शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

नेरळमध्ये रेशनचा काळाबाजार; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 01:21 IST

नेरळ परिसरात सुमारे ९-१० शासनमान्य रास्त भाव म्हणजेच रेशन दुकाने आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यात रेशनिंग दुकानदारांकडून मनमानी कारभार करून ग्राहकांना वेठीस धरले जाते. तक्रार करायला गेल्यास रोजगार बुडत असल्याने अनेक जण तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांचे चांगलेच फावते. मात्र आता जिल्हा पुरवठा अधिका-यांनी याची दखल घेऊन घोटाळेबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.नेरळ परिसरात सुमारे ९-१० शासनमान्य रास्त भाव म्हणजेच रेशन दुकाने आहेत. यापैकी बहुतेक रेशन दुकानांमध्ये ग्राहकांना रेशनच मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. मात्र रास्त भाव दुकानांचा ग्राहक हा मोलमजुरी, रोजंदारीवर काम करणारा असल्याने तक्रारी करायच्या म्हटले तरी रोजंदारी बुडवावी लागते. रोजगार बुडाला तर खाणार काय? असे असल्यामुळे कुणी तक्रार करायला पुढे येत नाही.नेरळ दहिवली वरेडी येथे रास्त भाव दुकानात कल्पना भालचंद्र राणे यांचे अंत्योदय योजनेत खाते होते. या योजनेच्या माध्यमातून येणारे धान्य राणे यांना फक्त १५ किलोच वितरित करण्यात येत होते. रास्त भाव दुकानदारास विचारणा केल्यावर, एवढेच धान्य मिळेल असे सांगण्यात आले. याबाबत त्यांचे नातेवाईक विजय हजारे यांनी आॅनलाइन तपासणी केली असता ३५ किलो धान्य राणे यांच्या नावाने नियमित वितरीत करण्याच्या नोंदी आढळल्या. त्यामुळे ३० जानेवारी २०१९ मध्ये हजारे यांनी कर्जत तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली. राणे यांच्याप्रमाणेच खांडा येथील पांडुरंग बैकर यांनी नेरळ रास्त भाव दुकान नं.५ तर कोल्हारे येथील राजू बार्शी यांची कोल्हारे रास्त भाव दुकानातील धान्य वितरणाबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे हजारे यांनी तक्रारीचा पाठपुरवठा सुरु ठेवला.जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी चौकशी केली असता नेरळ परिसरातील ३ रेशन दुकानांत काळाबाजार झाल्याचे उघड झाले. त्यानुसार नेरळ खांडा येथील धाऊ उघडा यांचे रास्त भाव दुकान नं.५ व कोल्हारे येथील वसंत शिंदे यांचे रास्त भाव दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच परवण्यापोटी शासनाकडे असलेली अनामत रक्कम जप्त करून नवीन अनामत रक्कम १०० % भरण्यास सांगून चौकशी अहवालातील धान्याच्या अपहाराची एकूण रक्कम वसुलीचे आदेश बोडके यांनी दिले आहेत. दोन्ही रास्त भाव दुकानातील ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जवळच्या दुसºया दुकानात त्यांना विलीन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तर दहिवली तर्फे वरेडी येथील रेशन दुकानदार करसनदास कोठारी यांच्या चौकशी अहवालात माध्यम स्वरूपाचा दोष असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्या दुकानाची अनामत रक्कम जप्त करून नव्याने १००% अनामत रक्कम भरून अपहार केलेली रक्कम वसूल करून परत धान्याचा अपहार होणार नाही अशी ताकीद देण्यात आली आहे. या कारवार्ईमुळे रेशनचा काळाबाजार करणाºयांचे धाबे दणाणले आहे.रेशन दुकानांत नॉमिनी पर्यायाचा वापर करून गरिबांच्या तोंडचे धान्य पळवून काळाबाजार सुरु आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व तालुक्यातील अधिका-यांनी यापुढेही कारवाई सुरू ठेवल्यास धान्याचा काळाबाजार करणाºयांवर अंकुश ठेवता येईल. ज्या दुकानदारांचे परवाने रद्द झाले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.- विजय हजारे,सामाजिक कार्यकर्ते, कोल्हारे

टॅग्स :Raigadरायगड