शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

परतीच्या पावसाचा भात पिकाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 02:22 IST

पेण तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र १२ हजार ८०० हेक्टर असून, वरच्या भागातील हळवी पिके परिपक्व होऊन कापणीसाठी तयार झालेली आहेत.

पेण : जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस व आॅक्टोबर हिटचे कडक ऊन, त्यामध्ये दिवसा ऊन; सायंकाळी पाऊस, असा दररोजचा पावसाचा खेळ सुरू असतो. कधी मेघगर्जनासह विजांच्या कडकडाटानंतर येणारा हस्त नक्षत्राचा पाऊस जाईपर्यंत शेतकरी तयार झालेले पीक कापणीसाठी सुरुवात करणार नाहीत. हातातोंडाशी आलेले भातपीक सोसाट्याचे वारे व पडणाऱ्या पावसामुळे जमीनदोस्त होत आहे. यामुळे शेतकºयाची चिंता वाढली असून नुकसानीची शक्यता वर्तविली जात आहे.परिपक्व झालेले भातपीक पाण्यात पडल्यास त्यातील तांदूळ खराब होतो व कणसांना अंकुर फुटतो, यामुळे या लहरी पावसाची कायम धास्ती शेतकरी बांधवांनी घेतलेली आहे. पेण तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र १२ हजार ८०० हेक्टर असून, वरच्या भागातील हळवी पिके परिपक्व होऊन कापणीसाठी तयार झालेली आहेत. आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे पश्चिमेकडील भात लागवड क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकांची जमवा जमव करीत भातशेती लागवड केली होती. मात्र, या भागातील भाताचे उत्पादन निम्याने घटले आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य लागते. यासाठी जे पदरात पडेल ते घ्यावे, अशी शेतकºयाची भावना आहे.जुलैपासून लागलेला पाऊस धुवाधार पडल्याने गतवर्षी पडलेल्या सरासरी पावसापेक्षा अडीचपट जास्त सरासरी पाऊस यावर्षी पेणमध्ये झाला. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत दोन वेळा पूर येऊन प्रचंड आर्थिक नुकसान झाले. आता आॅक्टोबर उजाडला तरीही पाऊस जाण्याची चिन्ह दिसत नाहीत. कधी एकदाचा पाऊस परतीच्या मार्गावर जातोय, या प्रतीक्षेत शेतकरी असून पडणारा पाऊस परिपक्व तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान करत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. मंगळवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने पुन्हा एकदा शिवारातील भातशेतीत पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे शेतकºयाला नुकसान होईल, अशी चिंता वाटत आहे.

टॅग्स :Raigadरायगड