शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महाड दुर्घटनेतील एसटी बसचे अवशेष सापडले

By admin | Updated: August 6, 2016 13:18 IST

सावित्री नदीतील शोधकार्याच्या चौथ्या दिवशी एसटी बसचे अवशेष हाती लागले आहेत. घटनास्थळापासून 3 किमी अंतरावर विसावा हॉटेलजवळ एसटीचे अवशेष सापडले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
महाड, दि. 6 - सावित्री नदीतील शोधकार्याच्या चौथ्या दिवशी एसटी बसचे अवशेष हाती लागले आहेत. घटनास्थळापासून तीन किमी अंतरावर विसावा हॉटेलजवळ एसटीचे अवशेष सापडले आहेत. पुल पडल्यानंतर एसटी बस वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर शोधकार्य सुरु करण्यात आलं होतं, मात्र एसटी बसचा काहीच पत्ता लागत नव्हता. अखेर चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बसचे काही अवशेष सापडले आहेत. 
 
मंगळवारी रात्री म्हणजे 2 ऑगस्ट रोजी ११.३०च्या सुमारास महाड-पोलादपुरला जोडणारा सावित्री नदीवरील जुना ब्रिटीशकालीन पूल कोसळला. यावेळी पुलावर असलेल्या दोन एसटी बससह काही वाहने वाहून गेली असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. 
 
एसटीची रत्नागिरी आगाराची जयगड- मुंबई आणि राजापूर आगाराची राजापूर- बोरिवली या दोन बस चिपळूण बसस्थानकातून मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजता सुटल्या होत्या. चिपळूणमध्ये या दोन्ही बसचे चालक- वाहक बदलून चिपळूण आगाराचे कर्मचारी देण्यात आले. महाड बसस्थानकावर या बस रात्री बारा वाजता पोचणे अपेक्षित होते. मात्र, त्या पोचल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही बस पुलावरून कोसळून नदीत बुडाल्याच्या शक्‍यतेने खळबळ उडाली होती.
 
दरम्यान  शनिवारी शोधकार्य सुरु केलं असता दोन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा 24 वर पोहोचला आहे. गुरुवारी म्हणजेच दुर्घटनेच्या दुस-या दिवशी एकूण १४ मृतदेह हाती लागले होते. तर शुक्रवारी 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं होतं. मृतांचा आकडा 22 वर पोहोचला असून आज तो वाढण्याची शक्यता आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे आजही शोधकार्यात अडथळे येत आहेत. 
 

शनिवारी सकाळी शोधकार्य सुरु केल्यावर म्हाप्रळच्या खाडीत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या दिनेश कांबळी यांचा असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत एकूण 24 मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. एका कारचे अवशेषही शुक्रवारी नौदल आणि एनडीआरएफच्या हाती लागले होते. गाडीचे अवशेष तवेरा कारचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या कारसोबत एक चटई आणि इतर सामानही हाती लागलं आहे.

गुरुवारी महाड पट्ट्यात आणि समुद्र किना-यांवर दुर्घटनाग्रस्तांचे मृतदेह सापडले होते. तर शुक्रवारी  केंबुर्ली, वावे, गोरेगाव, दादली खाडीपर्यंत वाहून गेलेले मृतदेह सापडले. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे इतर बेपत्ता व्यक्ती कदाचित समुद्रापर्यंत वाहत गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
 
(महाड पूल दुर्घटना - लोकमतने ३ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा)
 
महाड-पोलादपूरला जोडणा-या या पुलाच्या दुरावस्थेकडे लोकमतने तीनवर्षापूर्वीच लक्ष वेधले होते. नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटीशकालीन पूल अखेरची घटका मोजत असून, हा पूल धोकादायक बनला आहे असे वृत्त लोकमतने ३ सप्टेंबर २०१३ च्या हॅलो रायगड पुरवणीत दिले होते.  
(महाड दुर्घटनेतील कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार)
 
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील या पुलाची मुदत संपल्याचे ब्रिटीश एजन्सीने संबंधित यंत्रणेला सूचित केल्याच्या वृत्ताला त्यावेळी संबंधिक अधिका-यांनी दुजोरा दिला होता. पुलाच्या दगडी बांधकामामध्ये पिंपळाच्या झाडाचे साम्राज्य पसरले होते.