शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

दूषित सांडपाण्यामुळे भातशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:44 IST

रिलायन्स कंपनीतून धरमतर खाडीकडे सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनला शिहू ग्रामपंचायत हद्दीतील आटीवली, गांधे भागात गळती लागली आहे.

नागोठणे : येथील रिलायन्स कंपनीतून धरमतर खाडीकडे सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनला शिहू ग्रामपंचायत हद्दीतील आटीवली, गांधे भागात गळती लागली आहे. यामुळे काहीअंशी हातात आलेली भातशेती नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.येथील रिलायन्स कंपनीतून निघणारे रसायनमिश्रीत दूषित पाणी समुद्रात नेण्यासाठी कंपनी ते धरमतर खाडीपर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ही पाइपलाइन बहुतांशी या मार्गातील शेतांमधूनच टाकण्यात आली आहे. ही वाहिनी जीर्ण झाली असल्याने अनेकदा फुटत असते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. या वर्षी पावसाने तयार झालेले भाताचे पीक शेतकºयांच्या हातातून गेले असताना उरले सुरले पीकही ही सांडपाणीवाहिनी फुटल्याने भिजले आहे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. याचा फटका आटीवलीतील ठकीबाई हिरू पाटील, विठाबाई रामदास पाटील, शांताराम गोविंद पाटील, बाळाराम पदू पाटील, दामोदर कमळ्या म्हात्रे, यशवंत अंबाजी गदमले आणि गांधे गावातील हिराचंद्र हाशा गदमले, लता देवराम गदमले, भाऊ रामा गदमले या शेतकºयांना बसला आहे.येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल यांच्या म्हणण्यानुसार या वाहिनीतून रात्रीच्या दरम्यान उच्चदाबाने सांडपाणी सोडले जाते व या गळतीमुळे हे पाणी शेतात पसरते, असे त्यांनी स्पष्ट केले. ही सांडपाणीवाहिनी अनेकदा फुटत असल्याने शेती नापीक व्हायची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. वाहिनीची गळती झाल्यानंतर कंपनीकडून तुटपुंजी अशी नुकसानभरपाई दिली जात असल्याने हा प्रकार थांबविण्यासाठी आटीवली, गांधे, मुंढाणी, चोळे भागातील शेतकºयांच्या सहकार्यातून लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतात असणाºया तलावातील मासळीही या दूषित पाण्यामुळे मृत झाली असल्याचे एका शेतकºयाने सांगितले. शेतात कापून ठेवलेली भातशेती बाहेर काढण्यासाठी शेतात जाणे गरजेचे असते. मात्र, शेतात हे दूषित सांडपाणी साचून राहत असल्याने आत गेल्यावर अंगाला खाज सुटते, फोड येतात, असे शेतकºयांनी सांगितले. या सांडपाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणार असल्याचे वसंत मोकल यांनी सांगितले. याबाबत रिलायन्स कंपनीच्या एका जबाबदार अधिकाºयांशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.