शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने सुमारे 80 टक्के मतदान; उद्या होणार फैसला

By निखिल म्हात्रे | Updated: November 5, 2023 20:47 IST

रायगड जिल्ह्यातील एकूण 1414 उमेदवारांचे भवितव्य एव्हीएम मशीनमध्ये बंद

अलिबाग- आरोप-प्रत्यारोपांनी रंगलेल्या जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उशिरापर्यंत मतदान केंद्रांवरून निवडणूक अधिकारी कर्मचारी सर्व सामुग्री घेऊन येत असल्याने 5.30 पर्यंतचा अधिकृत आकडा समजू शकला नसला तरी सुमारे 80 टक्के  मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांची वर्तविला आहे.

किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सरपंच व सदस्यत्वासाठी अनुक्रमे 168 व 1246 अशा एकूण 1414 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. त्याचा फैसला सोमवारी (दि. 06) होणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती झाल्या असून शिंदे-भाजपा गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. थेट पक्षीय स्वरुप न देता गट,पॅनल बनवून ही निवडणूक लढविली जात असलीतरी शिवसेनेतील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु झाले असुन दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 65.58 टक्के मतदान झाले आहे. त्यात अलिबागमध्ये 69.52 टक्के मतदान झाले असून मुरुड 61.02 टक्के, पेण 71.63 टक्के, पनवेल 72.37 टक्के, उरण 77.81 टक्के, कर्जत 65.29 टक्के, खालापूर 53.54 टक्के, रोहा 66.29, सुधागड 69.09 टक्के, माणगाव 64.90 टक्के, तळा 59.70 टक्के, महाड 75.21 टक्के, पोलादपूर 68.15 टक्के, म्हसळा 51.02 टक्के तर, श्रीवर्धनमध्ये 50.15 टक्के मतदान झाले आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३० टक्के मतदान झाले होते. सायंकाळनंतर त्यामध्ये काही प्रमाणात वाढ होत गेली. सकाळी साडेनऊ पर्यंत त्यांचे प्रमाण १५.०८ टक्के तर साडेअकरा वाजेपर्यंत सरासरी २१ .३३ टक्के इतके होते. रखरखते ऊन असल्याने अनेकांनी सकाळच्या टप्प्यात मतदान केले. त्यामुळे अकरानंतर दुपारी अडीच पर्यंत बहुतांश ठिकाणची मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.

रायगड जिल्ह्यातील 210 सार्वत्रिक ग्रामपंचायतीत थेट सरपंच व सदस्यत्वासाठी निवडणूका जाहीर झाल्या होत्या. मात्र त्यापैकी 38 सरपंच व 565 सदस्य बिनविरोध झाल्याने उर्वरित ठिकाणी चुरशीने प्रचार करण्यात आला होता. बहुतांश ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती झाल्या असून तुल्यबळ उमेदवारांमुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. 

ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात एकूण 652 मतदान केंद्र बनविण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 3 लाख 81 हजार 423 मतदारांचा समावेश होता. निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यात एकूण प्रशासनाचे ३,७०८ अधिकारी-कर्मचारी कर्तव्य नेमले होते. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व भाजपाने युती करून एक उमेदवार दिला होता. तर उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी ,काँग्रेस व शेकापची मिळून महाआघाडीचा उमेदवार पॅनल बनवून निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल आगामी जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची ‘लिटमेस’ टेस्ट समजली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग