शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

२ कोटी २२ लाखांच्या आराखड्याला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:35 IST

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत २ कोटी २२ लाख रुपयांच्या कौशल्य विकास प्रशिक्षण आराखड्यास शुक्रवारी जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

अलिबाग : जिल्ह्यातील युवकांना स्थानिक भौगोलिक स्थिती, सामाजिक स्थिती, अपरंपरागत व्यवसाय, उपलब्ध नैसर्गिक संसाधने आदींच्या आधारे विविध क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत २ कोटी २२ लाख रुपयांच्या कौशल्य विकास प्रशिक्षण आराखड्यास शुक्रवारी जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक एस.जी. पवार यांनी हा आराखडा सादर केला.बँकिंग अ‍ॅण्ड अकाऊंटिंग, सीएनसी आॅपरेटर, बांधकाम क्षेत्र, वाहतूक आणि पर्यटन, माल वाहतूक, माल साठवणूक व पॅकिंग, फॅब्रिकेशन अशा विविध व्यवसायांच्या ५०० हून अधिक वर्गातून, एकूण ३३५० तास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती या वेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक एस.जी. पवार यांनी दिली. जिल्ह्यात याच व्यवसायांशी संबंधित ८ कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था कार्यरत असून वर्षभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. यात काही निवासी प्रशिक्षणे राहाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.या प्रशिक्षणात सागरी किनारपट्टीवर प्रशिक्षित जीवरक्षक, तसेच नारळाच्या काथ्यांपासून वस्तू निर्मिती आदी प्रशिक्षणांचाही समावेश करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका मृ.न.देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यातील आजारी उद्योगांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुनर्वसन कार्यक्र म मंजूर करण्यासाठी आजारी उद्योगांच्या एकत्रित माहितीचा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राने सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारीच झालेल्या जिल्हा उद्योग मित्र व सल्लागार समितीच्या बैठकीत दिले आहेत. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील एमआयडीसीच्या समस्या जाणून घेतल्या. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी आणि जिल्हा कौशल्य विकास केंद्र या तीनही विभागांनी एकत्रित प्रयत्न करु न जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील स्थानिक तरु णांना योग्य कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचनाही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केली.>एमआयडीसीतील विविध समस्यांचा आढावाजिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबागयांचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील विविध योजनांतर्गत झालेल्या कामकाजाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. देशमुख यांनी एमआयडीसीतील विविध समस्यांबाबत माहिती यावेळी सादर केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती मृ.न.देशमुख, तसेच उद्योग मित्र समितीचे सदस्य अनिल खानापूरकर, महादेव पाटील, अशोक पाटील, सतीश चव्हाण, महेश गोराडे, निजर फोफलूनकर आदी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या अग्निशमन यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल आदी विविध विभागांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.