शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘हागणदारीमुक्ती’ रायगड मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:42 IST

रायगड जिल्हा हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करताना आपल्या निर्धारित लक्ष्यापासून काही अंशी मागे आहे. अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांनी त्यामध्ये आपले शंभर टक्के योगदान दिल्यास जिल्हा स्वच्छ भारत अभियानात आघाडीवर राहणार असल्याचे स्पष्ट होते.

अलिबाग : रायगड जिल्हा हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करताना आपल्या निर्धारित लक्ष्यापासून काही अंशी मागे आहे. अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांनी त्यामध्ये आपले शंभर टक्के योगदान दिल्यास जिल्हा स्वच्छ भारत अभियानात आघाडीवर राहणार असल्याचे स्पष्ट होते.शौचालये उभारण्याच्या कामांमध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी आपापले योगदान दिले आहे. तीन लाख ३४ हजार  ९१८ शौचालयांपैकी आतापर्यंत तब्बल तीन लाख १५ हजार ९०५ शौचालये उभारण्यात रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला यश आले आहे. आपल्या निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करण्यामध्ये म्हसळा आणि तळा तालुका आघाडीवर राहिला आहे. त्यांनी आपल्या वाट्याचे शंभर टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. त्या खालोखाल महाड तालुक्याने ९७.७१ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. त्यांनी ३३ हजार ४७६ शौचालये बांधली आहेत. उरण ८७.९० टक्के टार्गेट पूर्ण केले (२० हजार ४०५), पोलादपूर ९६.८१ टक्के टार्गेट पूर्ण केले  (नऊ हजार ७०९), माणगाव ९६.३९ टक्के टार्गेट पूर्ण केले  (२८ हजार १६२), मुरु ड ९६.२६ (१२ हजार ४७२), रोहा ९६.१६ (२५ हजार २९६), श्रीवर्धन ९५.६३ (१४ हजार ४३२), खालापूर ९५.१८ (२१ हजार १०८), सुधागड ९२.८१ (१४  हजार १२३), पनवेल ९२.९१ (३२ हजार ९२०), अलिबाग ८८.३९ (३५ हजार ८६९), पेण ८१.२३ (२४ हजार ८३०), कर्जत ७४.४६ (२३ हजार ७२५) अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांचे टार्गेट अद्यापही मोठे आहे. १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प होता. मात्र, या तीन तालुक्यांमुळे ते आता शक्य होणार नसल्याचे स्पष्ट होते.तीन तालुक्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी यामध्ये पुढाकार घेतल्यास लक्ष्यांक गाठणे कठीण होणार नाही. या तालुक्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांनी सांगितले.