शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम; भिरा धरणाचे तीन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:05 IST

काही कालावधीसाठी पावसाने उघडीप घेतली होती

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पुन्हा पावसाने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भिरा धरण तुडुंब भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. १८४ क्युसेक्स क्षमतेने पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. त्याप्रमाणे डोलवहाळ बंधाºयातील पाण्याने इशारा पातळी ओलांडली असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा धुमधडाका हा असाच पुढील तीन दिवस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने जनजीवन पुरते विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही कालावधीसाठी पावसाने उघडीप घेतली होती, मात्र रविवारी दुपारपासूनच पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. रविवारी रात्री सोसाट्यांच्या वाºयासह पाऊस पडत होता. सोमवारी दुपारपर्यंत संततधार सुरू होती.

रविवारपासून बरसणाºया पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी, अंबा नदी तसेच महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.भिरा धरणाने इशारा पातळी ओलांडल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्या दरवाजातून १८४ क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठच्या गाव वाड्यांना सतर्क राहावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने पोलीस पाटीलपासून उच्च अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.महाड : गेल्या चोवीस तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातून वाहणाºया सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या नद्यांचे पाणी महाड शहरात घुसले. यामुळे शहरातील सखल भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सावित्री व गांधारी नद्यांची पातळी वाढल्याने पुराचे पाणी दस्तूरी मार्ग , अर्जुन भोई मार्ग तसेच गांधारी मार्ग, क्रांती स्तंभ मार्ग पाण्याखाली गेला. पुराच्या पाण्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पावसाचा जोर कायम राहिला तर पुराचे पाणी मुख्य बाजारपेठेत घुसण्याचा धोका निर्माण झाला असून बाजारपेठेतील व्यापारी व रहिवाशांनी सामानाची आवराआवर करण्याची लगबग सुरू होती.महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, नगर अभियंता सुहास कांबळे, आरोग्य निरीक्षक किशोर शिंदे आदींनी भोईघाट परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. महाड नगरपरिषदेतर्फे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. शहर व तालुक्यातील नदीकिनारी असलेल्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रविवारी रात्रभर महाबळेश्वर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पातळीत सोमवारी अचानक वाढ झाली त्यामुळे शहर परिसरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. पूरस्थितीमुळे सोमवारी दुपारनंतर शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.