शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:20 IST

डॉक्टर वेळेत उपलब्ध नसतात : रुग्णांचे हाल; पनवेल, नवी मुंबईत धाव

अलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये सर्जिकल वॉर्डमध्ये आॅर्थोपेडिक उपचारासाठी, सिटीस्कॅनसाठी डॉक्टर नाही. त्यामुळे रुग्णांच्या तपासण्या वेळेत होत नसल्याने आरोग्याबाबत हेळसांड सुरू आहे. याकडे रुग्णालय प्रशासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त होत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर वर्ग एकचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे पद धरून १९ पदे मंजूर आहेत. वर्ग दोनची ३० पदे मंजूर, गट ब चे एक पद अशी एकूण ५० पदे आहेत. त्यापैकी ३५ पदे भरलेली आहेत. पैकी सहा अधिकारी कायम गैरहजर असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सुमारे २० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. म्हणजेच ४९ डॉक्टर कार्यरत असतानाही रुग्ण डॉक्टर नसल्याची सातत्याने ओरड करतात. रुग्णालय प्रशासनाकडे ५० डॉक्टरांचा ताफा आहे, तर तो रुग्णांच्या सेवेसाठी पुढे का येत नाही, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी उपस्थित केला.सरकारी सेवेतील डॉक्टरांना महिन्याला सरासरी एक लाख रुपये वेतन दिले जाते. तसेच प्रत्येक रुग्णामागे त्यांना विविध योजनांमधून मिळणारे भत्ते धरून काही डॉक्टर दोन ते पाच लाख रुपयांच्यावर महिन्याला वेतन घेत आहेत. परंतु रुग्णांना डॉक्टर वेळेत उपलब्धच होत नसल्याचा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहिला आहे.

काही दिवसांपूर्वी विविध उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होते. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एकही डॉक्टर वेळेवर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रुग्णांसह रुग्णाच्या नातेवाइकांचे चांगलेच हाल झाले. त्यातील काहींनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना योग्य प्रतिसाद न आल्याने रुग्णालयामध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला होता. मात्र, आताही त्या परिस्थितीमध्ये काहीच फरक पडलेला नाही.रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा योग्य ताळमेळ नाही. त्यामुळे रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नाही. कामचुकारपणा, उपचारासाठी टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरांना बडतर्फ करूनही काहीच उपयोग होत नाही.मुळातच रायगड जिल्ह्यामध्ये येण्यासाठी बºयाच डॉक्टरांची नकारघंटाच असते. त्यामुळे आहे त्या डॉक्टरांशिवाय पर्यायच राहत नाही. त्यामुळे त्यांची मनमानी वाढतआहे.च्बिघडलेली आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकारमध्ये असलेले मंत्री यांचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. एखादा लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची पाहणी केल्यावर काही दिवस सर्व सुरळीत होते. मात्र, अल्पावधीतच परिस्थिती जैसे थे होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

  • तीन दिवसांपूर्वी जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होतो. चार-पाच तास झाले तरी डॉक्टर पोहोचलेच नाहीत. सर्व रुग्णांच्या नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने काही कालावधीनंतर डॉक्टर आले.
  • - अब्दुल मुल्ला, रुग्ण