शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा अव्वल

By admin | Updated: March 19, 2017 05:37 IST

जिल्ह्यात नगरपालिका, रायगड जिल्हा परिषद व १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे मोठ्या कालावधी करिता निवडणूक आचारसंहिता लागू होती. परिणामी, नवीन

- जयंत धुळप,  अलिबागजिल्ह्यात नगरपालिका, रायगड जिल्हा परिषद व १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे मोठ्या कालावधी करिता निवडणूक आचारसंहिता लागू होती. परिणामी, नवीन विकासकामे सुरू करण्यात अडचण येत होत्या; परंतु जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय यांनी सरकारकडून आलेल्या निधीचा योग्य वापर करून विकासकामे करण्याकरिता निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नियोजन केले होते. त्यानुसार नियोजित कालावधीत विकासकामांकरिता निधी खर्च करण्यात रायगड जिल्ह्याने संपूर्ण कोकणात प्रथम क्रमांक पटकावला आहे.कोकण महसूल विभागात निधी खर्च करण्यात रायगड प्रथम क्र मांकावर असून आतापर्यंत ६४ टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधीचे वाटप येत्या १० दिवसांत करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन विभागांतर्गत येणारा सर्व निधी यावर्षी खर्ची पडणार असून कोणत्याही विभागाचा निधी परत जाणार नसल्याचे विश्वास जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी व्यक्त केला आहे.रायगड जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन जिल्हा समितीमार्फत करून मोठ्या प्रमाणात विकास निधी वेगवेगळ्या विभागांना पुरविला जातो. रायगड जिल्ह्याची २०१६-१७ या आर्थिक वर्षाची तरतूद १६० कोटी रुपये आहे. यापैकी १५१ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले असून आतापर्यंत त्यापैकी १०४ कोटी रुपयांची कामे प्रत्यक्ष पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.जिल्हा नियोजन समितीअंतर्गत एकूण ३५ विभागांना निधीचा पुरवठा केला जातो. त्यापैकी पशुसंवर्धन विभागाला ३ कोटी ७४ लाख रुपये, रस्त्यासाठी १८ कोटी, तर साकवांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद आहे. मत्स्य विभागाकरिता ४ कोटी ५५ लाख रुपये, वनविभागाकरिता १३ कोटी रुपये, जिल्हा उद्योग केंद्राकरिता ५४ लाख रुपये, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकरिता १ कोटी २० लाख रुपये, तर जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत नागरी सुविधांसाठी ७ कोटी रुपये, रायगड जिल्हा रुग्णालयाकरिता ७ कोटी रुपये, क्र ीडा विभाग १ कोटी ५४ लाख रुपये, तर अंगणवाडीसाठी ३ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नगरविकास विभागासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले. वाटप झालेल्या १५१ कोटी रुपयांच्या निधी पैकी १०४ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. रत्नागिरीमध्ये ७५ कोटी, सिंधुदुर्गात ७१ कोटी, तर रायगडमध्ये १५१ कोटी खर्च कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याची वार्षिक निधी तरतूद १५८ कोटी रुपये असून आतापर्यंत ४८ टक्के म्हणजे ७५ कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची वार्षिक निधी तरतूद १३० असून आतापर्यंत ५५ टक्के म्हणजे ७१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रायगड मध्ये १५१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे कोकण विभागात जिल्हा नियोजनाचा निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा प्रथम ठरला आहे. त्यावर्षीचा विकास निधी त्याच नियोजित वर्षात खर्च करणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले सातत्याने सर्व विभागाचा वारंवार आढावा घेत आहेत. गेल्या वर्षी रायगडचा ९ कोटी रुपयांचा निधी वापरला गेला नव्हता. परिणामी, तो आर्थिक वर्षअखेरीस शासनास समर्पित करावा लागला होता. यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याकरिता दक्षता घेतली जात असल्याचे जाधव यांनी अखेरीस सांगितले.