शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

धनादेशाची रक्कम दोषी अधिका-यांकडून वसूल करा; शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे रायगड जिल्हा परिषदेवर जप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:23 IST

आविष्कार देसाई अलिबाग : शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे रायगड जिल्हा परिषदेवर जप्तीची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची महाराष्ट्रात इभ्रत गेली. जिल्हा परिषदेने संबंधित शिक्षण संस्थेला अदा केलेल्या धनादेशाची रक्कम दोषी असणा-या अधिका-यांच्या खिशातून वसूल करावी, अशी एकमुखी मागणी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी केली. दोषी असणा-या अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी ...

आविष्कार देसाई अलिबाग : शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे रायगड जिल्हा परिषदेवर जप्तीची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची महाराष्ट्रात इभ्रत गेली. जिल्हा परिषदेने संबंधित शिक्षण संस्थेला अदा केलेल्या धनादेशाची रक्कम दोषी असणा-या अधिका-यांच्या खिशातून वसूल करावी, अशी एकमुखी मागणी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी केली. दोषी असणा-या अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी सांगितले.रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी ना. ना. पाटील सभागृहात पार पडली. अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे जिल्हा परिषदेवर बदनाम होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे अधिकाºयांसह लोकप्रतिनिधींनीही जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे, असे खडेबोल अदिती तटकरे यांनी सुनावले. डीकेईटी ही शिक्षण संस्था अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाने जून २०१२ साली जाहीर केले होते. त्यामुळे त्या शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेला बसता आले नाही. डिसेंबर २०१६मध्ये न्यायालयाच्या आदेशाने शाळा अधिकृत असल्याचा निर्वाळा मिळाल्यानंतर विलंब शुल्क भरून विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दाखल करण्यात आले होते; परंतु शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे संस्थेला हा भुर्दंड सोसावा लागला होता. त्यामुळे विलंब शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेने द्यावी, असे आदेश न्यायालयाने १८ आॅगस्ट २०१६ रोजी दिले होते. त्याबाबत जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाने कानाडोळा केला. त्यामुळे संस्थेने न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने जिल्हा परिषदेवर जप्तीची नोटीस बजावली होती. जिल्हा परिषदेने जप्ती टाळण्यासाठी रक्कम अदा केली. यामध्ये जिल्हा परिषदेची बदनामी झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांकडून एक लाख ९३ हजार ४१५ रुपये वसूल करावेत, असा ठराव सर्वसाधरण सभेत मंजूर करण्यात आला.या प्ररकरणात आतापर्यंत सुमारे पाच शिक्षणाधिकारी झाले आहेत. त्यामुळे ते सर्वच कचाट्यात सापडणार असल्याचे बोलले जाते.सभाशास्त्राची माहिती नसल्यामुळेच कोणही कधीही बोलत सुटतो, तसेच सभागृहाच्या राजशिष्टाचाराप्रमाणे काही सदस्य सोडल्यास बाकीचे खाली बसूनच बोलताना दिसतात. प्रश्न मांडताना ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारित नसलेलेही प्रश्न मांडले जातात.यावर उपाध्यक्षांनी सदस्यांना अभ्यास करून येण्याचा सल्ला दिला. उपाध्यक्षांनी नुसता सल्ला देण्याऐवजी सर्वच सदस्य नवीन असल्याने त्यांना कामकाजाची माहिती नाही. यासाठी त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवल्यास त्यांनाही कामकाजाची माहिती होईल.

टॅग्स :Raigadरायगड