शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दूषित सांडपाण्यामुळे भातशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:44 IST

रिलायन्स कंपनीतून धरमतर खाडीकडे सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनला शिहू ग्रामपंचायत हद्दीतील आटीवली, गांधे भागात गळती लागली आहे.

नागोठणे : येथील रिलायन्स कंपनीतून धरमतर खाडीकडे सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनला शिहू ग्रामपंचायत हद्दीतील आटीवली, गांधे भागात गळती लागली आहे. यामुळे काहीअंशी हातात आलेली भातशेती नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.येथील रिलायन्स कंपनीतून निघणारे रसायनमिश्रीत दूषित पाणी समुद्रात नेण्यासाठी कंपनी ते धरमतर खाडीपर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ही पाइपलाइन बहुतांशी या मार्गातील शेतांमधूनच टाकण्यात आली आहे. ही वाहिनी जीर्ण झाली असल्याने अनेकदा फुटत असते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. या वर्षी पावसाने तयार झालेले भाताचे पीक शेतकºयांच्या हातातून गेले असताना उरले सुरले पीकही ही सांडपाणीवाहिनी फुटल्याने भिजले आहे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. याचा फटका आटीवलीतील ठकीबाई हिरू पाटील, विठाबाई रामदास पाटील, शांताराम गोविंद पाटील, बाळाराम पदू पाटील, दामोदर कमळ्या म्हात्रे, यशवंत अंबाजी गदमले आणि गांधे गावातील हिराचंद्र हाशा गदमले, लता देवराम गदमले, भाऊ रामा गदमले या शेतकºयांना बसला आहे.येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल यांच्या म्हणण्यानुसार या वाहिनीतून रात्रीच्या दरम्यान उच्चदाबाने सांडपाणी सोडले जाते व या गळतीमुळे हे पाणी शेतात पसरते, असे त्यांनी स्पष्ट केले. ही सांडपाणीवाहिनी अनेकदा फुटत असल्याने शेती नापीक व्हायची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. वाहिनीची गळती झाल्यानंतर कंपनीकडून तुटपुंजी अशी नुकसानभरपाई दिली जात असल्याने हा प्रकार थांबविण्यासाठी आटीवली, गांधे, मुंढाणी, चोळे भागातील शेतकºयांच्या सहकार्यातून लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतात असणाºया तलावातील मासळीही या दूषित पाण्यामुळे मृत झाली असल्याचे एका शेतकºयाने सांगितले. शेतात कापून ठेवलेली भातशेती बाहेर काढण्यासाठी शेतात जाणे गरजेचे असते. मात्र, शेतात हे दूषित सांडपाणी साचून राहत असल्याने आत गेल्यावर अंगाला खाज सुटते, फोड येतात, असे शेतकºयांनी सांगितले. या सांडपाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणार असल्याचे वसंत मोकल यांनी सांगितले. याबाबत रिलायन्स कंपनीच्या एका जबाबदार अधिकाºयांशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.