शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने सुमारे 80 टक्के मतदान; उद्या होणार फैसला

By निखिल म्हात्रे | Updated: November 5, 2023 20:47 IST

रायगड जिल्ह्यातील एकूण 1414 उमेदवारांचे भवितव्य एव्हीएम मशीनमध्ये बंद

अलिबाग- आरोप-प्रत्यारोपांनी रंगलेल्या जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उशिरापर्यंत मतदान केंद्रांवरून निवडणूक अधिकारी कर्मचारी सर्व सामुग्री घेऊन येत असल्याने 5.30 पर्यंतचा अधिकृत आकडा समजू शकला नसला तरी सुमारे 80 टक्के  मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांची वर्तविला आहे.

किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सरपंच व सदस्यत्वासाठी अनुक्रमे 168 व 1246 अशा एकूण 1414 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. त्याचा फैसला सोमवारी (दि. 06) होणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती झाल्या असून शिंदे-भाजपा गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. थेट पक्षीय स्वरुप न देता गट,पॅनल बनवून ही निवडणूक लढविली जात असलीतरी शिवसेनेतील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु झाले असुन दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 65.58 टक्के मतदान झाले आहे. त्यात अलिबागमध्ये 69.52 टक्के मतदान झाले असून मुरुड 61.02 टक्के, पेण 71.63 टक्के, पनवेल 72.37 टक्के, उरण 77.81 टक्के, कर्जत 65.29 टक्के, खालापूर 53.54 टक्के, रोहा 66.29, सुधागड 69.09 टक्के, माणगाव 64.90 टक्के, तळा 59.70 टक्के, महाड 75.21 टक्के, पोलादपूर 68.15 टक्के, म्हसळा 51.02 टक्के तर, श्रीवर्धनमध्ये 50.15 टक्के मतदान झाले आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३० टक्के मतदान झाले होते. सायंकाळनंतर त्यामध्ये काही प्रमाणात वाढ होत गेली. सकाळी साडेनऊ पर्यंत त्यांचे प्रमाण १५.०८ टक्के तर साडेअकरा वाजेपर्यंत सरासरी २१ .३३ टक्के इतके होते. रखरखते ऊन असल्याने अनेकांनी सकाळच्या टप्प्यात मतदान केले. त्यामुळे अकरानंतर दुपारी अडीच पर्यंत बहुतांश ठिकाणची मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.

रायगड जिल्ह्यातील 210 सार्वत्रिक ग्रामपंचायतीत थेट सरपंच व सदस्यत्वासाठी निवडणूका जाहीर झाल्या होत्या. मात्र त्यापैकी 38 सरपंच व 565 सदस्य बिनविरोध झाल्याने उर्वरित ठिकाणी चुरशीने प्रचार करण्यात आला होता. बहुतांश ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती झाल्या असून तुल्यबळ उमेदवारांमुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. 

ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात एकूण 652 मतदान केंद्र बनविण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 3 लाख 81 हजार 423 मतदारांचा समावेश होता. निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यात एकूण प्रशासनाचे ३,७०८ अधिकारी-कर्मचारी कर्तव्य नेमले होते. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व भाजपाने युती करून एक उमेदवार दिला होता. तर उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी ,काँग्रेस व शेकापची मिळून महाआघाडीचा उमेदवार पॅनल बनवून निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल आगामी जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची ‘लिटमेस’ टेस्ट समजली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग