शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: September 11, 2015 23:38 IST

यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.

कर्जत : यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. भात शेती सुकू लागली होती त्यातच पावसाअभावी विविध रोगांचा प्रादुर्भाव भातपिकावर पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. पीक वाचावे म्हणून नदी, नाल्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांनी पंप लावून शेतात पाणी घेण्याचा निर्णय घेतला. शेते पाण्याने भरली अन् वरु णराजाने कृपा केल्याने शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.यावर्षी पावसाने सर्वांनाच रडविले. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात भातपीक चांगले आले असताना पावसाने दांडी मारली भातपिके सुकू लागली. विविध रोगांनी पिकाला पछाडण्यास सुरु वात झाली. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावरील हसू लोप पावले. गणपतीचा सण जवळ आला तरी त्याला काही सुचत नव्हते. हातातोंडाशी आलेले पीक जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. भातपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी, नाल्यालगत असलेल्या भात शेतीला पंप लावून पाणी दिले व शेती वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु हे सधन शेतकऱ्याला जमले व ज्यांची शेती नदी, नाल्यांच्या जवळ आहे त्यांचा फायदा होत होता. अन्य शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. राजानाला विभागातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी अर्ज तयार ठेवले होते. पंपाने पाणी घेऊन शेते भरली आणि पावसाने सुरु वात केल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. (वार्ताहर) एसआरटी पद्धतीने केलेले भातपीक पंधरा दिवसांपूर्वी दृष्ट लागण्यासारखे होते मात्र पावसाच्या अभावी पिके सुकू लागली म्हणून आम्ही नाल्यामधील पाणी पंप लावून शेतात घेतल्याने पिकात पुन्हा जीव आला. त्यातच परतीच्या का होईना पावसाने सर्वांनाच तूर्तास तारले आहे.- हरिश्चंद्र ठोंबरे,शेतकरी, कोषाणे