शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

‘हागणदारीमुक्ती’ रायगड मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:42 IST

रायगड जिल्हा हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करताना आपल्या निर्धारित लक्ष्यापासून काही अंशी मागे आहे. अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांनी त्यामध्ये आपले शंभर टक्के योगदान दिल्यास जिल्हा स्वच्छ भारत अभियानात आघाडीवर राहणार असल्याचे स्पष्ट होते.

अलिबाग : रायगड जिल्हा हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करताना आपल्या निर्धारित लक्ष्यापासून काही अंशी मागे आहे. अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांनी त्यामध्ये आपले शंभर टक्के योगदान दिल्यास जिल्हा स्वच्छ भारत अभियानात आघाडीवर राहणार असल्याचे स्पष्ट होते.शौचालये उभारण्याच्या कामांमध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी आपापले योगदान दिले आहे. तीन लाख ३४ हजार  ९१८ शौचालयांपैकी आतापर्यंत तब्बल तीन लाख १५ हजार ९०५ शौचालये उभारण्यात रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला यश आले आहे. आपल्या निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करण्यामध्ये म्हसळा आणि तळा तालुका आघाडीवर राहिला आहे. त्यांनी आपल्या वाट्याचे शंभर टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. त्या खालोखाल महाड तालुक्याने ९७.७१ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. त्यांनी ३३ हजार ४७६ शौचालये बांधली आहेत. उरण ८७.९० टक्के टार्गेट पूर्ण केले (२० हजार ४०५), पोलादपूर ९६.८१ टक्के टार्गेट पूर्ण केले  (नऊ हजार ७०९), माणगाव ९६.३९ टक्के टार्गेट पूर्ण केले  (२८ हजार १६२), मुरु ड ९६.२६ (१२ हजार ४७२), रोहा ९६.१६ (२५ हजार २९६), श्रीवर्धन ९५.६३ (१४ हजार ४३२), खालापूर ९५.१८ (२१ हजार १०८), सुधागड ९२.८१ (१४  हजार १२३), पनवेल ९२.९१ (३२ हजार ९२०), अलिबाग ८८.३९ (३५ हजार ८६९), पेण ८१.२३ (२४ हजार ८३०), कर्जत ७४.४६ (२३ हजार ७२५) अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांचे टार्गेट अद्यापही मोठे आहे. १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प होता. मात्र, या तीन तालुक्यांमुळे ते आता शक्य होणार नसल्याचे स्पष्ट होते.तीन तालुक्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी यामध्ये पुढाकार घेतल्यास लक्ष्यांक गाठणे कठीण होणार नाही. या तालुक्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांनी सांगितले.