शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी ही तटरक्षक दलाची, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:28 IST

समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी ही तटरक्षक दलाचीच आहे, असे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

आविष्कार देसाईअलिबाग : समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी ही तटरक्षक दलाचीच आहे, असे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गुरुवारी खोल समुद्रामध्ये एलईडी मासेमारी करणारे आणि ट्रेलरच्या माध्यमातून मासेमारी करणाºया दोन गटांमध्ये संघर्ष झाला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यस्थेबरोबरच प्रामुख्याने सुरक्षेचा प्रश्नही त्यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी एलईडीच्या माध्यमातून मासेमारी करणाºया तीन बोटमालकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.गुरुवारी भरसमुद्रात दोन मासेमारी करणाºया गटांमध्ये उफाळून आलेल्या संघर्षामध्ये काही मासेमारी करणारे जखमी झाले आहेत. पैकी एकाला अलिबाग येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गुरुवारी झालेल्या या घटनेने सर्वच यंत्रणांना खडबडून जागे केले आहे. स्थानिक पातळीवर उफाळून आलेला संघर्ष एवढेच या घटनेचे गांभीर्य नाही, तर परराज्यातील अथवा परदेशातील मासेमारी करणाऱ्यांमध्ये असा संघर्ष झाला असता किंवा त्यांच्या आडून अन्य कोणी काही घातपात केला असता तर हे प्रकरण नक्की कोणी आणि कसे हातळले असते, असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे.बोडणी येथील मासेमारी बोटीतील खलाशी हे आपल्यावर हल्ला होणार या भीतीने गार झाले होते. त्यांनी अख्खी रात्र ही बोटीतच घालवली. सकाळी ९ वाजता ते आपल्या घरी पोहोचले. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासकीय मदत पोहोचलीच नाही, तसेच सोबतच्या बोटीही त्यांच्या जवळ काही वेळाने पोहोचल्या. त्यामुळे त्यातील भरत कोळी यांच्यासह त्यांच्या सहकाºयांना मारहाण झाली होती.सदरची घटना ही १२ नॉटिकल माइल्सच्या पुढे घडलेली असल्याने रायगड पोलिसांनी आधीच हात वर करत हे प्रकरण यलोगेट पोलिसांच्या मैदानात टोलवले होते; परंतु त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तक्रार घेण्याची तयारी दर्शवली. मात्र, दोन गटांमध्ये समेट होण्याच्या शक्यतेने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी ही तटरक्षक दलाची आहे. हा स्थानिकांमधील वाद असल्याने कदाचित त्यांनी तसे सांगितले असेल, असे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. मी गुरुवारी रात्री त्यांना घटनेचे गांभीर्य सांगितले. त्यानंतर त्यांनी बोटींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. नौदलाच्या हेलिकॉप्टरमधूनही तपास करण्याची तयारी त्यांनी दाखवल्याकडे सूर्यवंशी यांनी लक्ष वेधले.>अशा कारवाई हाणून पाडू - अरु ण कु मारभारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट अरुण कुमार यांच्याशी संपर्क साधला असता याबाबतची जबाबदारी ही मत्स्यव्यवसाय अधिकारी यांची आहे, असे त्यांनी सांगितले. सुरक्षेच्या बाबतीमध्ये अन्य काही घडले असते तर त्या सुरक्षेची जबाबदारी निश्चितपणे आमचीच आहे; परंतु तसे काहीच घडू देणार नाही, अशा कारवाई हाणून पाडण्यात तटरक्षक दल सक्षम आहे, असेही अरुण कुमार यांनी स्पष्ट केले.आम्हाला माहिती मिळाली होती; परंतु मासेमारी करणाºयांना माघारी बोलावले आहे. त्यांची तक्रार घेण्यात येणार आहे, असे रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी आम्हाला कळवले होते.