शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Raigad: कर्नाळा खिंडीत वाहतुक कोंडी ;तब्बल तीन नवरदेवाना कोंडीचा फटका 

By वैभव गायकर | Updated: May 21, 2023 16:23 IST

Raigad: सकाळी 8.30 च्या सुमारास या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती.तब्बल एक ते दीड किमी पर्यंत वाहनांच्या रांगा यामुळे लागल्या होत्या.

- वैभव गायकरपनवेल - मुंबई गोवा महामार्ग विशेषतः अपघातांसाठी प्रसिद्ध आहे.या मार्गावर कर्नाळा खंडित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु असताना रविवार दि.21 रोजी झालेल्या वाहतुक कोंडीमुळे तब्बल तीन नवरदेव अडकल्याने नवरदेवांसह त्यांच्या वर्हाड्याना निश्चित स्थळी पोहचण्यास उशीर झाला.

सकाळी 8.30 च्या सुमारास या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती.तब्बल एक ते दीड किमी पर्यंत वाहनांच्या रांगा यामुळे लागल्या होत्या.कर्नाळा खंडित नेहमीच अपघातांसाठी प्रसिद्ध राहिली आहे.मात्र याठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे एक लेन पूर्णपणे बंद केल्याने सुट्टीचा दिवस असल्याने वाहनांची वर्दळ वाढल्याने सकाळी काही तासातच मोठी वाहनांची गर्दी झाली.यापैकी एक नवरदेव कल्याण मधून अलिबाग कडे जाण्यास निघाला होता.11 वाजता लग्नांचा मुहूर्त निश्चित असल्याने नाईलाजास्तव नवरदेव बसलेली गाडी रस्त्याच्या उलट बाजुने नेऊन गर्दीतून मार्ग काढावा लागला.कर्नाळा खंडित कॉक्रीटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे.एक मार्गिका बंद असल्याने दोम्ही मार्गावर मोठी वाहतुक कोंडी होत आहे.

मुंबई गोवा महामार्गावरून अलिबागच्या दिशेने जात असताना कर्नाळा खिंडीतून जाणे क्रमप्राप्त आहे.याशिवाय दुसरा कोणताच शॉर्टकट उपलब्ध नसल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक,लग्नाचे वर्हाडी याठिकाणी अडकले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRaigadरायगड