शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीत

By admin | Updated: June 29, 2015 03:53 IST

जेएनपीटी बंदर प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची आणि पुनर्वसित नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांचे पुनर्वसन कायद्याप्रमाणे न केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

उरण : देशातील पहिल्या क्रमांकाचे बंदर म्हणून टेंभा मिरविणाऱ्या जेएनपीटी बंदर प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची आणि पुनर्वसित नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांचे पुनर्वसन कायद्याप्रमाणे न केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.देशाच्या आर्थिक विकास आणि प्रगतीचा भाग म्हणून जेएनपीटी बंदर उभारणीसाठी शेवा आणि कोळीवाडा ही दोन्ही गावे विस्थापित केली. या दोन्ही गावांचे पुनर्वसन मात्र जेएनपीटी प्रशासनाला शासनाच्या प्रचलित पुनर्वसन कायद्याप्रमाणे तब्बल २६ वर्षांनंतरही करता आलेले नाही. जेएनपीटी बंदर प्रकल्पग्रस्तांनी बंदर उभारणीसाठी कवडीमोलाने जमिनी संपादन करून दिल्या. या गावांचे पुनर्वसन जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आले असले तरी अपुऱ्या जागेत करण्यात आलेल्या पुनर्वसनामुळे मात्र नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांतील नागरिकांवर नरकयातना भोगण्याची पाळी आली आहे.जेएनपीटी विस्थापितांना त्यांच्या गरजेनुसार आणि प्रस्थापित पुनर्वसन कायद्यानुसार कुटुंबात पाच सदस्य संख्येच्याखाली असलेल्या प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांला ३७१.६१२ स्क्वेअर मीटर, पाच सदस्यांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला ५५७.४१८ स्क्वेअर मीटर तर प्रकल्पग्रस्त परंतु पाच सदस्यांच्या कमी असलेल्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबास १८५.८०५ स्के.मी आणि ५ सदस्यांपेक्षा अधिक असलेल्या भूमिहीन शेतमजुराच्या प्रत्येक कुटुंबाला २७८.७०९ स्क्वे. मी. जागा देण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र शासनाने जुन्या घरांच्या जागेप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला ४० स्क्वे.मी. ते १०० स्क्वे.मी. इतकीच जागा दिली आहे. या दिलेल्या जागेतच नवीन शेवा गावातील ४५४ कुटुंब दाटीवाटीने राहत आहेत. जेएनपीटीने विस्थापित गावांचा सर्व्हे करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे २४ जानेवारी २०१३ रोजी चुकीची दुरुस्ती करीत केंद्र सरकारने नवीन शेवा गावातील रहिवाश्यांचे पुनर्वसन कायद्याप्रमाणे करून देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. नवीन शेवा गावात ४५४ कुटुंबांना पुनर्वसन कायद्यप्रमाणे ३३.६४ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. या ३३.६४ हेक्टर जागेचे जेएनपीटीने पैसेही राज्य शासनाकडे जमा केले आहेत. मात्र असे असतानाही शासनाने फक्त १५.७५ हेक्टर इतकीच जागा उपलब्ध करून दिली आहे. (वार्ताहर)