शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रायगड जिल्ह्यात महाश्रमदान, ६३४ ग्रामपंचायती : ११,६३३ नागरिकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 04:51 IST

‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाला रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींपैकी ६३४ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी एकाच वेळी महाश्रमदान दिन साजरा करण्यात आला.

-आविष्कार देसाईअलिबाग : ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाला रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींपैकी ६३४ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी एकाच वेळी महाश्रमदान दिन साजरा करण्यात आला. स्वयंस्फूर्तीने ११ हजार ६३३ नागरिकांनी आपल्या हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.विविध पंचायतीमधील सुमारे सहा हजार ८४० कर्मचाऱ्यांनीही आपापल्या विभागाची स्वच्छता केली. मोहिमेतून हजारो टन कचरा गोळा करण्यात आला. हे अभियान १२ आॅक्टोबर २०१८ पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतीत येत्या काही दिवसांमध्ये स्वच्छता मोहीम राबवणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली.रायगड जिल्ह्याने आतापर्यंत राबवण्यात आलेल्या विविध स्वच्छतेशी संबंधित अभियानात चांगली कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात आठवा तर कोकणामध्ये अव्वल स्थान पटाकवण्यामध्ये जिल्ह्याने बाजी मारली होती. हागणदारीमुक्तीमध्येही जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाची सुरुवात केली आहे. २ आॅक्टोबरपर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे. प्रत्येक नागरिकाने यामध्ये स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग देणे अपेक्षित आहे.याच योजनेचा भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील तब्बल ८०६ ग्रामपंचायतींपैकी ६३४ ग्रामपंचायतींमध्ये महाश्रमदान दिन पाळण्यात आला. विशेष करुन मंगळवारी मोठ्या संख्येने ग्रामपंचायती यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तब्बल ११ हजार ६३३ नागरिकांना यामध्ये सहभाग घेत स्वत:च्या हातामध्ये झाडू घेत त्यांनी आपापल्या गावाची स्वच्छता केली. त्यांच्या जोडीला त्यात्या विभागातील सहा हजार ८४० कर्मचारीही मदतीला होते. स्वच्छता मोहिमेतून हजारो टन कचरा गोळा करण्यात आल्याने पंचायती चकाचक झाल्या होत्या.नागरिकांमध्ये प्लॅस्टिकबंदीबाबत जागृतीअलिबाग शहरापासून जवळच असणाºया थळ ग्रामपंचायतीमध्येही ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे, रविकिरण गायकवाड, सुनील माळी, सरपंच रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामसेवक ठाकूर यांच्यासह अन्य कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवला. मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकरही बुधवारी होणाºया मोहिमेत सहभागी होणार असल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले.सरकारने प्लॅस्टिकबंदी करण्याआधी सर्वत्र मोठ्या संख्येने कचºयामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, ग्लास, थर्माकोलच्या थाळ््या दिसून यायच्या मात्र आता त्यावर चाप बसला आहे. कचºयामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण कमी झाल्याचे गोळा केलेल्या कचºयावरुन दिसून येत असल्याचा दावा पाणी व स्वच्छता विभागाने केला आहे. नागरिकांमध्ये प्लॅस्टिकच्या वापराबाबत जागृती होत असल्याचे यावरुन दिसून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या