शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने सुमारे 80 टक्के मतदान; उद्या होणार फैसला

By निखिल म्हात्रे | Updated: November 5, 2023 20:47 IST

रायगड जिल्ह्यातील एकूण 1414 उमेदवारांचे भवितव्य एव्हीएम मशीनमध्ये बंद

अलिबाग- आरोप-प्रत्यारोपांनी रंगलेल्या जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उशिरापर्यंत मतदान केंद्रांवरून निवडणूक अधिकारी कर्मचारी सर्व सामुग्री घेऊन येत असल्याने 5.30 पर्यंतचा अधिकृत आकडा समजू शकला नसला तरी सुमारे 80 टक्के  मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांची वर्तविला आहे.

किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सरपंच व सदस्यत्वासाठी अनुक्रमे 168 व 1246 अशा एकूण 1414 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. त्याचा फैसला सोमवारी (दि. 06) होणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती झाल्या असून शिंदे-भाजपा गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. थेट पक्षीय स्वरुप न देता गट,पॅनल बनवून ही निवडणूक लढविली जात असलीतरी शिवसेनेतील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु झाले असुन दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 65.58 टक्के मतदान झाले आहे. त्यात अलिबागमध्ये 69.52 टक्के मतदान झाले असून मुरुड 61.02 टक्के, पेण 71.63 टक्के, पनवेल 72.37 टक्के, उरण 77.81 टक्के, कर्जत 65.29 टक्के, खालापूर 53.54 टक्के, रोहा 66.29, सुधागड 69.09 टक्के, माणगाव 64.90 टक्के, तळा 59.70 टक्के, महाड 75.21 टक्के, पोलादपूर 68.15 टक्के, म्हसळा 51.02 टक्के तर, श्रीवर्धनमध्ये 50.15 टक्के मतदान झाले आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३० टक्के मतदान झाले होते. सायंकाळनंतर त्यामध्ये काही प्रमाणात वाढ होत गेली. सकाळी साडेनऊ पर्यंत त्यांचे प्रमाण १५.०८ टक्के तर साडेअकरा वाजेपर्यंत सरासरी २१ .३३ टक्के इतके होते. रखरखते ऊन असल्याने अनेकांनी सकाळच्या टप्प्यात मतदान केले. त्यामुळे अकरानंतर दुपारी अडीच पर्यंत बहुतांश ठिकाणची मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.

रायगड जिल्ह्यातील 210 सार्वत्रिक ग्रामपंचायतीत थेट सरपंच व सदस्यत्वासाठी निवडणूका जाहीर झाल्या होत्या. मात्र त्यापैकी 38 सरपंच व 565 सदस्य बिनविरोध झाल्याने उर्वरित ठिकाणी चुरशीने प्रचार करण्यात आला होता. बहुतांश ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती झाल्या असून तुल्यबळ उमेदवारांमुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. 

ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात एकूण 652 मतदान केंद्र बनविण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 3 लाख 81 हजार 423 मतदारांचा समावेश होता. निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यात एकूण प्रशासनाचे ३,७०८ अधिकारी-कर्मचारी कर्तव्य नेमले होते. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व भाजपाने युती करून एक उमेदवार दिला होता. तर उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी ,काँग्रेस व शेकापची मिळून महाआघाडीचा उमेदवार पॅनल बनवून निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल आगामी जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची ‘लिटमेस’ टेस्ट समजली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग