शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रायगड जिल्ह्यात चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:06 IST

अयोध्येमधील जमीन ही रामलल्लाचीच असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वाेच्च न्यायालयाने शनिवारी दिला.

अलिबाग : अयोध्येमधील जमीन ही रामलल्लाचीच असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वाेच्च न्यायालयाने शनिवारी दिला. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकाल जाहीर झाल्यावर सर्वधर्मीयांनी समाधान व्यक्त केले.अलिबाग, पेण आणि महाडमधील राम मंदिरामध्ये घंटा नाद आणि महाआरतीचा कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटनांनी साजरा करणार होते. मात्र, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव त्यांना परवानगी देण्यात आली नाही. कायद्याची बंधणे असल्याने कोणाच्याही भावना दुखवणार नाहीत याचे भान ठेवणे आवश्यक आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असल्याचे या वेळी भाजपचे नेते अ‍ॅड. महेश मोहिते यांनी ‘लोकमत’ला सांगितले.निकालाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील असणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्याचप्रमाणे समाजमाध्यमातून काही आक्षेपार्ह आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशा पोस्टवरही पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून आपली नजर ठेवली होती.जिल्ह्यात ११४ पोलीस अधिकारी, एसआरपीएफच्या दोन तुकड्या, ३५० मुख्यालय कर्मचारी, एक हजार ६०० स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ५११ होमगार्ड, दोन दंगल नियंत्रक पथके, असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन आधीच केले होते. जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिसांनी ही पावले उचलली होती. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.>अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनम्हसळा : अयोध्येतील जमीनमालकीच्या वादावरील निकाल शनिवारी लागला. नागरिकांनी निकालानंतर कोणत्याही अफवांना बळी पडू नये, अफवा पसरवू नये, कोणतीही शंका आली तरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन म्हसळेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी केले.निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहविभाग, जिल्ह्यांत व प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत शांततेचे आवाहन केले आहे, त्याच अनुषंगाने श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा शहरात रूटमार्च काढण्यात आला. यामध्ये श्रीवर्धन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, दिघी सागरीचे स.पो.नि. महेंद्र शेलार, पोलीस उपनिरीक्षक शेख, एस.आर.पी. स्ट्राइकिंग फोर्स, आर.सी.पी. स्थानिक व श्रीवर्धन आणि दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी सहभागी होते.>पनवेलमध्ये फौजफाटा तैनातपनवेल : अयोध्या निकाल प्रकरणी पनवेल परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकरिता परिमंडळ-२ च्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या मशीद, रेल्वे स्टेशन, चौक आदी ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता.दिवसभर कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेचे वातावरण होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने धार्मिक सलोखा कायम राहावा याकरिता डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली होती.सर्वधर्मीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या डॉक्युमेंट्रीत शांतता राखण्याचे आवाहन केले होते. पोलिसांमार्फत सोशल मीडियावरही निकालाच्या अनुषंगाने कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले होते.>अयोध्येमधील विवादीत जमीन ही रामलल्लाची असल्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयाने खरोखरच आनंद होत आहे. सर्व समावेशक निर्णय दिल्याने तो सर्वांनाच मान्य आहे. त्याबद्दल न्यायदेवतेचे प्रथम आभार मानतो.- भरत गोगावले, आमदार>शेकडो वर्षे प्रलंबित प्रश्नावर सर्वाेच्च न्यायालयाने निकाल देत वादावर पडदा टाकला आहे. भावनिक आणि धार्मिक चौकटीत न अडकता फक्त कायद्याच्या कसोटीवर सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्याचे स्वागत आहे. आता या प्रश्नाचे कोणीही भांडवल करू नये.- उल्का महाजन,सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर