शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा अव्वल

By admin | Updated: March 19, 2017 05:37 IST

जिल्ह्यात नगरपालिका, रायगड जिल्हा परिषद व १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे मोठ्या कालावधी करिता निवडणूक आचारसंहिता लागू होती. परिणामी, नवीन

- जयंत धुळप,  अलिबागजिल्ह्यात नगरपालिका, रायगड जिल्हा परिषद व १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे मोठ्या कालावधी करिता निवडणूक आचारसंहिता लागू होती. परिणामी, नवीन विकासकामे सुरू करण्यात अडचण येत होत्या; परंतु जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय यांनी सरकारकडून आलेल्या निधीचा योग्य वापर करून विकासकामे करण्याकरिता निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नियोजन केले होते. त्यानुसार नियोजित कालावधीत विकासकामांकरिता निधी खर्च करण्यात रायगड जिल्ह्याने संपूर्ण कोकणात प्रथम क्रमांक पटकावला आहे.कोकण महसूल विभागात निधी खर्च करण्यात रायगड प्रथम क्र मांकावर असून आतापर्यंत ६४ टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधीचे वाटप येत्या १० दिवसांत करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन विभागांतर्गत येणारा सर्व निधी यावर्षी खर्ची पडणार असून कोणत्याही विभागाचा निधी परत जाणार नसल्याचे विश्वास जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी व्यक्त केला आहे.रायगड जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन जिल्हा समितीमार्फत करून मोठ्या प्रमाणात विकास निधी वेगवेगळ्या विभागांना पुरविला जातो. रायगड जिल्ह्याची २०१६-१७ या आर्थिक वर्षाची तरतूद १६० कोटी रुपये आहे. यापैकी १५१ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले असून आतापर्यंत त्यापैकी १०४ कोटी रुपयांची कामे प्रत्यक्ष पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.जिल्हा नियोजन समितीअंतर्गत एकूण ३५ विभागांना निधीचा पुरवठा केला जातो. त्यापैकी पशुसंवर्धन विभागाला ३ कोटी ७४ लाख रुपये, रस्त्यासाठी १८ कोटी, तर साकवांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद आहे. मत्स्य विभागाकरिता ४ कोटी ५५ लाख रुपये, वनविभागाकरिता १३ कोटी रुपये, जिल्हा उद्योग केंद्राकरिता ५४ लाख रुपये, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकरिता १ कोटी २० लाख रुपये, तर जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत नागरी सुविधांसाठी ७ कोटी रुपये, रायगड जिल्हा रुग्णालयाकरिता ७ कोटी रुपये, क्र ीडा विभाग १ कोटी ५४ लाख रुपये, तर अंगणवाडीसाठी ३ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नगरविकास विभागासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले. वाटप झालेल्या १५१ कोटी रुपयांच्या निधी पैकी १०४ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. रत्नागिरीमध्ये ७५ कोटी, सिंधुदुर्गात ७१ कोटी, तर रायगडमध्ये १५१ कोटी खर्च कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याची वार्षिक निधी तरतूद १५८ कोटी रुपये असून आतापर्यंत ४८ टक्के म्हणजे ७५ कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची वार्षिक निधी तरतूद १३० असून आतापर्यंत ५५ टक्के म्हणजे ७१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रायगड मध्ये १५१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे कोकण विभागात जिल्हा नियोजनाचा निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा प्रथम ठरला आहे. त्यावर्षीचा विकास निधी त्याच नियोजित वर्षात खर्च करणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले सातत्याने सर्व विभागाचा वारंवार आढावा घेत आहेत. गेल्या वर्षी रायगडचा ९ कोटी रुपयांचा निधी वापरला गेला नव्हता. परिणामी, तो आर्थिक वर्षअखेरीस शासनास समर्पित करावा लागला होता. यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याकरिता दक्षता घेतली जात असल्याचे जाधव यांनी अखेरीस सांगितले.