शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील नैसर्गिक पाणवठे केले पुनर्जीवित, फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेची स्तुत्य मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:45 IST

वाढत्या उष्णतेमुळे वन्यजीवांची तडफड सुरू आहे. त्यामुळे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी जंगल परिसरातील सुप्तावस्थेत असलेले नैसर्गिक पाणवठे पुनर्जीवित करण्याची स्तुत्य मोहीम हाती घेतली आहे. 

उरण : वाढत्या उष्णतेमुळे वन्यजीवांची तडफड सुरू आहे. त्यामुळे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी जंगल परिसरातील सुप्तावस्थेत असलेले नैसर्गिक पाणवठे पुनर्जीवित करण्याची स्तुत्य मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवड्यापासून उरण परिसरात उन्हाचा पारा ४० ते ४३ अंशावर पोहोचला आहे. भविष्यात पारा आणखी कितीवर पोहोचेल सांगता येत नाही. पारा वाढला की साहजिकच पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊ लागते. मानवाला जशी पाण्याची टंचाई निर्माण होते, तशी ती वन्यजीव आणि पक्ष्यांनाही निर्माण होते. पाण्याच्या शोधात प्राण्यांना इतर ठिकाणी जाताना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठ्यांवर येणाऱ्या भेकर, रानडुक्कर, ससे यांची परिसरात सर्रास शिकार होत असते. अशा या तहानलेल्या वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उरण तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी एक मोहीम हाती घेत प्रयत्न सुरू केले.कडापे गावाच्या जंगल परिसरात काही नैसर्गिक पाणवठे सुप्तावस्थेत आहेत. तर काहींचे पाणी थोड्या-अधिक प्रमाणात बारमाही काळातही काळ्या पाषाणातून पाझरत असते. अशा सुप्त पाणवठ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर साचलेली माती, दगड बाजूला सारून पुन्हा पुनर्जीवित करण्याचे काम या संस्थेच्या सदस्यांनी सुरू केले आहे. या अनोख्या मोहिमेत जयवंत ठाकूर, सृष्टी ठाकूर, राजेश पाटील, शेखर म्हात्रे, गोरख म्हात्रे, प्रणव गावंड, निकेतन ठाकूर, राकेश म्हात्रे, किशोर पाटील, अंगराज म्हात्रे आदी सहभागी झाले आहेत. त्यांंच्या या प्रयत्नांतून आतापर्यंत पाच-सहा पाणवठे पुनर्जीवित करण्यात यश आले आहे. वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी संस्थेचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे सदस्यांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड