शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

जिल्ह्यात भाताचे क्षेत्र घटले, उत्पादकता वाढली

By निखिल म्हात्रे | Updated: December 3, 2023 17:56 IST

जिल्ह्यात प्रती हेक्टरी ४० क्विंटल एवढे भात उत्पादन मिळाले आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग  - वाढत्या औद्योगिकरणामुळे रायगड जिल्ह्यातील भात पिकाचे लागवड क्षेत्र घटत असले तरी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भात पिकाची उत्पादकता वाढली आहे. अनियमित पावसामुळे यावर्षी भाताची उत्पादनात घट होईल असा अदांज व्यक्त केला जात होता. मात्र कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत भाताच्या उतादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात प्रती हेक्टरी ४० क्विंटल एवढे भात उत्पादन मिळाले आहे.

सरासरीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडला. पण पावसाचे प्रमाण अनियमित होते. जुन आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली. तर जुलै आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. पावसाच्या या अनियमीत पणामुळे भात पिकावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण भात लागवड आणि कापणी प्रयोगावरून तसे झाल्याचे दिसून येत नाही.

रायगड जिल्ह्यात १ लाख ५ हजार हेक्टर येवढे भात लागवडीखालील क्षेत्र आहे. यावर्षी यापैकी ८९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. वाढते औद्योगिकरण, मजुरांची कमतरता यामुळे भात लागवडीखालील क्षेत्रात घट झाली. मात्र नैसर्गिक तसेच तांत्रिक संकट येऊनही जिल्ह्यातील भाताच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात भाताची उत्पादकता तपासण्यासाठी कृषी विभागाकडून १५ तालुक्यात ३०० पिककापणी प्रयोग घेण्यात आले. अद्याप काही पिक कापणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. पण जे अहवाल प्राप्त झाले. त्यात भाताची उत्पादकता वाढल्याचे दिसून आले आहे. मळणी आणि झोडपणीनंतर भाताची उत्पादकता प्रती हेक्टरी ४० क्विंटल येवढी मिळाली आहे. गेल्या वर्षी ही प्रती हेक्टरी ३८ क्विंटल येवढी होती. म्हणजेच यंदा हेक्टरी जवळपास २ क्विंटल उत्पादकता वाढली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्षी भाताची उत्पादकता वाढल्याचे या पिक कापणी प्रयोगांच्या निष्कर्षावरून सिध्द होत आहे.जिल्ह्यात ३६ लाख मेट्रीक टन भाताचे उत्पादन -

रायगड जिल्ह्यात यंदा ८९ हजार ६०० हेक्टरवर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. पिक कापणी नुसार सरासरी हेक्टरी ४० क्विंटल येवढे उत्पादन मिळाले आहे. म्हणजेच यावर्षी जिल्ह्यात ३६ लाख मेट्रीक टन येवढे विक्रमी भाताचे उत्पादन झाले आहे. राज्यातील इतर भागात परतीच्या पावसाचा फटका बसला असला तरी यावर्षी कोकणात परतीच्या पावसाचा फारसा त्रास झालेला नाही. त्यामुळे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. शेतकरी समाधानी आहेत.कृषी विभागाने पिक कापणी प्रयोग घेतले होते. त्यात यावर्षी भाताची उत्पादकता गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली असल्याचे दिसून आले आहे. अजून काही तालुक्यांचे पिक कापणी प्रयोग अहवाल येणे बाकी आहे. पण यंदा भाताचे उत्पादन वाढेल असेल प्राप्त आकडेवारीवरून दिसते आहे. - उज्वला बाणखेले, कृषी अधिक्षक, रायगड

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र