शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
2
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
3
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
5
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
6
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
7
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
8
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
9
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
10
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

रायगडला पुन्हा ‘अवकाळी’ पावसाचा फटका; आंबापीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 1:03 AM

बळीराजा आर्थिक संकटात; डिसेंबर महिन्यात थंडीच्या दिवसांत पाऊस!

n  लोकमत न्यूज नेटवर्कतळा : दोन दिवसांपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने सोमवारी जोरदार आगमन केले. सकाळपासूनच तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. २०२० हे वर्ष आणखी काय काय दाखविणार आहे सांगता येत नाही. कोरोना महामारी, लॉकडाऊन, निसर्ग चक्रीवादळ, जागतिक आर्थिक मंदी आणि आता डिसेंबर महिन्यात थंडीच्या दिवसांत पाऊस.सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून नऊ-दहा वाजेपर्यंत पावसाने जोरदार बरसने सुरू केल्याने रब्बी हंगामातील कडधान्ये, वाल, मूग, मटकी, हरभरा, भाजीपाला, कलिंगड, आंबा, चिकू बागादेखील धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामधून आर्थिक हातभार लागेल या आशेवर बळीराजा होता. मात्र, आता या लहरी हवामान व अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गुरांसाठी (वैरणी) शेतात साठवून ठेवलेले गवत, पेंढ्याचे माच संपूर्ण भिजून ओलेचिंब झाले आहेत. गुरांना खायला काय? घालायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे बाजारात आलेले नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांसह शालेय विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली.   हवामानामुळे आरोग्य धोक्यात येईल की काय? अशी भीती आता नागरिकांना वाटू लागली आहे. रस्त्यावरील खड्डे पाण्यांनी भरल्याने डबकी तयार झाली त्याचा वाहनचालकांना प्रवास करताना त्रास जाणवत होता. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी एमआयडीसी परिसरात सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून मुसळधार पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. डिसेंबर महिन्यात छत्री रेनकोटचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे अवेळी पाऊस पडत आहे.पडणाऱ्या पावसाने कडधान्याचे पीक धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातून कडधान्याची पिकेही जातील, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे . अवकाळी पावसामुळे  पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.