शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

राजीव साबळे, अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 06:59 IST

स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अ‍ॅड.राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-आविष्कार देसाईअलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अ‍ॅड.राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शेकाप, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष आणि मनसे यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेची भाजपासोबत युती असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. २१ मे रोजी मतदान होणार असल्याने मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला दोन्हीकडून चांगलेच उधाण आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा आमदार सुनील तटकरे यांनी पक्षांतील निष्ठावंतांना डावलत मुलाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार रहा, असे संदेश मिळालेले खोपोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ताजी मसुरकर यांना त्यांची तलवार म्यान करावी लागली आहे. मसुरकर यांना पुन्हा एकदा हुलकावणी मिळाल्याने त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाल्याचे बोलले जाते. अनिकेत तटकरे यांची ओळख ही सुनील तटकरे यांचे चिंरजीव अशीच आहे. त्यांनी अद्यापही ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर पालिका, जिल्हा परिषद अशी निवडणूक लढवलेली नसतानाही केवळ वडिलांच्या कृपाआशीर्वादाने त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाल्याचे बोलले जाते. सुनील तटकरे यांनी आधीही घराणेशाहीला थारा देत बंधू अनिल तटकरे, पुतण्या अवधुत तटकरे यांना आमदारकी दिली आहे, तर जिल्हा परिषदेवर मुलगी अदिती हिला निवडून आणले आहे.अनिल तटकरे आणि सुनील तटकरे बंधूंमधील वाद जगजाहीर आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिल्यास शिवसेना आणि भाजपाच्या मतांची बेरीज ४८४ येते, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ३०६ होते. मनसे, अपक्ष आणि स्वाभिमानी पक्ष यांची बेरीज ही १३९ होते. ३०६ आणि १३९ यांची बेरीज केल्यास ४४५ होते. याचाच अर्थ युतीकडे अद्यापही ३९ मते अधिक असल्याचे दिसते.भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली असली, तरी कोकणात डोईजड झालेली शिवसेना खरोखरच भाजपाला परवडणारी आहे का असा प्रश्न आहे. स्वाभिमानी पक्षाच्या मतांवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांचाच होल्ड आहे. तसेच त्यांचे शिवसेनेबरोबर चांगलेच हाडवैर आहे. त्यामुळे शिवसेनेला त्यांच्याकडून मदत मिळेल या भ्रमात शिवसेनेच्या उमेदवाराने न राहिलेलेच बरे आहे. सुनील तटकरे हे राजकीय डावपेचांमध्ये माहीर आहेत. नारायण राणेंची मदत मिळणार याची खात्री पटल्यावरच कदाचित त्यांनी अनिकेत याला रणांगणावर तर उतरवले नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.च्७ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शिवसेनेचे अ‍ॅड. राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे हे रिंगणात राहतील, तर शिवसेनेचे किशोर जैन आणि अदिती तटकरे हे आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतील.च्शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस अशीच सरळ लढत होणार आहे. मॅजिक फिगर गाठण्यासाठी तटकरे यांनी विजयी सोंगट्या ठेवल्या असतील तशाच शिवसेनेकडे नाहीत, असेच चित्र सध्या आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकRaigadरायगड