शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

रायगडला मिळाले ७० कोटी, निधीचे वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:09 IST

वादळामुळे मोठी हानी : भरपाईपोटी प्राप्त निधीचे वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

निखिल म्हात्रे 

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार आणि नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या भरपाईपोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या १०० पैकी ७० कोटी प्राप्त झाले आहेत. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना या प्राप्त निधीचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. त्यामुळे आता मदतीचे वाटप करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत अनेक मंत्री, नेत्यांचे दौरे नुकसानग्रस्त भागात झालेले आहेत; परंतु आश्वासनाव्यतिरिक्त कोणतीही मदत देण्यात आलेली नव्हती. नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी शेती-बागायतीपेक्षा घरादारांकडे लक्ष देण्याची भूमिका प्रशासनाने कृषिमंत्र्यांसमोर मांडली होती. आता कपडे, भांडी, घरे, कृषी या बाबींसाठी तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संबंधितांना दिले.नुकसानीचे सुयोग्य निकष तयार करता करता सरकार-प्रशासनही चक्रावले आहे. विरोधी पक्षनेत्यांनी श्रीवर्धन दौºयात १० दिवस उलटूनही वादळग्रस्त रायगडकरांच्या हातात फुटकी कवडीही पडली नसल्याची टीका नुकतीच केली होती. या पार्श्वभूमीवर रायगडला प्राप्त झालेली ७० कोटींची मदत काटेकोर वाटप करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.रायगड जिल्ह्यामध्ये वादळामुळे झालेले एकूण नुकसान१जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात वादळामुळे जवळपास दोन हजार २४०० कच्ची घरे, ७३० पक्की घरे नष्ट झाली आहेत. एक लाख ६३ हजार घरे, २२ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा, एक हजार ४०० शाळा, एक हजार अंगणवाड्या, ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १२ ग्रामीण रुग्णालये, १५ जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय दवाखाने, तीन तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालये, जिल्हा पशू वैद्यकीय चिकित्सालयाचे नुकसान झाले आहे.२तसेच ११५ लहान-मोठी गुरेढोरे, ७२ हजार ७६० कोंबड्या, म्हसळा येथील शेळी फार्ममधील १५० पैकी नऊ शेळ्या मृत पावल्या आहेत. सद्य:स्थितीत अजूनही पंचनामे करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. त्या वेळी नुकसानीची सविस्तर माहिती अंतिम करता येईल. मात्र नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत देण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे.असे होणार निधीचे वाटपच्७ कोटी ५० लाख पूर्णत: पडलेली घरे, तसेच कपडे, भांडी, इतर वस्तूंसाठी स्वतंत्र ७ कोटी ५० लाख देण्यात आले आहेत.च्सार्वजनिक क्षेत्रातील कचरा, ढिगारे उचलण्यासाठी दोन कोटीच्बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २२ कोटीच्मृत जनावरांसाठी १२ कोटीच्पूर्णत: नष्ट झालेल्या आणि अंशत: पडझड झालेल्या पक्क्या व कच्चा घरांसाठी ११ कोटी ६२ लाखच्दुकानदार आणि टपरीधारकांसाठी एक कोटी रुपयांचे वाटप करायचे आहे.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग