शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: September 11, 2015 23:38 IST

यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.

कर्जत : यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. भात शेती सुकू लागली होती त्यातच पावसाअभावी विविध रोगांचा प्रादुर्भाव भातपिकावर पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. पीक वाचावे म्हणून नदी, नाल्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांनी पंप लावून शेतात पाणी घेण्याचा निर्णय घेतला. शेते पाण्याने भरली अन् वरु णराजाने कृपा केल्याने शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.यावर्षी पावसाने सर्वांनाच रडविले. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात भातपीक चांगले आले असताना पावसाने दांडी मारली भातपिके सुकू लागली. विविध रोगांनी पिकाला पछाडण्यास सुरु वात झाली. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावरील हसू लोप पावले. गणपतीचा सण जवळ आला तरी त्याला काही सुचत नव्हते. हातातोंडाशी आलेले पीक जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. भातपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी, नाल्यालगत असलेल्या भात शेतीला पंप लावून पाणी दिले व शेती वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु हे सधन शेतकऱ्याला जमले व ज्यांची शेती नदी, नाल्यांच्या जवळ आहे त्यांचा फायदा होत होता. अन्य शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. राजानाला विभागातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी अर्ज तयार ठेवले होते. पंपाने पाणी घेऊन शेते भरली आणि पावसाने सुरु वात केल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. (वार्ताहर) एसआरटी पद्धतीने केलेले भातपीक पंधरा दिवसांपूर्वी दृष्ट लागण्यासारखे होते मात्र पावसाच्या अभावी पिके सुकू लागली म्हणून आम्ही नाल्यामधील पाणी पंप लावून शेतात घेतल्याने पिकात पुन्हा जीव आला. त्यातच परतीच्या का होईना पावसाने सर्वांनाच तूर्तास तारले आहे.- हरिश्चंद्र ठोंबरे,शेतकरी, कोषाणे