शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीत

By admin | Updated: June 29, 2015 03:53 IST

जेएनपीटी बंदर प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची आणि पुनर्वसित नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांचे पुनर्वसन कायद्याप्रमाणे न केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

उरण : देशातील पहिल्या क्रमांकाचे बंदर म्हणून टेंभा मिरविणाऱ्या जेएनपीटी बंदर प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची आणि पुनर्वसित नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांचे पुनर्वसन कायद्याप्रमाणे न केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.देशाच्या आर्थिक विकास आणि प्रगतीचा भाग म्हणून जेएनपीटी बंदर उभारणीसाठी शेवा आणि कोळीवाडा ही दोन्ही गावे विस्थापित केली. या दोन्ही गावांचे पुनर्वसन मात्र जेएनपीटी प्रशासनाला शासनाच्या प्रचलित पुनर्वसन कायद्याप्रमाणे तब्बल २६ वर्षांनंतरही करता आलेले नाही. जेएनपीटी बंदर प्रकल्पग्रस्तांनी बंदर उभारणीसाठी कवडीमोलाने जमिनी संपादन करून दिल्या. या गावांचे पुनर्वसन जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आले असले तरी अपुऱ्या जागेत करण्यात आलेल्या पुनर्वसनामुळे मात्र नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांतील नागरिकांवर नरकयातना भोगण्याची पाळी आली आहे.जेएनपीटी विस्थापितांना त्यांच्या गरजेनुसार आणि प्रस्थापित पुनर्वसन कायद्यानुसार कुटुंबात पाच सदस्य संख्येच्याखाली असलेल्या प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांला ३७१.६१२ स्क्वेअर मीटर, पाच सदस्यांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला ५५७.४१८ स्क्वेअर मीटर तर प्रकल्पग्रस्त परंतु पाच सदस्यांच्या कमी असलेल्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबास १८५.८०५ स्के.मी आणि ५ सदस्यांपेक्षा अधिक असलेल्या भूमिहीन शेतमजुराच्या प्रत्येक कुटुंबाला २७८.७०९ स्क्वे. मी. जागा देण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र शासनाने जुन्या घरांच्या जागेप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला ४० स्क्वे.मी. ते १०० स्क्वे.मी. इतकीच जागा दिली आहे. या दिलेल्या जागेतच नवीन शेवा गावातील ४५४ कुटुंब दाटीवाटीने राहत आहेत. जेएनपीटीने विस्थापित गावांचा सर्व्हे करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे २४ जानेवारी २०१३ रोजी चुकीची दुरुस्ती करीत केंद्र सरकारने नवीन शेवा गावातील रहिवाश्यांचे पुनर्वसन कायद्याप्रमाणे करून देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. नवीन शेवा गावात ४५४ कुटुंबांना पुनर्वसन कायद्यप्रमाणे ३३.६४ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. या ३३.६४ हेक्टर जागेचे जेएनपीटीने पैसेही राज्य शासनाकडे जमा केले आहेत. मात्र असे असतानाही शासनाने फक्त १५.७५ हेक्टर इतकीच जागा उपलब्ध करून दिली आहे. (वार्ताहर)