शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

महसूल प्रशासनाला रिक्त पदांचे ग्रहण, ‘कॉस्ट कटिंग’मुळे पदे भरता येणार नसल्याचे सरकारकडून जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 02:55 IST

रायगड जिल्हा महसूल प्रशासनाला रिक्त पदांचे लागलेले ग्रहण सुटता सुटत नाही. लिपीक, टंकलेखक, तलाठी, शिपाई, वाहन चालक यांच्यासह अन्य २१९ पदे रिक्त असल्याने महसुलाचा गाडा ओढताना प्रशासन चांगलेच मेटाकुटीला आले आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्हा महसूल प्रशासनाला रिक्त पदांचे लागलेले ग्रहण सुटता सुटत नाही. लिपीक, टंकलेखक, तलाठी, शिपाई, वाहन चालक यांच्यासह अन्य २१९ पदे रिक्त असल्याने महसुलाचा गाडा ओढताना प्रशासन चांगलेच मेटाकुटीला आले आहे. सातत्याने सरकारकडे याबाबतचा अहवाल देऊन सुध्दा ‘कॉस्ट कंटींगमुळे’ ही पदे भरता येणार नसल्याचे सरकारने आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारी नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या सुशिक्षीत बेरोजगारांचा भ्रमनिरास झाल्याचे बोलले जाते.केंद्र सरकाने दोन दिवसांपूर्वी रिक्त पदांबाबत सर्व मंत्रालय आणि विविध कार्यालयांकडून अहवाल मागीतला आहे. रिक्त असणारी सर्व पदे रद्द करण्याबाबत केंद्र सरकार गांभिर्याने विचार करीत आहे. त्यामुळे तेच धोरण राज्य सरकाने स्विकारले, तर राज्यातील हजोरोंच्या संख्येने पदे रद्द होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.रायगड जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील १५ तालुक्यातील कारभारावर लक्ष ठेवावे लागते. दैनंदिन कामांबरोबरच जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याचे महत्वाचे कार्य या विभागाला करावे लागते. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन सरकराने ते जिल्हा प्रशासनाला देऊ केले होते. मात्र कालांतराने निवृत्त झालेले कर्मचारी आणि पदोन्नतीमुळे काही पदे रिक्त झाली आहेत. केंद्र सरकाने दोन दिवसांपूर्वी रिक्त पदांबाबत सर्व मंत्रालय आणि विविध कार्यालयांकडून अहवाल मागीतला आहे. रिक्त असणारी सर्व पदे रद्द करण्याबाबत केंद्र सरकार गांभिर्याने विचार करीत आहे. त्यामुळे तेच धोरण राज्य सरकाने स्विकारले, तर राज्यातील हजोरोंच्या संख्येने पदे रद्द होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.ग्रामिण भागातून महसूल गोळा करण्याची महत्वाची भूमिका बजावणारे तलाठी ३३१ आहेत, तर ३९ तलाठ्यांची अद्याप जिल्ह्याला गरज आहे. तलाठ्यांची ३७० पदे सरकारने मंजूर केलेली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची फारच तारांबळ उडते. कामे उरकण्यासाठी त्यांना एकाच पदावरील व्यक्तीकडे दोन-तीन कामांचा अधीक भार द्यावा लागत आहे. एकाच व्यक्तीवर कामाचा जादा ताण येत असल्याने कामामध्ये गुणवत्ता ठेवताना त्यालाही तारेवरची कसरतच करावी लागते. ज्यादा कामामुळे अतिरिक्त काम करावे लागत असल्याने कर्मचाºयांना आपल्या कुटुंबालाही वेळ देता येत नसल्याने त्यांच्या आरोग्यासह मानसिकतेवर परिणाम होत असल्याची खंत काही कर्मचाºयांनी बोलून दाखवली.सरकारने नव्याने नोकरभरती न करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच कॉस्ट कंटीगमुळे रिक्त पदांनाही ग्रहण लागले आहे. सरकारी नोकरी मिळावी यासाठी मोठ्या संख्येने तरुण सरकारी नोकरीच्या जाहीरातीकडे डोळे लावून बसलेले आहेत. परंतु सरकार रिक्त पदांबाबत उदासिन असल्याने ती भरत नसल्याची ओरड केली जात आहे. सरकारने किमान रिक्त पदे भरली, तरी काही अंशी बेरोजगारी संपण्यास मदत होणार आहे. सरकारने तातडीने या बाबींचा विचार करावा अशी मागणी होत आहे.जिल्ह्यातील रिक्त पदेजिल्ह्यासह तालुक्याच्या कानाकोपºयात तातडीने पोचण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही सरकराने केली आहे. मात्र वाहनचाकांची भरती न केल्याने ७७ पदे रिक्त आहेत.वाहन चालकांची ६३३ पदे मंजूर आहेत, तर ५५७ पदांवर वाहनचालक कार्यरत आहेत. टेंबलांवरुन फाईलींचा प्रवास ज्या व्यक्तीच्या माध्यमातून होतो. त्या शिपाई संर्वगाची १३८ पदे मंजूर आहेत, परंतु फक्त १२३ पदेच भरलेली आहेत, तर १५ वाहन चालाकांची अद्यापही प्रशासनाला गरज आहे.रखवालदार १९ पदे भरलेली आहेत, तर चार पदे रिक्त आहेत. स्वच्छकांच्या बाबतीमध्येही १६ पदे मंजूर असताना केवळ १२ स्वच्छकच कामावर आहेत. उर्वरीत चार पदे रिक्त आहेत.गोदाम पहारेकºयांच्या ३२ पैकी २९ पदे भरलेली आहेत, तर तीन पदे रिक्त आहेत. हमाल कम स्विपर यांची १६ पैकी १५ पद भरलेली आहेत, तर एकच पद रिक्त आहेत.