शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

रायगड जिल्हा पर्यटकांनी हाउसफुल्ल, समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:17 IST

नववर्षाचे सेलिब्रेशन एखाद्या हॉट डेस्टिनेशवर करण्याचा ट्रेड सध्या पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

अलिबाग : नववर्षाचे सेलिब्रेशन एखाद्या हॉट डेस्टिनेशवर करण्याचा ट्रेड सध्या पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.मौज-मस्ती आणि सोबतीला साग्रसंगीताची मजा अनुभवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांना अधिकची पसंती दिली जात आहे, त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणारी शहरे आणि गावे पर्यटकांच्या गर्दीमध्ये चांगलीच नाहून निघाली आहेत. येथील विविध हॉटेल्स, रेस्टारंट, रिसार्ट आणि कॉटेजेस हाउसफुल्ल झाली आहेत. सोमवारी साजरा केल्या जाणाºया सेलिब्रेशनसाठी शनिवार आणि रविवारीच पर्यटक दाखल झाल्याने न्यू इयर पार्ट्यांना चांगलीच रंगत येणार असल्याचे दिसून येते.सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, माथेरान अशा विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी केली आहे.नागरिकांना आवाहनप्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या मध्यरात्री ठाणे-बेलापूर रोड, सायन- पनवेल महामार्ग, पामबीच रोडवर चक्काजाम होत असते. वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रमुख रोडवर बंदोबस्त वाढविला आहे. मद्यपान करून वाहने चालविणाºयांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हॉटेल्स, पबमध्ये साध्या वेशातील पोलीसही पाळत ठेवणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाºयांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मद्यपानाऐवजी सहकुटुंब नवीन वर्षाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नववर्षाच्या स्वागतास फार्महाउसही सज्जपेण : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पेणमधील तरु णाई सज्ज झाली असून, या तरुणाईकडून पार्ट्यांचे नियोजन, आवडीची ठिकाणे याचबरोबर पेण शहराच्या आसपासच्या परिसरातील फार्महाउसची निवड केली जात आहे. २०१८ सरत्या वर्षाला निरोप देण्यासह नववर्ष २०१९ चे जल्लोषात स्वागत करण्यासाठी फार्महाउस, हॉटेल, रिसार्ट या ठिकाणी सोमवारी सांयकाळपासून रात्रभर थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनच्या रंगतदार पार्ट्यांना उधाण येणार आहे.मुंबई, पुणे तसेच राज्यातून येणाºया पर्यटकांच्या वाहनांची संख्या पाहता मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ वाढणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. जिते ते वडखळ, वडखळ ते अलिबाग, इंदापूर, माणगाव ही वाहतूककोंडीची ठिकाणे आहेत, त्यामुळे या ठिकाणांसह शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांवर पोलिसांची चांगलीच नजर राहणार आहे.अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाºयांवर सध्या पर्यटकांनी फुलला आहे. त्याच्या दिमतीला पॅरासिलिंग, बनाना राइड, स्कुबा ड्रायव्हिंग, जेटस्की, स्पीड बोट, घोडे-उंट याची सफर अशा विविध मनोरंजनाची साधने तैनात करण्यात आली आहेत.समुद्रकिनारी समुद्र सफरीचा आनंद लुटणाºया पर्यटकांसाठी सक्तीने लाइफ जॅकेट संबंधित व्यावसायिकाने पुरवणे जिल्हा प्रशासनाने बंधनकारक केले आहे, त्यामुळे लाइफ जॅकेट घातल्याशिवाय पर्यटकांना बोटीतून फिरता येणार नाही. प्रशासनाने याबाबत मेरीटाइम बोर्डाला तसे सक्त आदेश दिले आहेत, त्यामुळे अपघात झाल्यास पर्यटकांचे प्राण वाचणार आहेत. संबंधित बोट व्यावसायिक सूचनांचे पालन करतात की नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारीही बंदर प्रभारींवर निश्चित केली आहे.समुद्रकिनारी असणाºया कॉटेजमध्येही पर्यटकांसाठी विविध मनोरंजनाचे खेळ, आॅर्केस्टा यांची व्यवस्था केली आहे. खवय्यांसाठी कोकणी, गोमंतक, आगरी, कोळी अशा पदार्थांची मेजवानी राहणार.पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध हॉटेल, रेस्टारंटच्या व्यवस्थापनाने डिजे नाइट पार्टीचे आयोजन केले आहे. यासाठी विविध पॅकेजच त्यांनी पर्यटकांना देऊ केली आहेत. त्यामध्ये खाणे-पिणे, नाचगाणी यांचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागाने काही रेस्टारंट यांना तात्पुरत्या स्वरूपात परवाने दिले आहेत. बनावट मद्य विक्री करणाºयांवरही नजर ठेवली आहे.

टॅग्स :Raigadरायगड