शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

रिक्षा भाडेवाढीचा प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:39 IST

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जीवनाश्यक बाबींच्या दरातही वाढ होत असताना

अलिबाग : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जीवनाश्यक बाबींच्या दरातही वाढ होत असताना आॅटो रिक्षा चालक-मालकांनी भाड्यामध्ये तब्बल १० ते १५ रु पयांनी वाढ केली आहे. त्याचा फटका प्रवाशांच्या खिशाला बसत आहे. तर आॅटो रिक्षामध्ये केलेली दरवाढ अधिकृत नसल्याचे स्पष्टीकरण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांनी केले आहे. त्यामुळे मनमानी पध्दतीने केलेली दरवाढ आॅटो रिक्षा चालक मागे घेतात की नाही, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे.पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या पंधरा दिवसात झालेल्या भरमसाट वाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वाहन चालकांनाही बसला आहे. सरकारच्या विविध निर्णयामुळे जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोल, पासिंग व विम्याच्या वाढत्या दरामुळे रिक्षा चालकांना सध्याचे भाडे परवडण्यासारखे नसल्याने काही रिक्षा चालकांनी गेल्या दिवसांपासून रिक्षा भाड्यात वाढ केली आहे. दहा ते पंधरा रु पयांनी भाडे वाढले आहे.सरकारने गेल्या पंधरा दिवसात भरमसाट पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. ७८ रुपयांवरून थेट ८५ रुपयांपर्यंत पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत, तर डिझेलचे दर ७३ रु पये प्रति लिटर झाले आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यात रिक्षा, मिनीडोर व्यावसायिकांचे हाल होत आहेत. एक लिटर पेट्रोलबरोबरच २० रुपयांचे आॅइलही त्यांना टाकावे लागते. त्यामुळे रिक्षा, मिनीडोरचा व्यवसाय करणेदेखील कठीण होऊन बसले आहे. पेट्रोलच्या वाढत्या दराबरोबरच रिक्षावरील विम्यामध्येही भरमसाट वाढ करण्यात आली आहे. ७०० रु पयांऐवजी १ हजार ४०० रु पये विम्यासाठी मोजण्याची वेळ रिक्षा चालक व मालकांवर आली आहे. तसेच रिक्षा पासिंगचा खर्चही आवाक्याबाहेर आहे. पूर्वी रिक्षा पासिंगसाठी साडेसहा हजार रु पये खर्च यायचा. आता साडेआठ हजार रु पये पासिंगचा खर्च येत असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. त्यात बँकेच्या कर्जाचा हप्ता अशा अनेक समस्यांमुळे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणे रिक्षा व मिनीडोर चालकांना कठीण झाले आहे.सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे रिक्षा व मिनीडोर व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. दहा ते पंधरा रुपयांनी वाढ केल्याचे रिक्षा व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे. रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहनही व्यावसायिकांकडून करण्यात आले आहे. रिक्षा चालक- मालकांनी सरकार अथवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्यामुळे त्यांनी केलेली भाववाढ अनधिकृत ठरत आहे.सरकारने रिक्षाचे परमीट देताना कोणताच विचार केलेला नाही. मागेल त्याला परमीट दिल्याने ज्याची आर्थिक परिस्थितीत चांगली आहे त्यांनीही परमीट घेतले आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.२०१२ पासून आम्ही दरवाढ केलेली नाही. त्यावेळी पेट्रोलचा दर ५४ रुपये होता. आता पेट्रोलचा दर ८५ रु पये आहे. प्रशासनाकडे दरवाढीबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु अद्यापही त्यावर विचार झालेला नाही. त्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागली आहे, असे अलिबाग आॅटो व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.आॅटो रिक्षाचे भाडे वाढवण्याबाबत कोणतीच सूचना अथवा आदेश प्राप्त झालेले नाहीत. आॅटो रिक्षा चालक-मालकांनी दर वाढवले असतील, तर त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यात येईल.- ऊर्मिला पवार, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी