शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

वर्षभरानंतरच प्रकटली राजापूरची प्रसिद्ध गंगा; चौदाही कुंडांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 00:54 IST

चौदाही कुंडांमध्ये पाणी

राजापूर (जि. रत्नागिरी) : राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे शुक्रवारी सकाळी आगमन झाले आहे. गतवर्षीही एप्रिल महिन्यात गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर वर्ष होताच गंगामाई पुन्हा प्रकटली आहे. गंगा क्षेत्रातील चौदाही कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, काशीकुंड तुडुंब भरल्याने गोमुखातून अखंड पाण्याचा स्त्राेत सुरू झाला आहे.

सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी गंगा प्रकट होते व तीन महिन्यांनी अंतर्धान पावते, असा प्रघात आहे. मात्र, अलीकडच्या कालावधीत आगमन व निर्गमनाच्या सर्वसाधारण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. काही वर्षे तर ती सलग आली होती, तर काही वर्षांपूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधी खूपच लांबला होता. यावेळी १ वर्ष १४ दिवसांनी गंगामाईचे आगमन झाले आहे. सकाळी गावातील ग्रामस्थ त्या भागात गेले असता गंगेचे आगमन झाल्याचे त्यांनी पाहिले. गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने भरलेली होती. सर्वांत मोठे असणारे काशीकुंड पूर्ण भरल्याने गोमुखातून पाणी वाहत होते. मूळ गंगेचा प्रवाह मोठ्या स्वरूपात वाहत होता.

प्रवेश बंदचगतवर्षी काेराेनाचे सावट असतानाच गंगेचे आगमन झाले हाेते. मात्र, काेराेनामुळे गंगाक्षेत्री जाण्यास बंदी घालण्यात आली हाेती. त्यामुळे भाविकांना गंगास्नानाचा आनंद लुटता आला नव्हता. यावर्षीही सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे यावर्षीही गंगास्नानाची पर्वणी साधता येणार नाही.