शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:20 IST

डॉक्टर वेळेत उपलब्ध नसतात : रुग्णांचे हाल; पनवेल, नवी मुंबईत धाव

अलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये सर्जिकल वॉर्डमध्ये आॅर्थोपेडिक उपचारासाठी, सिटीस्कॅनसाठी डॉक्टर नाही. त्यामुळे रुग्णांच्या तपासण्या वेळेत होत नसल्याने आरोग्याबाबत हेळसांड सुरू आहे. याकडे रुग्णालय प्रशासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त होत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर वर्ग एकचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे पद धरून १९ पदे मंजूर आहेत. वर्ग दोनची ३० पदे मंजूर, गट ब चे एक पद अशी एकूण ५० पदे आहेत. त्यापैकी ३५ पदे भरलेली आहेत. पैकी सहा अधिकारी कायम गैरहजर असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सुमारे २० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. म्हणजेच ४९ डॉक्टर कार्यरत असतानाही रुग्ण डॉक्टर नसल्याची सातत्याने ओरड करतात. रुग्णालय प्रशासनाकडे ५० डॉक्टरांचा ताफा आहे, तर तो रुग्णांच्या सेवेसाठी पुढे का येत नाही, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी उपस्थित केला.सरकारी सेवेतील डॉक्टरांना महिन्याला सरासरी एक लाख रुपये वेतन दिले जाते. तसेच प्रत्येक रुग्णामागे त्यांना विविध योजनांमधून मिळणारे भत्ते धरून काही डॉक्टर दोन ते पाच लाख रुपयांच्यावर महिन्याला वेतन घेत आहेत. परंतु रुग्णांना डॉक्टर वेळेत उपलब्धच होत नसल्याचा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहिला आहे.

काही दिवसांपूर्वी विविध उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होते. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एकही डॉक्टर वेळेवर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रुग्णांसह रुग्णाच्या नातेवाइकांचे चांगलेच हाल झाले. त्यातील काहींनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना योग्य प्रतिसाद न आल्याने रुग्णालयामध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला होता. मात्र, आताही त्या परिस्थितीमध्ये काहीच फरक पडलेला नाही.रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा योग्य ताळमेळ नाही. त्यामुळे रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नाही. कामचुकारपणा, उपचारासाठी टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरांना बडतर्फ करूनही काहीच उपयोग होत नाही.मुळातच रायगड जिल्ह्यामध्ये येण्यासाठी बºयाच डॉक्टरांची नकारघंटाच असते. त्यामुळे आहे त्या डॉक्टरांशिवाय पर्यायच राहत नाही. त्यामुळे त्यांची मनमानी वाढतआहे.च्बिघडलेली आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकारमध्ये असलेले मंत्री यांचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. एखादा लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची पाहणी केल्यावर काही दिवस सर्व सुरळीत होते. मात्र, अल्पावधीतच परिस्थिती जैसे थे होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

  • तीन दिवसांपूर्वी जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होतो. चार-पाच तास झाले तरी डॉक्टर पोहोचलेच नाहीत. सर्व रुग्णांच्या नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने काही कालावधीनंतर डॉक्टर आले.
  • - अब्दुल मुल्ला, रुग्ण