शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम; भिरा धरणाचे तीन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:05 IST

काही कालावधीसाठी पावसाने उघडीप घेतली होती

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पुन्हा पावसाने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भिरा धरण तुडुंब भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. १८४ क्युसेक्स क्षमतेने पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. त्याप्रमाणे डोलवहाळ बंधाºयातील पाण्याने इशारा पातळी ओलांडली असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा धुमधडाका हा असाच पुढील तीन दिवस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने जनजीवन पुरते विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही कालावधीसाठी पावसाने उघडीप घेतली होती, मात्र रविवारी दुपारपासूनच पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. रविवारी रात्री सोसाट्यांच्या वाºयासह पाऊस पडत होता. सोमवारी दुपारपर्यंत संततधार सुरू होती.

रविवारपासून बरसणाºया पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी, अंबा नदी तसेच महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.भिरा धरणाने इशारा पातळी ओलांडल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्या दरवाजातून १८४ क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठच्या गाव वाड्यांना सतर्क राहावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने पोलीस पाटीलपासून उच्च अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.महाड : गेल्या चोवीस तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातून वाहणाºया सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या नद्यांचे पाणी महाड शहरात घुसले. यामुळे शहरातील सखल भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सावित्री व गांधारी नद्यांची पातळी वाढल्याने पुराचे पाणी दस्तूरी मार्ग , अर्जुन भोई मार्ग तसेच गांधारी मार्ग, क्रांती स्तंभ मार्ग पाण्याखाली गेला. पुराच्या पाण्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पावसाचा जोर कायम राहिला तर पुराचे पाणी मुख्य बाजारपेठेत घुसण्याचा धोका निर्माण झाला असून बाजारपेठेतील व्यापारी व रहिवाशांनी सामानाची आवराआवर करण्याची लगबग सुरू होती.महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, नगर अभियंता सुहास कांबळे, आरोग्य निरीक्षक किशोर शिंदे आदींनी भोईघाट परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. महाड नगरपरिषदेतर्फे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. शहर व तालुक्यातील नदीकिनारी असलेल्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रविवारी रात्रभर महाबळेश्वर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पातळीत सोमवारी अचानक वाढ झाली त्यामुळे शहर परिसरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. पूरस्थितीमुळे सोमवारी दुपारनंतर शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.