शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला

By admin | Updated: September 11, 2015 23:38 IST

यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.

कर्जत : यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. भात शेती सुकू लागली होती त्यातच पावसाअभावी विविध रोगांचा प्रादुर्भाव भातपिकावर पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. पीक वाचावे म्हणून नदी, नाल्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांनी पंप लावून शेतात पाणी घेण्याचा निर्णय घेतला. शेते पाण्याने भरली अन् वरु णराजाने कृपा केल्याने शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.यावर्षी पावसाने सर्वांनाच रडविले. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात भातपीक चांगले आले असताना पावसाने दांडी मारली भातपिके सुकू लागली. विविध रोगांनी पिकाला पछाडण्यास सुरु वात झाली. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावरील हसू लोप पावले. गणपतीचा सण जवळ आला तरी त्याला काही सुचत नव्हते. हातातोंडाशी आलेले पीक जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. भातपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी, नाल्यालगत असलेल्या भात शेतीला पंप लावून पाणी दिले व शेती वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु हे सधन शेतकऱ्याला जमले व ज्यांची शेती नदी, नाल्यांच्या जवळ आहे त्यांचा फायदा होत होता. अन्य शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. राजानाला विभागातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी अर्ज तयार ठेवले होते. पंपाने पाणी घेऊन शेते भरली आणि पावसाने सुरु वात केल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. (वार्ताहर) एसआरटी पद्धतीने केलेले भातपीक पंधरा दिवसांपूर्वी दृष्ट लागण्यासारखे होते मात्र पावसाच्या अभावी पिके सुकू लागली म्हणून आम्ही नाल्यामधील पाणी पंप लावून शेतात घेतल्याने पिकात पुन्हा जीव आला. त्यातच परतीच्या का होईना पावसाने सर्वांनाच तूर्तास तारले आहे.- हरिश्चंद्र ठोंबरे,शेतकरी, कोषाणे