लाख १० हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेस तत्काळ उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक कार्यवाही प्रस्तावित करून हे अनुदान जिल्हा परिषदेस वर्ग करावे,अशी मागणी राज्याच्या वित्त सचिवांकडे आपण केली

अलिबाग - राज्य शासनाकडून २०१५-१६ व २०१७-१८ या दोन वित्तीय वर्षांतील मुद्रांक शुल्काची रायगड जिल्हा परिषदेस येणे असलेली ८५ कोटी २० लाख १० हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेस तत्काळ उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक कार्यवाही प्रस्तावित करून हे अनुदान जिल्हा परिषदेस वर्ग करावे,अशी मागणी राज्याच्या वित्त सचिवांकडे आपण केली असल्याची माहिती अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.‘लोकमत’ अलिबाग (रायगड) कार्यालयाच्या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त कार्यालयात आयोजित पूजेच्या दर्शनाकरिता आ. पंडित पाटील आवर्जून आले होते. त्या वेळी त्यांच्या समवेत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकराव म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रलंबित मुद्रांक शुल्क अनुदानाच्या अनुषंगाने बोलताना आ. पाटील म्हणाले, महाराष्टÑ जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१मधील कलम १५८नुसार मुद्रांक शुल्कापोटी शासनाकडून मिळणाºया अनुदानापैकी ५० टक्के हिस्सा जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातील महत्त्वाचा घटक आहे. त्या अनुषंगाने त्या संबंधित आर्थिक वर्षातील मुद्रांक शुल्कापोटीचे देय अनुदान असे एकूण जिल्हा परिषदेस अपेक्षित उत्पन्न धरून जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प तयार करण्यात येतो. त्यानुसारच जिल्हा परिषदेस ग्रामीण जनतेसाठी सोयी-सुविधा पुरविणे व विकासात्मक तसेच लेखाभिमुख कामे करणे शक्य होत असते; परंतु राज्य शासनाकडून इतकी मोठी रक्कम येणे बाकी असल्याने रायगड जिल्हा परिषदेस ही विकासकामे पूर्ण करण्यात मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली असल्याने ही रक्कम सरकारने तत्काळ अदा करणे आवश्यक असल्याचे आ. पाटील यांनी नमूद केले.‘लोकमत’ विकासाच्या मुद्द्यांसह जनसामान्यांचे प्रश्न जिल्हा प्रशासन व शासन यांच्या समोर सातत्याने मांडून विषय लावून धरला त्यामुळे अनेक प्रश्न सुटले आहेत. जिल्ह्यातील विकासकामांकरिता सर्वांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून कृषी विकास व आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे असल्याचे यावेळी चर्चेत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी नमूद केले. 

टॅग्स :Raigadरायगड