शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

राजीव साबळे, अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 06:59 IST

स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अ‍ॅड.राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-आविष्कार देसाईअलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अ‍ॅड.राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शेकाप, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष आणि मनसे यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेची भाजपासोबत युती असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. २१ मे रोजी मतदान होणार असल्याने मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला दोन्हीकडून चांगलेच उधाण आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा आमदार सुनील तटकरे यांनी पक्षांतील निष्ठावंतांना डावलत मुलाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार रहा, असे संदेश मिळालेले खोपोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ताजी मसुरकर यांना त्यांची तलवार म्यान करावी लागली आहे. मसुरकर यांना पुन्हा एकदा हुलकावणी मिळाल्याने त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाल्याचे बोलले जाते. अनिकेत तटकरे यांची ओळख ही सुनील तटकरे यांचे चिंरजीव अशीच आहे. त्यांनी अद्यापही ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर पालिका, जिल्हा परिषद अशी निवडणूक लढवलेली नसतानाही केवळ वडिलांच्या कृपाआशीर्वादाने त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाल्याचे बोलले जाते. सुनील तटकरे यांनी आधीही घराणेशाहीला थारा देत बंधू अनिल तटकरे, पुतण्या अवधुत तटकरे यांना आमदारकी दिली आहे, तर जिल्हा परिषदेवर मुलगी अदिती हिला निवडून आणले आहे.अनिल तटकरे आणि सुनील तटकरे बंधूंमधील वाद जगजाहीर आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिल्यास शिवसेना आणि भाजपाच्या मतांची बेरीज ४८४ येते, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ३०६ होते. मनसे, अपक्ष आणि स्वाभिमानी पक्ष यांची बेरीज ही १३९ होते. ३०६ आणि १३९ यांची बेरीज केल्यास ४४५ होते. याचाच अर्थ युतीकडे अद्यापही ३९ मते अधिक असल्याचे दिसते.भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली असली, तरी कोकणात डोईजड झालेली शिवसेना खरोखरच भाजपाला परवडणारी आहे का असा प्रश्न आहे. स्वाभिमानी पक्षाच्या मतांवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांचाच होल्ड आहे. तसेच त्यांचे शिवसेनेबरोबर चांगलेच हाडवैर आहे. त्यामुळे शिवसेनेला त्यांच्याकडून मदत मिळेल या भ्रमात शिवसेनेच्या उमेदवाराने न राहिलेलेच बरे आहे. सुनील तटकरे हे राजकीय डावपेचांमध्ये माहीर आहेत. नारायण राणेंची मदत मिळणार याची खात्री पटल्यावरच कदाचित त्यांनी अनिकेत याला रणांगणावर तर उतरवले नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.च्७ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शिवसेनेचे अ‍ॅड. राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे हे रिंगणात राहतील, तर शिवसेनेचे किशोर जैन आणि अदिती तटकरे हे आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतील.च्शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस अशीच सरळ लढत होणार आहे. मॅजिक फिगर गाठण्यासाठी तटकरे यांनी विजयी सोंगट्या ठेवल्या असतील तशाच शिवसेनेकडे नाहीत, असेच चित्र सध्या आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकRaigadरायगड