शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

शरदवाडी, गौळमाल ठाकूरवाडीतील ग्रामस्थांनी के ला दारूबंदीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:30 IST

सुधागड तालुक्यातील आडूळसे ग्रामपंचायत हद्दीत येणा-या तसेच गावठी दारूचे माहेरघर समजले जाणाºया शरदवाडी व गौळमाल ठाकूरवाडी येथील गावठी दारूबंदीसाठी ग्रामस्थांसह महिलांनी कंबर कसली आहे. दारूबंदी केल्याशिवाय शांत बसणार नाही असा पक्का निर्धार त्यांनी केला आहे .

पाली : सुधागड तालुक्यातील आडूळसे ग्रामपंचायत हद्दीत येणा-या तसेच गावठी दारूचे माहेरघर समजले जाणाºया शरदवाडी व गौळमाल ठाकूरवाडी येथील गावठी दारूबंदीसाठी ग्रामस्थांसह महिलांनी कंबर कसली आहे. दारूबंदी केल्याशिवाय शांत बसणार नाही असा पक्का निर्धार त्यांनी केला आहे .दारूबंदीसाठी आडूळसे ग्रामपंचायतीचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शरद फोंडे यांच्या प्रयत्नातून नुकतीच शरदवाडी येथे पोलीस, वनविभाग व ग्रामस्थ अशी संयुक्त बैठक घेण्यात आली होती. यावेळी पाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण, पोलीस नाईक मनोहर पाटील, वनपाल आर.व्ही. नागोठकर, आडूळसे सरपंच भाऊ कोकरे, सदस्य तानाजी बांगारे आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत तंटामुक्त अध्यक्ष शरद फोंडे यांनी माहिती देताना सांगितले की, २००८ साली याच वाडीवरती खूप मोठे स्पिरीट कांड झाले होते. त्यामध्ये २६ आदिवासी बांधवांचे बळी गेले असताना देखील येथील गावठी दारूचे धंदे आजही राजरोसपणे सुरूच आहेत. याविरोधात ग्रामस्थांनी अनेकदा पाली पोलीस ठाणे, दारू उत्पादन शुल्क विभाग अलिबाग यांना तक्र ारी अर्ज देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप फोंडे यांनी केला. तसेच या दोन वाड्यांवरूनच संपूर्ण सुधागड तालुक्याला गावठी दारू पुरविली जाते, असेही त्यांनी सांगितले. सरपंच कोकरे यांनी या दारूधंद्यामुळे आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील अनेक पुरु ष व महिला यांच्यासह तरुण देखील व्यसनाधीन होऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पालीचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी या वाड्यावर अनेकदा व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करून देखील काहीही फरक पडलेला नसल्याचे सरपंचांनी सांगितले.पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी यापुढे या दोन्हीही वाड्यावरती चालणारे गावठी दारूचे धंदे व दारू तयार करण्यात येणाºया हातभट्ट्या जंगलभागात कुठेही असतील तेथे आम्ही व वनविभागाचे अधिकारी जाऊन त्या उद्ध्वस्त करू व दारू तयार करणाºयांवर कायदेशीर खटले भरण्यात येतील. गावठी दारू तयार करण्याचे काम हे सर्रासपणे घनदाट जंगलभागातून होत असल्याने अनेकदा त्याभागातील जंगलांना वणवे लागतात. खूप मोठ्या प्रमाणात वनसंपदेचा ºहास होत आहे त्यामुळे हे धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचे काम वनविभागाकडून देखील आम्ही सुरु केले आहे, असे वनपाल नागोठणेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड