शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

सेझसाठी घेतलेल्या जमिनी परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:07 IST

हाशिवरे येथील सभेत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची मागणी

रायगड : जिल्ह्यात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी घेतलेल्या जमिनी सरकारने शेतकऱ्यांना परत कराव्यात, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली. कामगार आणि कृषी कायद्याला विराेध करण्यासाठी आमदार पाटील हे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये जाऊन कामगार आणि शेतकऱ्यांची माेट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील सभेत ते बाेलत हाेते.

शेकापने प्रदीर्घ लढे देऊन कूळ कायद्याचे हक्क मिळवले आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणून त्यांना देशाेधडीला लावण्याचे काम माेदी सरकार करत आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले. कामगार कायद्यामुळे कंपनीचे मालक हे आपल्या कामगारांना कामावरून थेट काढून टाकू शकतात. हा कामगारांवर अन्याय करणारा कायदा आहे. अतिशय गंभीर प्रश्नांवर सरकारला जाब विचारणे गरजेचे आहे. याचसाठी २६ नाेव्हेंबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी भारतबंदची हाक देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी आणि कामगारविराेधी कायद्याविराेधात सर्वांनी पेटून उठणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे बाधित झालेेेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई तातडीने द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मीनल माळी, मनोज धुमाळ, सिद्धनाथ पाटील यांंच्यासह खारेपाठ विभागातील कार्यकर्ते  उपस्थित होते.

केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द करावा !

शेतकरी आणि कामगारांविरोधात केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द करण्याच्या मागणीसह जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये साडेबावीस टक्के विकसित भूखंडासह सर्व लाभ मिळावेत, अशी मागणी केली. दहा वर्षांपूर्वी सरकारने  विशेष आर्थिक क्षेत्राच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत.

शेतकऱ्यांकडून हजाराे हेक्टर जमिनी घेतल्या आहेत. त्या ठिकाणी काेणताच प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या जमिनी तातडीने शेतकऱ्यांना परत कराव्यात, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली. 

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी