शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

Raigad: सागर सुरक्षा कवच अभियानात रायगड जिल्हा  उत्तीर्ण

By निखिल म्हात्रे | Updated: November 17, 2023 19:11 IST

Raigad News: सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात असणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू करण्यात आले होते.

- निखिल म्हात्रे अलिबाग - सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात असणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू करण्यात आले होते. मात्र या पहिल्याच दिवशी या अभियानात रायगड जिल्ह्यातील बोर्ली मोरापाडा येथे डमी अतिरेकी यांना पकडुन सागरी सुरक्षा कवच अभियान यशस्वी करण्यात आले.

सागरी सुरक्षा कवच अभियानाचे आयोजन हे पोलिस विभाग, भारतीय तटरक्षक रक्षक दल, भारतीय नौदल यांच्यासहित इतर गृह विभागाच्या सहकार्याने करण्यात आले असेल तरी या अभियानात सागर सुरक्षा रक्षक दलातील सदस्य यांना सहभागी करून घेतले जाते. या अभियान दरम्यान रायगड जिल्ह्यातील नाक्यानाक्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो. 

सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. ‘सागर कवच अभियानाला’ सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. त्याचप्रमाणे कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई येथे २६ /११ चा हल्ला देखील समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश मिळवुन केला होता

पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जाते. सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून सागरी कवच अभियान राबविण्यात येते. यंत्रणामधील सुसंवाद, सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबींवर आधारित सागर सुरक्षा कवच अभियान राबविण्यात आले होते. या अभियाना दोन सीएफएसआय दलाचे दोन कर्मचारी, पोलिस विभागातील दोन कर्मचारी, भारतीय तटरक्षक दलाचा एक जवान, तर एक नौदल विभागाचा एक जवान असे सहा जणांना भारतीय तटरक्षक दलाने डमी अतिरेकी समुद्रात पाठविण्यात आले होते.

सागर सुरक्षा कवच अभियान सुरू होण्यापूर्वी हे डमी अतिरेकी हे 16 नोव्हेबर 2023 रोजी पहाटे दीड वाजता समुद्रात बोट घेवुन गेले होते. हे अतिरेकी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी मुरुड तालुक्यातील बोर्ली गावातील मोरापाडा येथे बोटी मधून उतरत असताना रात्री सुरक्षेसाठी कार्यरत असणारे सहायक फौजदार सुधाकर पाटील, पोलिस नाईक घासे, सुरक्षा रक्षक, सागरी सुरक्षा दलाचे सदस्य अमुल कुमार जैन, अंजुम सुभेदार यांनी त्या अतिरेकी यांना अडवून त्यांची सखोल चौकशी केली असतां त्यांना डमी अतिरेकी म्हणून पाठवणी करण्यात आले होते.

टॅग्स :Raigadरायगड