शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

Raigad: सागर सुरक्षा कवच अभियानात रायगड जिल्हा  उत्तीर्ण

By निखिल म्हात्रे | Updated: November 17, 2023 19:11 IST

Raigad News: सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात असणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू करण्यात आले होते.

- निखिल म्हात्रे अलिबाग - सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात असणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू करण्यात आले होते. मात्र या पहिल्याच दिवशी या अभियानात रायगड जिल्ह्यातील बोर्ली मोरापाडा येथे डमी अतिरेकी यांना पकडुन सागरी सुरक्षा कवच अभियान यशस्वी करण्यात आले.

सागरी सुरक्षा कवच अभियानाचे आयोजन हे पोलिस विभाग, भारतीय तटरक्षक रक्षक दल, भारतीय नौदल यांच्यासहित इतर गृह विभागाच्या सहकार्याने करण्यात आले असेल तरी या अभियानात सागर सुरक्षा रक्षक दलातील सदस्य यांना सहभागी करून घेतले जाते. या अभियान दरम्यान रायगड जिल्ह्यातील नाक्यानाक्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो. 

सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. ‘सागर कवच अभियानाला’ सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. त्याचप्रमाणे कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई येथे २६ /११ चा हल्ला देखील समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश मिळवुन केला होता

पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जाते. सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून सागरी कवच अभियान राबविण्यात येते. यंत्रणामधील सुसंवाद, सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबींवर आधारित सागर सुरक्षा कवच अभियान राबविण्यात आले होते. या अभियाना दोन सीएफएसआय दलाचे दोन कर्मचारी, पोलिस विभागातील दोन कर्मचारी, भारतीय तटरक्षक दलाचा एक जवान, तर एक नौदल विभागाचा एक जवान असे सहा जणांना भारतीय तटरक्षक दलाने डमी अतिरेकी समुद्रात पाठविण्यात आले होते.

सागर सुरक्षा कवच अभियान सुरू होण्यापूर्वी हे डमी अतिरेकी हे 16 नोव्हेबर 2023 रोजी पहाटे दीड वाजता समुद्रात बोट घेवुन गेले होते. हे अतिरेकी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी मुरुड तालुक्यातील बोर्ली गावातील मोरापाडा येथे बोटी मधून उतरत असताना रात्री सुरक्षेसाठी कार्यरत असणारे सहायक फौजदार सुधाकर पाटील, पोलिस नाईक घासे, सुरक्षा रक्षक, सागरी सुरक्षा दलाचे सदस्य अमुल कुमार जैन, अंजुम सुभेदार यांनी त्या अतिरेकी यांना अडवून त्यांची सखोल चौकशी केली असतां त्यांना डमी अतिरेकी म्हणून पाठवणी करण्यात आले होते.

टॅग्स :Raigadरायगड