शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

महोत्सवामुळे रायगड जागतिक स्तरावर जाईल

By admin | Updated: January 5, 2016 02:03 IST

रायगड महोत्सवात शिवकालीन युग पर्यटकांना अनुभवता येईल. या महोत्सवामुळे रायगड जगाच्या नकाशावर जाण्यास मदत होणार आहे.

अलिबाग : रायगड महोत्सवात शिवकालीन युग पर्यटकांना अनुभवता येईल. या महोत्सवामुळे रायगड जगाच्या नकाशावर जाण्यास मदत होणार आहे. या कालावधीत पर्यटकांना आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने २१ ते २४ जानेवारीदरम्यान रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी किल्ले रायगड येथे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आम. भरतशेठ गोगावले, माजी आम. प्रवीण दरेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक आदी उपस्थित होते. तावडे म्हणाले, की या महोत्सवाच्या अनुषंगाने होणाऱ्या सर्व कार्यक्र मांच्या ठिकाणांची पाहणी केली आहे. महोत्सवाला येणाऱ्या पयर्टकांच्या सोयीसाठी येथे वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधा उपलब्ध होतील याची संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. या परिसरात रस्त्यावर लाइट लावण्याचे काम करावे तसेच पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध करावे. अग्निशमन यंत्रणा सुसज्ज ठेवावी यासाठी आवश्यक असणारा पाणीसाठा ठेवावा. अपघात होऊ नये याची खबरदारी घ्यावी, रायगड महोत्सव काळात योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवावी, इतर संस्थांची मदत घेत असताना आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणा उपलब्ध झाली पाहिजे. तत्काळ आरोग्यसेवा पुरविण्यात यावी, यासाठी डॉक्टारांचे पथक किल्ल्यावर, रोप-वेच्या ठिकाणी तसेच पायी जाणाऱ्या मार्गावर मध्यभागी ही यंत्रणा ठेवावी, अशा सूचना तावडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. (विशेष प्रतिनिधी)