शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राजीव साबळे, अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 06:59 IST

स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अ‍ॅड.राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-आविष्कार देसाईअलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अ‍ॅड.राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शेकाप, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष आणि मनसे यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेची भाजपासोबत युती असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. २१ मे रोजी मतदान होणार असल्याने मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला दोन्हीकडून चांगलेच उधाण आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा आमदार सुनील तटकरे यांनी पक्षांतील निष्ठावंतांना डावलत मुलाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार रहा, असे संदेश मिळालेले खोपोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ताजी मसुरकर यांना त्यांची तलवार म्यान करावी लागली आहे. मसुरकर यांना पुन्हा एकदा हुलकावणी मिळाल्याने त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाल्याचे बोलले जाते. अनिकेत तटकरे यांची ओळख ही सुनील तटकरे यांचे चिंरजीव अशीच आहे. त्यांनी अद्यापही ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर पालिका, जिल्हा परिषद अशी निवडणूक लढवलेली नसतानाही केवळ वडिलांच्या कृपाआशीर्वादाने त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाल्याचे बोलले जाते. सुनील तटकरे यांनी आधीही घराणेशाहीला थारा देत बंधू अनिल तटकरे, पुतण्या अवधुत तटकरे यांना आमदारकी दिली आहे, तर जिल्हा परिषदेवर मुलगी अदिती हिला निवडून आणले आहे.अनिल तटकरे आणि सुनील तटकरे बंधूंमधील वाद जगजाहीर आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिल्यास शिवसेना आणि भाजपाच्या मतांची बेरीज ४८४ येते, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ३०६ होते. मनसे, अपक्ष आणि स्वाभिमानी पक्ष यांची बेरीज ही १३९ होते. ३०६ आणि १३९ यांची बेरीज केल्यास ४४५ होते. याचाच अर्थ युतीकडे अद्यापही ३९ मते अधिक असल्याचे दिसते.भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली असली, तरी कोकणात डोईजड झालेली शिवसेना खरोखरच भाजपाला परवडणारी आहे का असा प्रश्न आहे. स्वाभिमानी पक्षाच्या मतांवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांचाच होल्ड आहे. तसेच त्यांचे शिवसेनेबरोबर चांगलेच हाडवैर आहे. त्यामुळे शिवसेनेला त्यांच्याकडून मदत मिळेल या भ्रमात शिवसेनेच्या उमेदवाराने न राहिलेलेच बरे आहे. सुनील तटकरे हे राजकीय डावपेचांमध्ये माहीर आहेत. नारायण राणेंची मदत मिळणार याची खात्री पटल्यावरच कदाचित त्यांनी अनिकेत याला रणांगणावर तर उतरवले नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.च्७ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शिवसेनेचे अ‍ॅड. राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे हे रिंगणात राहतील, तर शिवसेनेचे किशोर जैन आणि अदिती तटकरे हे आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतील.च्शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस अशीच सरळ लढत होणार आहे. मॅजिक फिगर गाठण्यासाठी तटकरे यांनी विजयी सोंगट्या ठेवल्या असतील तशाच शिवसेनेकडे नाहीत, असेच चित्र सध्या आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकRaigadरायगड