शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

Raigad: सागर सुरक्षा कवच अभियानात रायगड जिल्हा  उत्तीर्ण

By निखिल म्हात्रे | Updated: November 17, 2023 19:11 IST

Raigad News: सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात असणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू करण्यात आले होते.

- निखिल म्हात्रे अलिबाग - सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात असणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू करण्यात आले होते. मात्र या पहिल्याच दिवशी या अभियानात रायगड जिल्ह्यातील बोर्ली मोरापाडा येथे डमी अतिरेकी यांना पकडुन सागरी सुरक्षा कवच अभियान यशस्वी करण्यात आले.

सागरी सुरक्षा कवच अभियानाचे आयोजन हे पोलिस विभाग, भारतीय तटरक्षक रक्षक दल, भारतीय नौदल यांच्यासहित इतर गृह विभागाच्या सहकार्याने करण्यात आले असेल तरी या अभियानात सागर सुरक्षा रक्षक दलातील सदस्य यांना सहभागी करून घेतले जाते. या अभियान दरम्यान रायगड जिल्ह्यातील नाक्यानाक्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो. 

सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. ‘सागर कवच अभियानाला’ सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. त्याचप्रमाणे कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई येथे २६ /११ चा हल्ला देखील समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश मिळवुन केला होता

पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जाते. सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून सागरी कवच अभियान राबविण्यात येते. यंत्रणामधील सुसंवाद, सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबींवर आधारित सागर सुरक्षा कवच अभियान राबविण्यात आले होते. या अभियाना दोन सीएफएसआय दलाचे दोन कर्मचारी, पोलिस विभागातील दोन कर्मचारी, भारतीय तटरक्षक दलाचा एक जवान, तर एक नौदल विभागाचा एक जवान असे सहा जणांना भारतीय तटरक्षक दलाने डमी अतिरेकी समुद्रात पाठविण्यात आले होते.

सागर सुरक्षा कवच अभियान सुरू होण्यापूर्वी हे डमी अतिरेकी हे 16 नोव्हेबर 2023 रोजी पहाटे दीड वाजता समुद्रात बोट घेवुन गेले होते. हे अतिरेकी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी मुरुड तालुक्यातील बोर्ली गावातील मोरापाडा येथे बोटी मधून उतरत असताना रात्री सुरक्षेसाठी कार्यरत असणारे सहायक फौजदार सुधाकर पाटील, पोलिस नाईक घासे, सुरक्षा रक्षक, सागरी सुरक्षा दलाचे सदस्य अमुल कुमार जैन, अंजुम सुभेदार यांनी त्या अतिरेकी यांना अडवून त्यांची सखोल चौकशी केली असतां त्यांना डमी अतिरेकी म्हणून पाठवणी करण्यात आले होते.

टॅग्स :Raigadरायगड