शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शरदवाडी, गौळमाल ठाकूरवाडीतील ग्रामस्थांनी के ला दारूबंदीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:30 IST

सुधागड तालुक्यातील आडूळसे ग्रामपंचायत हद्दीत येणा-या तसेच गावठी दारूचे माहेरघर समजले जाणाºया शरदवाडी व गौळमाल ठाकूरवाडी येथील गावठी दारूबंदीसाठी ग्रामस्थांसह महिलांनी कंबर कसली आहे. दारूबंदी केल्याशिवाय शांत बसणार नाही असा पक्का निर्धार त्यांनी केला आहे .

पाली : सुधागड तालुक्यातील आडूळसे ग्रामपंचायत हद्दीत येणा-या तसेच गावठी दारूचे माहेरघर समजले जाणाºया शरदवाडी व गौळमाल ठाकूरवाडी येथील गावठी दारूबंदीसाठी ग्रामस्थांसह महिलांनी कंबर कसली आहे. दारूबंदी केल्याशिवाय शांत बसणार नाही असा पक्का निर्धार त्यांनी केला आहे .दारूबंदीसाठी आडूळसे ग्रामपंचायतीचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शरद फोंडे यांच्या प्रयत्नातून नुकतीच शरदवाडी येथे पोलीस, वनविभाग व ग्रामस्थ अशी संयुक्त बैठक घेण्यात आली होती. यावेळी पाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण, पोलीस नाईक मनोहर पाटील, वनपाल आर.व्ही. नागोठकर, आडूळसे सरपंच भाऊ कोकरे, सदस्य तानाजी बांगारे आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत तंटामुक्त अध्यक्ष शरद फोंडे यांनी माहिती देताना सांगितले की, २००८ साली याच वाडीवरती खूप मोठे स्पिरीट कांड झाले होते. त्यामध्ये २६ आदिवासी बांधवांचे बळी गेले असताना देखील येथील गावठी दारूचे धंदे आजही राजरोसपणे सुरूच आहेत. याविरोधात ग्रामस्थांनी अनेकदा पाली पोलीस ठाणे, दारू उत्पादन शुल्क विभाग अलिबाग यांना तक्र ारी अर्ज देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप फोंडे यांनी केला. तसेच या दोन वाड्यांवरूनच संपूर्ण सुधागड तालुक्याला गावठी दारू पुरविली जाते, असेही त्यांनी सांगितले. सरपंच कोकरे यांनी या दारूधंद्यामुळे आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील अनेक पुरु ष व महिला यांच्यासह तरुण देखील व्यसनाधीन होऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पालीचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी या वाड्यावर अनेकदा व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करून देखील काहीही फरक पडलेला नसल्याचे सरपंचांनी सांगितले.पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी यापुढे या दोन्हीही वाड्यावरती चालणारे गावठी दारूचे धंदे व दारू तयार करण्यात येणाºया हातभट्ट्या जंगलभागात कुठेही असतील तेथे आम्ही व वनविभागाचे अधिकारी जाऊन त्या उद्ध्वस्त करू व दारू तयार करणाºयांवर कायदेशीर खटले भरण्यात येतील. गावठी दारू तयार करण्याचे काम हे सर्रासपणे घनदाट जंगलभागातून होत असल्याने अनेकदा त्याभागातील जंगलांना वणवे लागतात. खूप मोठ्या प्रमाणात वनसंपदेचा ºहास होत आहे त्यामुळे हे धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचे काम वनविभागाकडून देखील आम्ही सुरु केले आहे, असे वनपाल नागोठणेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड