शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

धनादेशाची रक्कम दोषी अधिका-यांकडून वसूल करा; शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे रायगड जिल्हा परिषदेवर जप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:23 IST

आविष्कार देसाई अलिबाग : शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे रायगड जिल्हा परिषदेवर जप्तीची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची महाराष्ट्रात इभ्रत गेली. जिल्हा परिषदेने संबंधित शिक्षण संस्थेला अदा केलेल्या धनादेशाची रक्कम दोषी असणा-या अधिका-यांच्या खिशातून वसूल करावी, अशी एकमुखी मागणी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी केली. दोषी असणा-या अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी ...

आविष्कार देसाई अलिबाग : शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे रायगड जिल्हा परिषदेवर जप्तीची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची महाराष्ट्रात इभ्रत गेली. जिल्हा परिषदेने संबंधित शिक्षण संस्थेला अदा केलेल्या धनादेशाची रक्कम दोषी असणा-या अधिका-यांच्या खिशातून वसूल करावी, अशी एकमुखी मागणी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी केली. दोषी असणा-या अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी सांगितले.रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी ना. ना. पाटील सभागृहात पार पडली. अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे जिल्हा परिषदेवर बदनाम होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे अधिकाºयांसह लोकप्रतिनिधींनीही जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे, असे खडेबोल अदिती तटकरे यांनी सुनावले. डीकेईटी ही शिक्षण संस्था अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाने जून २०१२ साली जाहीर केले होते. त्यामुळे त्या शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेला बसता आले नाही. डिसेंबर २०१६मध्ये न्यायालयाच्या आदेशाने शाळा अधिकृत असल्याचा निर्वाळा मिळाल्यानंतर विलंब शुल्क भरून विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दाखल करण्यात आले होते; परंतु शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे संस्थेला हा भुर्दंड सोसावा लागला होता. त्यामुळे विलंब शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेने द्यावी, असे आदेश न्यायालयाने १८ आॅगस्ट २०१६ रोजी दिले होते. त्याबाबत जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाने कानाडोळा केला. त्यामुळे संस्थेने न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने जिल्हा परिषदेवर जप्तीची नोटीस बजावली होती. जिल्हा परिषदेने जप्ती टाळण्यासाठी रक्कम अदा केली. यामध्ये जिल्हा परिषदेची बदनामी झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांकडून एक लाख ९३ हजार ४१५ रुपये वसूल करावेत, असा ठराव सर्वसाधरण सभेत मंजूर करण्यात आला.या प्ररकरणात आतापर्यंत सुमारे पाच शिक्षणाधिकारी झाले आहेत. त्यामुळे ते सर्वच कचाट्यात सापडणार असल्याचे बोलले जाते.सभाशास्त्राची माहिती नसल्यामुळेच कोणही कधीही बोलत सुटतो, तसेच सभागृहाच्या राजशिष्टाचाराप्रमाणे काही सदस्य सोडल्यास बाकीचे खाली बसूनच बोलताना दिसतात. प्रश्न मांडताना ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारित नसलेलेही प्रश्न मांडले जातात.यावर उपाध्यक्षांनी सदस्यांना अभ्यास करून येण्याचा सल्ला दिला. उपाध्यक्षांनी नुसता सल्ला देण्याऐवजी सर्वच सदस्य नवीन असल्याने त्यांना कामकाजाची माहिती नाही. यासाठी त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवल्यास त्यांनाही कामकाजाची माहिती होईल.

टॅग्स :Raigadरायगड