शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
3
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
4
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
5
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
6
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
7
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
8
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
9
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
10
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
11
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
12
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
13
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
14
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
15
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
16
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
17
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
18
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
19
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
20
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  

अडीच कोटींच्या रस्त्याची पावसाने दैना,  नेरळ गावच्या बायपास रस्त्याचे डांबर गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 04:46 IST

नेरळ विकास प्राधिकरणामधून नेरळ गावाला बायपास ठरेल अशा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. दोन साकव आणि दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी खर्च करण्यात आला होता.

कर्जत : नेरळ विकास प्राधिकरणामधून नेरळ गावाला बायपास ठरेल अशा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. दोन साकव आणि दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी खर्च करण्यात आला होता. या रस्त्याची अवस्था पाहून पहिल्याच पावसात रस्त्यावर केलेला खर्च पाण्यात गेला असल्याचे दिसून येत आहे.नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायतींचा मिळून नेरळ विकास प्राधिकरण निर्माण झाला आहे. या प्राधिकरण हद्दीतील नागरी विकासाला महत्त्वपूर्ण ठरणार म्हणून जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी पुढाकार घेऊन कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील पेशवाई रस्ता कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याला जोडण्यासाठी निधी मंजूर केला. दोन साकव आणि दोन किलोमीटर लांबीच्या अंतराचा रस्ता तयार करण्यासाठी साडेचार कोटीरुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातून कल्याण-कर्जत रस्त्याने दामत रेल्वे गेट आणि पुढे पेशवाई रस्त्याने नेरळ-कळंब जिल्हा मार्ग रस्त्यावरील साई मंदिर असे दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण नेरळ विकास प्राधिकरणाने मंजूर केलेल्या निधीतून करण्यात आले. त्यातील साईमंदिर ते दामत नाला हा रस्ता मे २०१६ मध्ये डांबरीकरण करण्यात आला होता. तर डिसेंबर २०१७ मध्ये दामत गेट आणि पुढे कल्याण रस्त्यापर्यंत डांबरीकरण पूर्ण करण्यात आले होते. या डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर मार्च २०१७ मध्ये कार्पेट डांबरीकरण केले होते.या रस्त्याची अवस्था दोन महिन्यात कोसळलेल्या पावसाने फार बिकट करून ठेवली आहे. या रस्त्यावर कर्जत-कल्याण रोड ते दामत रेल्वे गेट या रस्त्यात तर अगणित मोठे खड्डे आहेत. बायपास रस्ता असल्याने वाहनचालक गाडी घुसवतात, परंतु रस्त्यावर स्वागत करणारा खड्डा एवढा मोठा आहे की तेथून गाडी पुढे नेताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. तर पुढे पहिल्या साकव पुलापर्यंत खड्डेच स्वागत करीत असतात. त्या रस्त्यातील जुन्या झालेल्या साई मंदिरपासून पहिल्या पुलापर्यंत देखील खड्डे चुकविताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे दोन कोटी खर्चून डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याची अवस्था अशी होणार असेल तर जनतेने कशी सहनशीलता दाखवायची?असा प्रश्न आहे. दुसरीकडे अडीच कोटी खर्चून दोन पूल बांधले आहेत. त्या पुलावर टाकलेले डांबर कधीच वाहून गेले असून पुलासाठी टाकलेल्या स्लॅबचे सिमेंट देखील बाहेर पडू लागले आहे. दोन्ही पुलावर पडलेले खड्डे पाहिले की नेरळ प्राधिकरणाने केलेला खर्च हा बिनकामाचा ठरत आहे.रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता कळंब आणि कशेळे भागात जाण्याचा जवळचा मार्ग असून देखील काही कामाचा राहिला नाही. कारण खड्ड्यांनी वाहनांची पुरती वाट लागली असून या नवीन बायपास रस्त्याला दामत नाव असल्याने आमच्या गावाचे नाव खराब होत आहे.- जाबीर नजे, माजी उपसरपंच, दामत भडवळ ग्रामपंचायत

रस्त्यावरील डांबरीकरण काही ठिकाणी उखडलेले आहे, याची पाहणी आम्ही मागील आठवड्यात केली आहे. त्याची नोंद नेरळ विकास प्राधिकरण आणि रायगड जिल्हा परिषदेने घेतली आहे.- सदानंद शिर्के, उपअभियंता नेरळ विकास प्राधिकरण