शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

रायगडला पुन्हा ‘अवकाळी’ पावसाचा फटका; आंबापीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:03 IST

बळीराजा आर्थिक संकटात; डिसेंबर महिन्यात थंडीच्या दिवसांत पाऊस!

n  लोकमत न्यूज नेटवर्कतळा : दोन दिवसांपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने सोमवारी जोरदार आगमन केले. सकाळपासूनच तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. २०२० हे वर्ष आणखी काय काय दाखविणार आहे सांगता येत नाही. कोरोना महामारी, लॉकडाऊन, निसर्ग चक्रीवादळ, जागतिक आर्थिक मंदी आणि आता डिसेंबर महिन्यात थंडीच्या दिवसांत पाऊस.सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून नऊ-दहा वाजेपर्यंत पावसाने जोरदार बरसने सुरू केल्याने रब्बी हंगामातील कडधान्ये, वाल, मूग, मटकी, हरभरा, भाजीपाला, कलिंगड, आंबा, चिकू बागादेखील धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामधून आर्थिक हातभार लागेल या आशेवर बळीराजा होता. मात्र, आता या लहरी हवामान व अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गुरांसाठी (वैरणी) शेतात साठवून ठेवलेले गवत, पेंढ्याचे माच संपूर्ण भिजून ओलेचिंब झाले आहेत. गुरांना खायला काय? घालायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे बाजारात आलेले नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांसह शालेय विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली.   हवामानामुळे आरोग्य धोक्यात येईल की काय? अशी भीती आता नागरिकांना वाटू लागली आहे. रस्त्यावरील खड्डे पाण्यांनी भरल्याने डबकी तयार झाली त्याचा वाहनचालकांना प्रवास करताना त्रास जाणवत होता. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी एमआयडीसी परिसरात सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून मुसळधार पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. डिसेंबर महिन्यात छत्री रेनकोटचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे अवेळी पाऊस पडत आहे.पडणाऱ्या पावसाने कडधान्याचे पीक धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातून कडधान्याची पिकेही जातील, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे . अवकाळी पावसामुळे  पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.