शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमध्ये रेशनचा काळाबाजार; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 01:21 IST

नेरळ परिसरात सुमारे ९-१० शासनमान्य रास्त भाव म्हणजेच रेशन दुकाने आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यात रेशनिंग दुकानदारांकडून मनमानी कारभार करून ग्राहकांना वेठीस धरले जाते. तक्रार करायला गेल्यास रोजगार बुडत असल्याने अनेक जण तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांचे चांगलेच फावते. मात्र आता जिल्हा पुरवठा अधिका-यांनी याची दखल घेऊन घोटाळेबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.नेरळ परिसरात सुमारे ९-१० शासनमान्य रास्त भाव म्हणजेच रेशन दुकाने आहेत. यापैकी बहुतेक रेशन दुकानांमध्ये ग्राहकांना रेशनच मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. मात्र रास्त भाव दुकानांचा ग्राहक हा मोलमजुरी, रोजंदारीवर काम करणारा असल्याने तक्रारी करायच्या म्हटले तरी रोजंदारी बुडवावी लागते. रोजगार बुडाला तर खाणार काय? असे असल्यामुळे कुणी तक्रार करायला पुढे येत नाही.नेरळ दहिवली वरेडी येथे रास्त भाव दुकानात कल्पना भालचंद्र राणे यांचे अंत्योदय योजनेत खाते होते. या योजनेच्या माध्यमातून येणारे धान्य राणे यांना फक्त १५ किलोच वितरित करण्यात येत होते. रास्त भाव दुकानदारास विचारणा केल्यावर, एवढेच धान्य मिळेल असे सांगण्यात आले. याबाबत त्यांचे नातेवाईक विजय हजारे यांनी आॅनलाइन तपासणी केली असता ३५ किलो धान्य राणे यांच्या नावाने नियमित वितरीत करण्याच्या नोंदी आढळल्या. त्यामुळे ३० जानेवारी २०१९ मध्ये हजारे यांनी कर्जत तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली. राणे यांच्याप्रमाणेच खांडा येथील पांडुरंग बैकर यांनी नेरळ रास्त भाव दुकान नं.५ तर कोल्हारे येथील राजू बार्शी यांची कोल्हारे रास्त भाव दुकानातील धान्य वितरणाबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे हजारे यांनी तक्रारीचा पाठपुरवठा सुरु ठेवला.जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी चौकशी केली असता नेरळ परिसरातील ३ रेशन दुकानांत काळाबाजार झाल्याचे उघड झाले. त्यानुसार नेरळ खांडा येथील धाऊ उघडा यांचे रास्त भाव दुकान नं.५ व कोल्हारे येथील वसंत शिंदे यांचे रास्त भाव दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच परवण्यापोटी शासनाकडे असलेली अनामत रक्कम जप्त करून नवीन अनामत रक्कम १०० % भरण्यास सांगून चौकशी अहवालातील धान्याच्या अपहाराची एकूण रक्कम वसुलीचे आदेश बोडके यांनी दिले आहेत. दोन्ही रास्त भाव दुकानातील ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जवळच्या दुसºया दुकानात त्यांना विलीन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तर दहिवली तर्फे वरेडी येथील रेशन दुकानदार करसनदास कोठारी यांच्या चौकशी अहवालात माध्यम स्वरूपाचा दोष असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्या दुकानाची अनामत रक्कम जप्त करून नव्याने १००% अनामत रक्कम भरून अपहार केलेली रक्कम वसूल करून परत धान्याचा अपहार होणार नाही अशी ताकीद देण्यात आली आहे. या कारवार्ईमुळे रेशनचा काळाबाजार करणाºयांचे धाबे दणाणले आहे.रेशन दुकानांत नॉमिनी पर्यायाचा वापर करून गरिबांच्या तोंडचे धान्य पळवून काळाबाजार सुरु आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व तालुक्यातील अधिका-यांनी यापुढेही कारवाई सुरू ठेवल्यास धान्याचा काळाबाजार करणाºयांवर अंकुश ठेवता येईल. ज्या दुकानदारांचे परवाने रद्द झाले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.- विजय हजारे,सामाजिक कार्यकर्ते, कोल्हारे

टॅग्स :Raigadरायगड