शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

माथेरानकर अजूनही ओढताहेत रिक्षा; अमानुष प्रथा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 23:12 IST

पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याची स्थानिकांची मागणी

माथेरान : ब्रिटिशांनी वसवलेले वाहनांना बंदी असलेले भारतातील एकमेव पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आलेल्या माथेरानमध्ये आजही ब्रिटिशकालीन कायदे अस्तित्वात आहेत, त्यामुळे येथे वाहनांना बंदी आहे; पण हे कायदे बदलत्या काळात या पर्यटनस्थळांना तारक आहेत की मारक, ह्याचा पुन्हा विचार होणे गरजेचे आहे. हायटेकच्या या जमान्यात इतर पर्यटनस्थळे अत्याधुनिक होत असताना माथेरान मात्र मागे पडत चालले आहे, येथे आजही माणूस माणसाला हातगाडीत बसवून पोटासाठी खेचून नेण्याची अमानुष प्रथा राबवित आहे.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी यांना माथेरानमध्ये यायचे की नाही, हा प्रश्न सतावू लागला आहे. कारण हातरिक्षा सर्व सामान्य पर्यटकांसाठी खर्चिक वाहन ठरत आहे. एक रिक्षा खेचण्यास तीन माणसे लागत असल्याने साहजिकच त्यांचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत, त्यामुळे नाइलाजाने गरजूना ह्यातून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे एकदा आलेले पर्यटक फक्त महागाईमुळे माथेरानकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळेच ह्याला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक ई-रिक्षा माथेरानमध्ये सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

ब्रिटिश गेल्यानंतर भारत स्वतंत्र झाला; पण माथेरानची गुलामगिरी काही संपलेली नाही. आजही येथील स्थानिक नाइलाजाने फक्त आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातरिक्षा सारखा गुलामगिरीचा व्यवसाय करीत आहेत. माथेरानमध्ये वास्तव्यास असलेले स्थानिक हे येथे ब्रिटिशांनी त्यांच्या बंगल्यांची देखभाल व स्वत:च्या ऐषोआरामाची व्यवस्था पाहण्यासाठी आणलेले लोकच आहेत, त्यांना येथे ना शेतीसाठी जागा दिली गेली, ना राहण्यासाठी स्वत:च्या मालकीची जागा दिली गेली. ज्या घरांमध्ये हे लोक राहत आहेत त्या जागाही भाडेतत्त्वावर देण्यात आल्या जे आजही सुरू आहे. येथे वर्षातून एक-दोन वेळा राहण्यासाठी येणाऱ्या गोऱ्यांना शांतता हवी म्हणून वाहनांना बंदी घातली गेली व बरोबर आणलेल्या मजुरांना घोड्यांच्या जागी जुंपत हातरिक्षा सुरू केल्या. कालांतराने ब्रिटिश तर निघून गेले; पण त्यांनी चढवलेले जोखड आजही माथेरानकरांच्या माथी तसेच आहे; त्यातून सुटका करण्यासाठी येथील लोक केविलवाणी धडपड करीत आहेत. मात्र, सरकारला ही धडपड अजूनही दिसलेली नाही.

गणपती बाप्पाला साकडेदहावीपर्यंत शिक्षणाची सोय असल्याने कसेबसे शिक्षण पूर्ण करून पुढे काहीही भवितव्य नसल्याने हातरिक्षा सारखा रक्ताचे पाणी करणारा व्यवसाय येथील लोक करत आहेत. येथील स्थानिकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यातील बेरोजगारी हा मुख्य प्रश्न वाढत चाललेला आहे. मात्र, त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही.

येथील तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शासनाकडे कोणत्याही योजना नाहीत. माथेरानबाहेर जाऊन शिक्षण घेण्याची सर्वांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ई-रिक्षा हा येथील बेरोजगार तरुणांना एक चांगला पर्याय ठरू शकतो, ई-रिक्षाचे अनेक फायदे माथेरानला लाभू शकतात. यामुळे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी,अपंग पर्यटकांना माथेरानमध्ये येण्यासाठी स्वस्त पर्याय तर मिळणारच आहे; पण येथील बेरोजगारीचा प्रश्नही काही प्रमाणात सुटणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या गुलामगिरीच्या व्यवसायातून येथील स्थानिकांची सुटका होणार आहे, यासाठी माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे हे सरकार दरबारी ई-रिक्षासाठी गेली अनेक वर्षे उंबरठे झिजवत आहेत व त्यांना पाठिंबा मिळावा म्हणून माथेरान चर्मकार समाजाचे अध्यक्ष हेमंत पवार यांनी आपल्या घरी गणपती सजावटीत ई-रिक्षाचा देखावा करून साक्षात गणपतीसच साकडे घालताना हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी प्रार्थना केली.