शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जंगलातील नैसर्गिक पाणवठे केले पुनर्जीवित, फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेची स्तुत्य मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:45 IST

वाढत्या उष्णतेमुळे वन्यजीवांची तडफड सुरू आहे. त्यामुळे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी जंगल परिसरातील सुप्तावस्थेत असलेले नैसर्गिक पाणवठे पुनर्जीवित करण्याची स्तुत्य मोहीम हाती घेतली आहे. 

उरण : वाढत्या उष्णतेमुळे वन्यजीवांची तडफड सुरू आहे. त्यामुळे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी जंगल परिसरातील सुप्तावस्थेत असलेले नैसर्गिक पाणवठे पुनर्जीवित करण्याची स्तुत्य मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवड्यापासून उरण परिसरात उन्हाचा पारा ४० ते ४३ अंशावर पोहोचला आहे. भविष्यात पारा आणखी कितीवर पोहोचेल सांगता येत नाही. पारा वाढला की साहजिकच पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊ लागते. मानवाला जशी पाण्याची टंचाई निर्माण होते, तशी ती वन्यजीव आणि पक्ष्यांनाही निर्माण होते. पाण्याच्या शोधात प्राण्यांना इतर ठिकाणी जाताना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठ्यांवर येणाऱ्या भेकर, रानडुक्कर, ससे यांची परिसरात सर्रास शिकार होत असते. अशा या तहानलेल्या वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उरण तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी एक मोहीम हाती घेत प्रयत्न सुरू केले.कडापे गावाच्या जंगल परिसरात काही नैसर्गिक पाणवठे सुप्तावस्थेत आहेत. तर काहींचे पाणी थोड्या-अधिक प्रमाणात बारमाही काळातही काळ्या पाषाणातून पाझरत असते. अशा सुप्त पाणवठ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर साचलेली माती, दगड बाजूला सारून पुन्हा पुनर्जीवित करण्याचे काम या संस्थेच्या सदस्यांनी सुरू केले आहे. या अनोख्या मोहिमेत जयवंत ठाकूर, सृष्टी ठाकूर, राजेश पाटील, शेखर म्हात्रे, गोरख म्हात्रे, प्रणव गावंड, निकेतन ठाकूर, राकेश म्हात्रे, किशोर पाटील, अंगराज म्हात्रे आदी सहभागी झाले आहेत. त्यांंच्या या प्रयत्नांतून आतापर्यंत पाच-सहा पाणवठे पुनर्जीवित करण्यात यश आले आहे. वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी संस्थेचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे सदस्यांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड