शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

आढावा बैठकीत पालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 04:56 IST

दिरंगाईबाबत पालकमंत्र्यांनी भरला सज्जड दम : अचानक बैठक; अधिकाºयांची तारांबळ

आविष्कार देसाई 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, ती कामे होत आहेत की नाही, त्यांची सध्या काय स्थिती आहे याची माहिती घेण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी अचानक आढावा बैठक बोलावली. त्यामुळे सर्व अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली. आढावा घेताना अधिकाºयांच्या गोल-गोल उत्तरावर पालकमंत्र्यांनी अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढून कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी भरला.

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा बैठकीमध्ये विविध योजनांवर सखोल चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने मानकुळे आणि रेवस पाणीपुरवठ्याच्या कामाबाबत पदाधिकाºयांच्या बºयाच तक्र ारी आल्या होत्या. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वैगुर्लेकर यांनी गोल-गोल उत्तर देण्यास सुरु वात केली. त्यावेळी पालक मंत्र्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेत पाण्याच्या प्रश्नाबाबत कोणतीही सबब चालणार नाही, असे अधिकाºयांना खडसावले. पाणीपुरवठ्याच्या किती योजना सुरू आहेत याचा साधा आकडाही त्यांच्याकडे नसल्याने बैठकीमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम १ जानेवारी २0१९ पर्यंत पूर्ण करण्यात यावे असे आदेश पालक मंत्र्यांनी अधिकाºयांना दिले.जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न या बैठकीत सर्वांनीच उचलून धरला. मात्र, जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे असमाधानकारक काम झाल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रश्नावर बांधकाम अधिकारीही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.

कोलाड-नागोठणे असा मार्ग असतानाही अलिबाग तालुक्यातील नागाव-रायवाडी या मार्गावरून अवजड वाहतूक करण्यात येत आहे. या मार्गावरून जाणारी अवजड वाहतूक बंद करावी अशी लेखी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर यांनी बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र, याकडे अधिकाºयांनी लक्ष दिले नाही. अवजड वाहतूक बंद करण्याची पुन्हा मागणी करण्यात आली.अलिबाग तालुक्यातील शिरवली-माणकुळे या रस्त्याचे काम गेले कित्येक दिवस अपूर्ण आहे. या कामाची गती वाढविण्यासाठी दर १५ दिवसांनी शिरवली-माणकुळे या रस्त्याच्या कामांचा अहवाल पाठविण्याचे आदेशही पालक मंत्र्यांनी बांधकाम अधिकाºयांना दिले.नुकसानी पंचनामे तातडीने कराच्आठवडाभरापूर्वी झालेल्या वादळामुळे अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले. कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा सज्जड दमच त्यांनी अधिकाºयांना भरला.च्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर,जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार यांच्यासह प्रत्येक विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.अधिकाºयांनी दिली खोटी माहितीच्अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सोलार सिस्टीमवर उभारलेली पत्र्याची शेड काढावी, अशी मागणीही करण्यात आली. मात्र, अशी कोणतीच शेड अस्तित्वात नसल्याचे दिशाभूल करणारे उत्तर बांधकाम अधिकाºयांनी दिले. त्यामुळे खोटी माहिती देणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.च्जिल्हास्तरावर होणाºया विविध शासकीय बैठकांमध्ये ज्या समस्या चर्चेसाठी येतात त्यावेळी संबंधित शासकीय अधिकारी केवळ, बैठकीतील उत्तरे देत असतात. त्यावेळी होणाºया कार्यवाहीच्या आदेशांची पूर्तता झाली किंवा नाही याबाबत जनसामान्यांना माहिती होत नाही. अशीच परिस्थिती शुक्रवारी अचानक झालेल्या आढावा बैठकीत थेट पालकमंत्री चव्हाण यांनाच अनुभवास आल्याने त्यांनी सक्त आदेशांची सरबत्तीच केली. 

टॅग्स :Raigadरायगड