शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्याच्या विकासाला न्याय देऊ, रवींद्र चव्हाण यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:24 IST

पालकमंत्री म्हणून काम करण्यासाठी आपल्याला कमी कालावधी मिळाला असला, तरी या कमी कालावधीत पूर्ण होणारी जास्तीत जास्त कामे मार्गी लावून रायगडला न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

महाड : पालकमंत्री म्हणून काम करण्यासाठी आपल्याला कमी कालावधी मिळाला असला, तरी या कमी कालावधीत पूर्ण होणारी जास्तीत जास्त कामे मार्गी लावून रायगडला न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना दिला.पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चव्हाण यांनी आपला रायगड जिल्ह्याचा दौरा महाड येथून सुरू केला. मंगळवारी सायंकाळी महाड येथे आगमन झाल्यानंतर, त्यांनी महाशिवरात्रीचे आणि छबिनोत्सवाचे औचित्य साधून ग्रामदैवत विरेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेऊन, पत्रकारांकडून महाडसह जिल्ह्याच्या समस्या जाणून घेतल्या.महाड तालुक्यातील रखडलेला काळ कुंभे जलविद्युत प्रकल्प, निधीअभावी तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, महाड हे तालुक्याचे ठिकाण असूनही शहरात सर्वदूर विखुरलेल्या शासकीय कार्यालयांचे एका प्रशासकीय इमारतीमध्ये स्थालांतर, महाड ट्रॉमा केअर सेंटर कार्यक्षम करण्यासाठी पुरेशा वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती, महाड औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार नेते गं. द. आंबेकर यांचे यथोचित स्मारक, याच औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार कल्याण केंद्राची स्थापना अशा विविध सूचना पत्रकारांनी या संवादादरम्यान केल्या. त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिले. या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, भाजपा महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.या पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी चव्हाण यांनी विरेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. विरेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप हेदेखील या वेळेस उपस्थित होते.विरेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणाचा १९ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव रेंगाळला असल्याची बाब पंच कमिटीच्या वतीने चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या संदर्भात आपण संबंधितांकडून माहिती घेऊन हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.शिवसेनेबरोबर युती होणार का? असा राजकीय प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर मात्र थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

टॅग्स :Raigadरायगड