शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

परतीच्या पावसाचा भात पिकाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 02:22 IST

पेण तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र १२ हजार ८०० हेक्टर असून, वरच्या भागातील हळवी पिके परिपक्व होऊन कापणीसाठी तयार झालेली आहेत.

पेण : जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस व आॅक्टोबर हिटचे कडक ऊन, त्यामध्ये दिवसा ऊन; सायंकाळी पाऊस, असा दररोजचा पावसाचा खेळ सुरू असतो. कधी मेघगर्जनासह विजांच्या कडकडाटानंतर येणारा हस्त नक्षत्राचा पाऊस जाईपर्यंत शेतकरी तयार झालेले पीक कापणीसाठी सुरुवात करणार नाहीत. हातातोंडाशी आलेले भातपीक सोसाट्याचे वारे व पडणाऱ्या पावसामुळे जमीनदोस्त होत आहे. यामुळे शेतकºयाची चिंता वाढली असून नुकसानीची शक्यता वर्तविली जात आहे.परिपक्व झालेले भातपीक पाण्यात पडल्यास त्यातील तांदूळ खराब होतो व कणसांना अंकुर फुटतो, यामुळे या लहरी पावसाची कायम धास्ती शेतकरी बांधवांनी घेतलेली आहे. पेण तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र १२ हजार ८०० हेक्टर असून, वरच्या भागातील हळवी पिके परिपक्व होऊन कापणीसाठी तयार झालेली आहेत. आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे पश्चिमेकडील भात लागवड क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकांची जमवा जमव करीत भातशेती लागवड केली होती. मात्र, या भागातील भाताचे उत्पादन निम्याने घटले आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य लागते. यासाठी जे पदरात पडेल ते घ्यावे, अशी शेतकºयाची भावना आहे.जुलैपासून लागलेला पाऊस धुवाधार पडल्याने गतवर्षी पडलेल्या सरासरी पावसापेक्षा अडीचपट जास्त सरासरी पाऊस यावर्षी पेणमध्ये झाला. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत दोन वेळा पूर येऊन प्रचंड आर्थिक नुकसान झाले. आता आॅक्टोबर उजाडला तरीही पाऊस जाण्याची चिन्ह दिसत नाहीत. कधी एकदाचा पाऊस परतीच्या मार्गावर जातोय, या प्रतीक्षेत शेतकरी असून पडणारा पाऊस परिपक्व तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान करत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. मंगळवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने पुन्हा एकदा शिवारातील भातशेतीत पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे शेतकºयाला नुकसान होईल, अशी चिंता वाटत आहे.

टॅग्स :Raigadरायगड