शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Raigad: साळाव पुलाचे काम संथपण, वाहतूकीस अडथळा

By निखिल म्हात्रे | Updated: May 10, 2024 15:16 IST

Raigad News: साळाव पुलाचे दुरूस्तीचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, काही ठिकाणी एकमार्ग ठेवण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुलावर वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील उद्भवत आहे.

- निखिल म्हात्रेअलिबाग - साळाव पुलाचे दुरूस्तीचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, काही ठिकाणी एकमार्ग ठेवण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुलावर वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील उद्भवत आहे.

अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्याला मध्यवर्ती असलेला व मुरूड तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आल्याने साळाव पुलावरून वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ दिसून येते. मागील दोन वर्षांपासून साळाव पुलाच्या दुरूस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. गतवर्षी काही काम पूर्ण झाले होते. दरम्यान, पावसाळा संपल्यानंतर पुन्हा पुलाच्या दुरूस्तीच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यांपासून पूल दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु, ते अत्यंत संथ गतीने सुरू असल्यचा आरोप स्थानिकांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कामात अडथळा नको म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलावरून अवजड वाहतुकीस पूर्णपणे बंदी असून, छोट्या वाहनांसाठी एक मार्ग ठेवण्यात आला आहे.

ऐन एप्रिल, मे महिन्यातील सुट्टीचे दिवस व मुरूड तालुक्यातील पर्यटनाचे आकर्षण यामुळे साळाव पुलावरून वाहतुकीत वाढ झाली आहे. परंतु, पूल दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीस अडथळे येत असून, अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शिवाय, पुलावरील रस्ता खोदण्यात आल्याने रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता आहे. याबाबत शिवसेनेचे मुरूड उपतालुकाप्रमुख भगीरथ पाटील यांनी सार्वजजिक बांधकाम विभागास दुरुस्ती कामाच्या विलंबाबाबत विचारणा केली. मात्र, तरीही काम संथगतीने सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :Raigadरायगड