शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

रणगाडा अलिबागमध्ये दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:51 IST

रायगड जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला मिळणार गती

`1 लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला गती मिळावी तसेच अलिबागचे ऐतिहासिक महत्त्व अधाेरेखित व्हावे यासाठी अलिबागच्या मुख्य समद्रकिनारी युद्धात शाैर्य गाजवलेला रणगाडा ठेवण्यात आला आहे. पुणे-खडकी येथील लष्करी कॅम्पमधून शुक्रवारी सकाळीच हा रणगाडा येथे दाखल झाला आहे, अशी माहिती अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ‘लाेकमत’ला दिली.‘लाेकमत’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ हा अनाेखा देशभक्तीपर कार्यक्रम आयाेजित करण्यात आला. तरुणाईला लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ३ जानेवारी २०१९ राेजी पीएनपी नाट्यगृहात पार पडला हाेता. जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या प्रति अभिमान आणि कृतज्ञतेची भावाना कायम रुजत राहावी यासाठी अलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यात येईल, असे अभिवचन तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमात दिले हाेते. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने त्यांची ही मागणी मान्य केली. ती मान्य हाेऊन शुक्रवारी रणगाडा अलिबागमध्ये दाखल झाला. या ऐतिहासिक घटनेमुळे अलिबागमधील नव्हेतर, तमाम रायगडकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे, असे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले. अलिबागला सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे या पराक्रमी महान विभूतीचा इतिहास लाभलेला आहे. त्याचा फायदा पर्यटन वृद्धीसाठी निश्चितच हाेईल, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.

‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ हा कार्यक्रम ‘लाेकमत’च्या वर्धापन दिनानिमित्त आयाेजित करण्यात आला हाेता. तरुणाईला संरक्षण दलात जाता यावे तसेच अलिबागच्या प्रेक्षणीय समुद्रकिनाऱ्याची शोभा वाढावी या दृष्टिकोनातून तिथे रणगाडा बसविण्याची संकल्पना मनात आली हाेती. त्याची स्वप्नपूर्ती झाल्याने आज खूप आनंद होत आहे.    - डाॅ. विजय सूर्यवंशी, तत्कालीन जिल्हाधिकारी

उच्च दर्जाचे सुशाेभीकरण nअलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यासाठी विशिष्ट जागा केली आहे. त्या ठिकाणी उच्च दर्जाचे सुशाेभीकरण करण्यात येणार आहे. nतसेच रणगाड्याची अप्रतिम अशी रंगरंगाेटीही करण्यात येणार आहे. यासाठी दाेन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२१ रोजी रणगाड्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न असल्याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले. nअलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ताे स्थानिकांसह पर्यटकांच्या आर्कषणाचे केंद्र राहणार आहे. त्यामुळे अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला गती येणार आहे.