शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘विविध योजनांद्वारे विकासाचा संकल्प’

By admin | Updated: November 16, 2016 04:36 IST

केंद्रासह राज्यात भाजपाचे सरकार असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विविध योजना घेऊन आम्ही विकास करण्याचा संकल्प केला

मुरुड : केंद्रासह राज्यात भाजपाचे सरकार असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विविध योजना घेऊन आम्ही विकास करण्याचा संकल्प केला आहे. आगामी नगरपरिषदेत स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तींना मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन राज्याचे नगरविकासमंत्री प्रकाश मेहता यांनी केले. मुरुड नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रथमच रिंगणात उतरलेल्या भाजपाची भूमिका स्पष्ट करताना पत्रकार परिषदेत मेहता बोलत होते.मुरु ड नगरपरिषदेला नगरविकास फंडातून २ कोटींचा निधी देताना कधीही पक्षीय विचार आणला नाही, आणणार नाही, कारण विकासाचा संकल्प घेऊन भाजपा देशभरात कार्यरत असल्याचे सांगून देशातील जनतेच्या मनात आशादायी चित्र निर्माण होत आहे, याबद्दल आनंद वाटतो. ३० वर्षांच्या राजकीय जीवनाचा अनुभव सार्थकी लागल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युतीचे १०० टक्के प्रयत्न झालेत; परंतु मित्र पक्षाला रायगडात कमळ फुलू द्यायचे नाही, असा टोला त्यांनी लगावला. शेकापचा समाचार घेताना मेहता म्हणाले की, शेकापचे राजकारण सोयीचे असते. दोन-तीन तालुक्यांपुरता पक्ष कधीही अधिकृत विरोधी पक्ष होऊ शकत नाही, याचा जनतेने विचार करावा.मुरु ड तालुक्यात आठवड्यात सुमारे ५० हजार पर्यटक येतात. ही संख्या १ लाखापर्यंत गेली पाहिजे जेणेकरून भूमिपुत्रांना रोजगार, व्यवसाय मिळेल. रस्ते व्यवस्थापन सुधारण्यासाठी शासन स्तरावर गांभीर्याने प्रयत्न करत आहे. छ. शिवरायांच्या रायगडावर शिवसृष्टी उभारण्यासाठी शासनाने ५२७ कोटींची तरतूद केल्याचे सांगून देश-विदेशातील पर्यटकांचे ते आकर्षण ठरेल याची त्यांनी ग्वाही दिली.याप्रसंगी आम. प्रशांत ठाकूर, निवडणूक प्रभारी नंदकुमार पटवर्धन, रायगड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी आदी उपस्थित होते.