शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

माणगाव एसटी स्थानकाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:22 IST

गिरीश गोरेगावकर  माणगाव : माणगाव एस.टी. स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून, प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. साधे पिण्याचे ...

गिरीश गोरेगावकर माणगाव : माणगाव एस.टी. स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून, प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. साधे पिण्याचे पाणीदेखील मिळणे मुश्कील झाले आहे. तसेच शौचालयही अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. याकडे येथील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. माणगाव एस.टी. स्थानकातील पाणपोईची दुरवस्था झाली असून, अनेक प्रवासी या पाणपोईचा वापर तंबाखू व पान खाऊन पिचकाºया मारण्यासाठीच करतात. गेले अनेक दिवस ही पाणपोई बंद आहे. एस.टी. महामंडळाने ही पाणपोई सुरू करावी, अशी अनेक प्रवाशांची मागणी आहे.एसटी ही ग्रामीण भागाचा आधार आहे. त्यामुळे गरीब, श्रीमंतापासून ते दुर्गम भागातील नागरिक प्रवासासाठी एसटीला पसंती देतात. उशिरा जाईन; पण एसटीनेच जाईन, अशी साधारण सर्वांची मानसिकता आहे. मात्र, प्रत्यक्षात याच एसटीची आणि बसस्थानकांची दुरवस्था झालेली पाहावयास मिळत आहे. प्रामुख्याते मूलभूत सोयी सुविधांची वानवा असल्याचे पाहावयास मिळते. यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त के ली जात आहे.माणगाव येथील एसटी स्थानकात अनेक गैरसोयी आहेत. स्थानकातील पंखे सुरू नाहीत. शौचालय व मुतारीची दुरवस्था आहे. तेथे नाकाला रुमाल बांधूनच जावे लागते. तेथे चांगल्या प्रकारे स्वच्छता न केल्याने काही जण बाहेरच लघुशंका करतात. त्यामुळे या परिसरात उग्र दर्प सातत्याने येत असतो. तसेच स्थानकाच्या छताला पाण्याची गळती सुरू असून छताचा काही भाग कोसळून उघडा पडलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसाळ्यात छत्री उघडून आणि जीव मुठीत धरून बसावे लागते.>पाणपोई बंदमाणगाव बसस्थानकात यापूर्वी जैन समाज, माणगाव मेडिकोज आणि बसस्थानकात पाणपोई सुरू करून प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध केले होते. कालांतराने पाच वर्षांपूर्वी यातील दोन पाणपोई बंद झाल्या.या पाणपोई देखभाल व दुरुस्ती न केल्याने या पाणपोई बंद झाल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले. त्यामुळे प्रवाशांना विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.बसस्थानकाचे नळाद्वारे पिण्यास असणारे पाणी हे शुद्धीकरण न करता प्रवाशांना मिळत होते. ते पाणी आता बंद झाल्याने त्यांना बाजारातील विक्रीस असणाºया पाण्याच्या बाटल्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.स्थानकातील पाणपोईमध्ये लोकांनी पान, तंबाखू यांच्या पिचकाºया मारून तो भाग रंगबिरंगी केले आहेत. त्यामुळे तेथे दुर्गंधी येत असल्याने कोणीही जात नाही. तसेच येथे पाणपोईजवळ कचराही साठविला जात असल्याने दुर्गंधी येते. या स्थानकातील उर्वरित दोन पाणपोई सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली होती. मात्र, त्या आद्यपही सुरू झालेल्या नाहीत.>बस स्थानक हे प्रवाशांसाठी असताना या स्थानकात फेरी (फिरता व्यवसाय)चा पास काढतात. मात्र, हे व्यावसायिक स्थानकाच्या व्हरंड्यामध्ये आपला व्यवसाय टेबल वा गाडी लावून करताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांना तिथे वावरताना त्रास सहन करावा लागतो. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.