शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रिक्षा भाडेवाढीचा प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:39 IST

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जीवनाश्यक बाबींच्या दरातही वाढ होत असताना

अलिबाग : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जीवनाश्यक बाबींच्या दरातही वाढ होत असताना आॅटो रिक्षा चालक-मालकांनी भाड्यामध्ये तब्बल १० ते १५ रु पयांनी वाढ केली आहे. त्याचा फटका प्रवाशांच्या खिशाला बसत आहे. तर आॅटो रिक्षामध्ये केलेली दरवाढ अधिकृत नसल्याचे स्पष्टीकरण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांनी केले आहे. त्यामुळे मनमानी पध्दतीने केलेली दरवाढ आॅटो रिक्षा चालक मागे घेतात की नाही, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे.पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या पंधरा दिवसात झालेल्या भरमसाट वाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वाहन चालकांनाही बसला आहे. सरकारच्या विविध निर्णयामुळे जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोल, पासिंग व विम्याच्या वाढत्या दरामुळे रिक्षा चालकांना सध्याचे भाडे परवडण्यासारखे नसल्याने काही रिक्षा चालकांनी गेल्या दिवसांपासून रिक्षा भाड्यात वाढ केली आहे. दहा ते पंधरा रु पयांनी भाडे वाढले आहे.सरकारने गेल्या पंधरा दिवसात भरमसाट पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. ७८ रुपयांवरून थेट ८५ रुपयांपर्यंत पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत, तर डिझेलचे दर ७३ रु पये प्रति लिटर झाले आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यात रिक्षा, मिनीडोर व्यावसायिकांचे हाल होत आहेत. एक लिटर पेट्रोलबरोबरच २० रुपयांचे आॅइलही त्यांना टाकावे लागते. त्यामुळे रिक्षा, मिनीडोरचा व्यवसाय करणेदेखील कठीण होऊन बसले आहे. पेट्रोलच्या वाढत्या दराबरोबरच रिक्षावरील विम्यामध्येही भरमसाट वाढ करण्यात आली आहे. ७०० रु पयांऐवजी १ हजार ४०० रु पये विम्यासाठी मोजण्याची वेळ रिक्षा चालक व मालकांवर आली आहे. तसेच रिक्षा पासिंगचा खर्चही आवाक्याबाहेर आहे. पूर्वी रिक्षा पासिंगसाठी साडेसहा हजार रु पये खर्च यायचा. आता साडेआठ हजार रु पये पासिंगचा खर्च येत असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. त्यात बँकेच्या कर्जाचा हप्ता अशा अनेक समस्यांमुळे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणे रिक्षा व मिनीडोर चालकांना कठीण झाले आहे.सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे रिक्षा व मिनीडोर व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. दहा ते पंधरा रुपयांनी वाढ केल्याचे रिक्षा व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे. रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहनही व्यावसायिकांकडून करण्यात आले आहे. रिक्षा चालक- मालकांनी सरकार अथवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्यामुळे त्यांनी केलेली भाववाढ अनधिकृत ठरत आहे.सरकारने रिक्षाचे परमीट देताना कोणताच विचार केलेला नाही. मागेल त्याला परमीट दिल्याने ज्याची आर्थिक परिस्थितीत चांगली आहे त्यांनीही परमीट घेतले आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.२०१२ पासून आम्ही दरवाढ केलेली नाही. त्यावेळी पेट्रोलचा दर ५४ रुपये होता. आता पेट्रोलचा दर ८५ रु पये आहे. प्रशासनाकडे दरवाढीबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु अद्यापही त्यावर विचार झालेला नाही. त्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागली आहे, असे अलिबाग आॅटो व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.आॅटो रिक्षाचे भाडे वाढवण्याबाबत कोणतीच सूचना अथवा आदेश प्राप्त झालेले नाहीत. आॅटो रिक्षा चालक-मालकांनी दर वाढवले असतील, तर त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यात येईल.- ऊर्मिला पवार, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी