शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

परतीच्या पावसाचा भात पिकाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 02:22 IST

पेण तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र १२ हजार ८०० हेक्टर असून, वरच्या भागातील हळवी पिके परिपक्व होऊन कापणीसाठी तयार झालेली आहेत.

पेण : जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस व आॅक्टोबर हिटचे कडक ऊन, त्यामध्ये दिवसा ऊन; सायंकाळी पाऊस, असा दररोजचा पावसाचा खेळ सुरू असतो. कधी मेघगर्जनासह विजांच्या कडकडाटानंतर येणारा हस्त नक्षत्राचा पाऊस जाईपर्यंत शेतकरी तयार झालेले पीक कापणीसाठी सुरुवात करणार नाहीत. हातातोंडाशी आलेले भातपीक सोसाट्याचे वारे व पडणाऱ्या पावसामुळे जमीनदोस्त होत आहे. यामुळे शेतकºयाची चिंता वाढली असून नुकसानीची शक्यता वर्तविली जात आहे.परिपक्व झालेले भातपीक पाण्यात पडल्यास त्यातील तांदूळ खराब होतो व कणसांना अंकुर फुटतो, यामुळे या लहरी पावसाची कायम धास्ती शेतकरी बांधवांनी घेतलेली आहे. पेण तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र १२ हजार ८०० हेक्टर असून, वरच्या भागातील हळवी पिके परिपक्व होऊन कापणीसाठी तयार झालेली आहेत. आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे पश्चिमेकडील भात लागवड क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकांची जमवा जमव करीत भातशेती लागवड केली होती. मात्र, या भागातील भाताचे उत्पादन निम्याने घटले आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य लागते. यासाठी जे पदरात पडेल ते घ्यावे, अशी शेतकºयाची भावना आहे.जुलैपासून लागलेला पाऊस धुवाधार पडल्याने गतवर्षी पडलेल्या सरासरी पावसापेक्षा अडीचपट जास्त सरासरी पाऊस यावर्षी पेणमध्ये झाला. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत दोन वेळा पूर येऊन प्रचंड आर्थिक नुकसान झाले. आता आॅक्टोबर उजाडला तरीही पाऊस जाण्याची चिन्ह दिसत नाहीत. कधी एकदाचा पाऊस परतीच्या मार्गावर जातोय, या प्रतीक्षेत शेतकरी असून पडणारा पाऊस परिपक्व तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान करत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. मंगळवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने पुन्हा एकदा शिवारातील भातशेतीत पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे शेतकºयाला नुकसान होईल, अशी चिंता वाटत आहे.

टॅग्स :Raigadरायगड