शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 05:45 IST

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, दिघी ते श्रीवर्धन रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

- संतोष सापतेश्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, दिघी ते श्रीवर्धन रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास येत आहे.दिघी गावाजवळच जंजिरा किल्ला आहे. विविध राज्यांतून पर्यटक जंजिरा बघण्यासाठी येतात. श्रीवर्धन-दिघीअंतर ३० कि.मी.चे आहे. जे पर्यटक श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर, दिवेआगार स्थित मंदिराच्या भेटीसाठी येतात ते आवर्जून जंजिरा किल्ल्याला भेट देतात. दिघीपासून जलवाहतुकीची सोय उपलब्ध असल्याने अवघ्या २० मिनिटांत किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे पर्यटक श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, गोनघरफाटा मार्गे कुडगाव ते दिघी प्रवास करणे पसंत करतात; परंतु आजमितीस या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. पुणे, मुंबईमधील पर्यटक रविवार सुट्टीसाठी श्रीवर्धनची निवड करतात. पुणे ते ताम्हणी, माणगाव, साई मार्गे श्रीवर्धन १६८ कि.मी.चे अंतर आहे. मुंबई, पनवेल, पेण, माणगाव, साई मार्गे श्रीवर्धन १९८ कि.मी.चे अंतर आहे. साधारणत: पाच तासांत पर्यटक श्रीवर्धनमध्ये पोहोचतात. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांना या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.वेळास, कुडगाव, दिघी गावांच्या हद्दीत खड्डेमुरुड, अलिबाग, पेण, रेवदंडा स्थित श्रीवर्धनमधील रहिवाशांना समुद्रमार्गे दिघीत आल्यानंतर दिघी ते श्रीवर्धन रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रचंड त्रास होत आहे. हे ३० कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी जवळपास दीड तास लागत असल्याने श्रीवर्धनमधील नागरिक तसेच बाहेरून येणारे प्रवासी, पर्यटक संताप व्यक्त करत आहेत. वेळास, कुडगाव, दिघी गावांच्या हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वाराला गाडी चालवताना असंख्य अडचणी येत आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ठ करण्यात आला. माणगाव ते वडवली गावाच्या हद्दीपर्यंत महामार्गाचे काम आले आहे. त्यामुळे हे काम पूर्णत्वास कधी जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत काम पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत कमीत कमी आहे त्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी, जेणेकरून प्रवासी वाहतूक सुरळीत पार पडेल, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.वेळास ते दिघी रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्व स्थानिकांना त्रास होत आहे. आम्ही माणगाव, श्रीवर्धनमधील बांधकाम विभागाला त्या विषयी कळवले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप काहीच उत्तर आले नाही, तसेच दिघी पोर्टला खड्डे बुजविण्यासाठी कळवले आहे. स्थानिक जनता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.- मधुकर भालदार,ग्रामसेवक,दिघी ग्रामपंचायतदिघी रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. या मार्गावरून प्रवासी वाहतूक नियमित चालते. रस्ता खराब असल्याने त्याचा परिणाम बसच्या क्षमतेवर होत आहे.- राजेंद्र बडे, एसटीचालक,श्रीवर्धन आगारमी प्रत्येक आठवडासुट्टीला माझी दुचाकी घेऊन मुरुडला गावी जातो. वेळास ते दिघी रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत, वेळीच रस्त्याचे काम केले नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.- संदीप गुरव, रहिवासी, मुरुडदिघी हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे, त्यामुळे तो आमच्या अखत्यारित येत नाही.- श्रीकांत गणगणे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड