शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

लोकांच्या मागणीनुसारच रेल्वे टर्मिनस होईल : प्रमोद जठार

By admin | Updated: November 16, 2014 23:47 IST

रेल्वेच्या समस्यांबाबत आम्ही रेल्वेमंत्री तसेच राज्यातील इतर समस्या कशा सोडवाव्यात, यासाठी प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहे.

सावंतवाडी : रेल्वे टर्मिनस कुठे करायचे, हा सर्वस्वी निर्णय जनतेवर अवलंबून असून लोकांची मागणी ज्या ठिकाणी असेल तेथेच रेल्वे टर्मिनस होईल, अशी माहिती भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, राजन म्हापसेकर, काका कुडाळकर, श्यामकांत काणेकर, मनोज नाईक, उमेश कोरगावकर, राजू राऊळ उपस्थित होते.जठार म्हणाले, सिंधुदुर्ग भाजपाच्या जनसंपर्क अभियानाची सुरूवात रविवारपासून झाली. यावेळी अनेकांनी भाजपात प्रवेश केला. तसेच यापुढे ही भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढेल. या बैठकीत प्रामुख्याने भाजप जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक लढवणार, यावर ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तसेच सहकारामधील ही निवडणूक लढवण्याबाबत एकमत झाले आहे, असे जठार म्हणाले.जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रमोद जठार यांची वर्णी लागावी, असा ठराव दोडामार्ग व सावंतवाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यातील सीवर्ल्डचा प्रश्न किंवा विमानतळ हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात येणार असून समिती जनतेला विश्वासात घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. यामध्ये रेल्वे टर्मिनसचा ही मुद्दा असून टर्मिनस कुठे व्हावे, हे जनतेनेच ठरवावे, असे सांगत लवकरच रेल्वेच्या समस्यांबाबत आम्ही रेल्वेमंत्री तसेच राज्यातील इतर समस्या कशा सोडवाव्यात, यासाठी प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहे.यापुढे भाजप सरकार जनतेपर्यंत जाईल तसेच जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक महिन्याला मंत्र्यांना जिल्ह्यात आणण्यात येईल. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊन भाजपचे सध्या जनसंपर्क अभियान सुरू असून हे अभियान संपल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांना कोणती जबाबदारी द्यायची, याचा विचार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)