शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सेझसाठी घेतलेल्या जमिनी परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:07 IST

हाशिवरे येथील सभेत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची मागणी

रायगड : जिल्ह्यात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी घेतलेल्या जमिनी सरकारने शेतकऱ्यांना परत कराव्यात, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली. कामगार आणि कृषी कायद्याला विराेध करण्यासाठी आमदार पाटील हे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये जाऊन कामगार आणि शेतकऱ्यांची माेट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील सभेत ते बाेलत हाेते.

शेकापने प्रदीर्घ लढे देऊन कूळ कायद्याचे हक्क मिळवले आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणून त्यांना देशाेधडीला लावण्याचे काम माेदी सरकार करत आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले. कामगार कायद्यामुळे कंपनीचे मालक हे आपल्या कामगारांना कामावरून थेट काढून टाकू शकतात. हा कामगारांवर अन्याय करणारा कायदा आहे. अतिशय गंभीर प्रश्नांवर सरकारला जाब विचारणे गरजेचे आहे. याचसाठी २६ नाेव्हेंबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी भारतबंदची हाक देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी आणि कामगारविराेधी कायद्याविराेधात सर्वांनी पेटून उठणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे बाधित झालेेेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई तातडीने द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मीनल माळी, मनोज धुमाळ, सिद्धनाथ पाटील यांंच्यासह खारेपाठ विभागातील कार्यकर्ते  उपस्थित होते.

केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द करावा !

शेतकरी आणि कामगारांविरोधात केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द करण्याच्या मागणीसह जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये साडेबावीस टक्के विकसित भूखंडासह सर्व लाभ मिळावेत, अशी मागणी केली. दहा वर्षांपूर्वी सरकारने  विशेष आर्थिक क्षेत्राच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत.

शेतकऱ्यांकडून हजाराे हेक्टर जमिनी घेतल्या आहेत. त्या ठिकाणी काेणताच प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या जमिनी तातडीने शेतकऱ्यांना परत कराव्यात, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली. 

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी