शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

नेरळमध्ये रेशनचा काळाबाजार; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 01:21 IST

नेरळ परिसरात सुमारे ९-१० शासनमान्य रास्त भाव म्हणजेच रेशन दुकाने आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यात रेशनिंग दुकानदारांकडून मनमानी कारभार करून ग्राहकांना वेठीस धरले जाते. तक्रार करायला गेल्यास रोजगार बुडत असल्याने अनेक जण तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांचे चांगलेच फावते. मात्र आता जिल्हा पुरवठा अधिका-यांनी याची दखल घेऊन घोटाळेबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.नेरळ परिसरात सुमारे ९-१० शासनमान्य रास्त भाव म्हणजेच रेशन दुकाने आहेत. यापैकी बहुतेक रेशन दुकानांमध्ये ग्राहकांना रेशनच मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. मात्र रास्त भाव दुकानांचा ग्राहक हा मोलमजुरी, रोजंदारीवर काम करणारा असल्याने तक्रारी करायच्या म्हटले तरी रोजंदारी बुडवावी लागते. रोजगार बुडाला तर खाणार काय? असे असल्यामुळे कुणी तक्रार करायला पुढे येत नाही.नेरळ दहिवली वरेडी येथे रास्त भाव दुकानात कल्पना भालचंद्र राणे यांचे अंत्योदय योजनेत खाते होते. या योजनेच्या माध्यमातून येणारे धान्य राणे यांना फक्त १५ किलोच वितरित करण्यात येत होते. रास्त भाव दुकानदारास विचारणा केल्यावर, एवढेच धान्य मिळेल असे सांगण्यात आले. याबाबत त्यांचे नातेवाईक विजय हजारे यांनी आॅनलाइन तपासणी केली असता ३५ किलो धान्य राणे यांच्या नावाने नियमित वितरीत करण्याच्या नोंदी आढळल्या. त्यामुळे ३० जानेवारी २०१९ मध्ये हजारे यांनी कर्जत तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली. राणे यांच्याप्रमाणेच खांडा येथील पांडुरंग बैकर यांनी नेरळ रास्त भाव दुकान नं.५ तर कोल्हारे येथील राजू बार्शी यांची कोल्हारे रास्त भाव दुकानातील धान्य वितरणाबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे हजारे यांनी तक्रारीचा पाठपुरवठा सुरु ठेवला.जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी चौकशी केली असता नेरळ परिसरातील ३ रेशन दुकानांत काळाबाजार झाल्याचे उघड झाले. त्यानुसार नेरळ खांडा येथील धाऊ उघडा यांचे रास्त भाव दुकान नं.५ व कोल्हारे येथील वसंत शिंदे यांचे रास्त भाव दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच परवण्यापोटी शासनाकडे असलेली अनामत रक्कम जप्त करून नवीन अनामत रक्कम १०० % भरण्यास सांगून चौकशी अहवालातील धान्याच्या अपहाराची एकूण रक्कम वसुलीचे आदेश बोडके यांनी दिले आहेत. दोन्ही रास्त भाव दुकानातील ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जवळच्या दुसºया दुकानात त्यांना विलीन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तर दहिवली तर्फे वरेडी येथील रेशन दुकानदार करसनदास कोठारी यांच्या चौकशी अहवालात माध्यम स्वरूपाचा दोष असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्या दुकानाची अनामत रक्कम जप्त करून नव्याने १००% अनामत रक्कम भरून अपहार केलेली रक्कम वसूल करून परत धान्याचा अपहार होणार नाही अशी ताकीद देण्यात आली आहे. या कारवार्ईमुळे रेशनचा काळाबाजार करणाºयांचे धाबे दणाणले आहे.रेशन दुकानांत नॉमिनी पर्यायाचा वापर करून गरिबांच्या तोंडचे धान्य पळवून काळाबाजार सुरु आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व तालुक्यातील अधिका-यांनी यापुढेही कारवाई सुरू ठेवल्यास धान्याचा काळाबाजार करणाºयांवर अंकुश ठेवता येईल. ज्या दुकानदारांचे परवाने रद्द झाले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.- विजय हजारे,सामाजिक कार्यकर्ते, कोल्हारे

टॅग्स :Raigadरायगड