शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Raigad News: उरण बीपीसीएलच्या १४०० कोटी विस्तारित प्रकल्पातही प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 22:34 IST

Raigad News: उरण येथील बीपीसीएल प्रकल्पात सुमारे १५० प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील ३० वर्षांपासून अद्यापही नोकऱ्यांपासून वंचित आहेत.या प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांचा नोकऱ्यांसाठी गेल्या ३० वर्षांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे.

- मधुकर ठाकूर

उरण - उरण येथील बीपीसीएल प्रकल्पात सुमारे १५० प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील ३० वर्षांपासून अद्यापही नोकऱ्यांपासून वंचित आहेत.या प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांचा नोकऱ्यांसाठी गेल्या ३० वर्षांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. मात्र ३० वर्षांच्या संघर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नसल्याने  प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या प्रवेशव्दारावरच बेमुदत सुरू केले आहे. साखळी उपोषणानंतरही बीपीसीएल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी ९ ऑक्टोबर रोजी  गेटबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत ३० वर्षांपूर्वी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या प्रकल्पासाठी भेंडखळ,बोकडवीरा, डोंगरी,फुंण्डे,आदी गावातील सुमारे ३००शेतकऱ्यांच्या २०७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेल्या आहेत.जमिनी संपादन करताना प्रकल्पग्रस्तांना वारेमाप आश्वासने देण्यात आली होती.यामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे.मात्र आजतागायत ३०० प्रकल्पग्रस्तांपैकी फक्त १७० लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत.उर्वरित प्रकल्पबाधीतांनाही प्रकल्पात नोकऱ्या देण्याच्या मागणीसाठी मागील ३० वर्षांपासून बीपीसीएल विरोधात प्रकल्पग्रस्तांचा जोरदार संघर्ष सुरु आहे. बीपीसीएल प्रशासनासोबत अनेकदा निवेदन, चर्चा, बैठका पार पडलेल्या आहेत.निदर्शने,मोर्चे, आंदोलनही करण्यात आली आहेत.मात्र प्रकल्पग्रस्तांच्या पदरी आश्वासनांशिवाय काहीही हाती लागले नाही.

आता तर बीपीसीएल प्रकल्पाचे खासगीकरण करण्यात आले आहे.या खासगीकरणानंतर येथील प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी १४०० कोटी रुपये खर्चून एचपीसीएल प्रोजेक्ट, स्टोरेजटॅन्क आदी उभारण्यात येत आहेत.त्यानंतरही स्थानिक भुमीपुत्र प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासून आणि भुमीपुत्रांना डावलून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय  कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. स्थानिकांना मात्र नोकर भरतीपासून वंचित ठेवण्यात येत आहे.यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी कंपनी प्रशासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. परंतु बीपीसीएल कंपनी प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे बीपीसीएल प्रकल्पाच्या मनमानी कारभारामुळे प्रकल्पग्रस्त त्रस्त झाले आहेत.प्रकल्पग्रस्तांना बीपीसीएल प्रशासन जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.त्या व्यतिरिक्त १७० स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांपैकी सुमारे ८० कामगार सेवा निवृत्त झाले आहेत.तर काही मृत्यू पावले आहेत.मात्र त्यानंतरही मागील ३० वर्षांपासून एकाही प्रकल्पग्रस्त कामगारांची भरती करण्यात आली नसल्याची माहिती प्रकल्पग्रस्त किरण घरत यांनी दिली.

बीपीसीएल प्रशासन जुमानत संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी येथील भारत पेट्रोलियम विरोधात प्रकल्पग्रस्तांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. आधी  उपोषण त्यानंतर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.मात्र या साखळी  उपोषणानंतरही बीपीसीएल प्रशासनाकडून प्रश्न सुटला नाही तर ९ ऑक्टोंबरपासुन सर्वपक्षीयांच्या नेतृत्वाखाली गेटबंद  आंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशाराही प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

टॅग्स :Raigadरायगडjobनोकरी