शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

रणगाडा अलिबागमध्ये दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:51 IST

रायगड जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला मिळणार गती

`1 लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला गती मिळावी तसेच अलिबागचे ऐतिहासिक महत्त्व अधाेरेखित व्हावे यासाठी अलिबागच्या मुख्य समद्रकिनारी युद्धात शाैर्य गाजवलेला रणगाडा ठेवण्यात आला आहे. पुणे-खडकी येथील लष्करी कॅम्पमधून शुक्रवारी सकाळीच हा रणगाडा येथे दाखल झाला आहे, अशी माहिती अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ‘लाेकमत’ला दिली.‘लाेकमत’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ हा अनाेखा देशभक्तीपर कार्यक्रम आयाेजित करण्यात आला. तरुणाईला लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ३ जानेवारी २०१९ राेजी पीएनपी नाट्यगृहात पार पडला हाेता. जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या प्रति अभिमान आणि कृतज्ञतेची भावाना कायम रुजत राहावी यासाठी अलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यात येईल, असे अभिवचन तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमात दिले हाेते. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने त्यांची ही मागणी मान्य केली. ती मान्य हाेऊन शुक्रवारी रणगाडा अलिबागमध्ये दाखल झाला. या ऐतिहासिक घटनेमुळे अलिबागमधील नव्हेतर, तमाम रायगडकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे, असे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले. अलिबागला सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे या पराक्रमी महान विभूतीचा इतिहास लाभलेला आहे. त्याचा फायदा पर्यटन वृद्धीसाठी निश्चितच हाेईल, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.

‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ हा कार्यक्रम ‘लाेकमत’च्या वर्धापन दिनानिमित्त आयाेजित करण्यात आला हाेता. तरुणाईला संरक्षण दलात जाता यावे तसेच अलिबागच्या प्रेक्षणीय समुद्रकिनाऱ्याची शोभा वाढावी या दृष्टिकोनातून तिथे रणगाडा बसविण्याची संकल्पना मनात आली हाेती. त्याची स्वप्नपूर्ती झाल्याने आज खूप आनंद होत आहे.    - डाॅ. विजय सूर्यवंशी, तत्कालीन जिल्हाधिकारी

उच्च दर्जाचे सुशाेभीकरण nअलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यासाठी विशिष्ट जागा केली आहे. त्या ठिकाणी उच्च दर्जाचे सुशाेभीकरण करण्यात येणार आहे. nतसेच रणगाड्याची अप्रतिम अशी रंगरंगाेटीही करण्यात येणार आहे. यासाठी दाेन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२१ रोजी रणगाड्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न असल्याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले. nअलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ताे स्थानिकांसह पर्यटकांच्या आर्कषणाचे केंद्र राहणार आहे. त्यामुळे अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला गती येणार आहे.