शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रावढळ पूल धोकादायक स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:48 IST

ज्या तालुक्यात सावित्री पूल दुर्घटना घडली, त्याच महाड तालुक्यात आजही दुरवस्था झालेल्या पुलांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

सिकंदर अनवारे ।दासगाव : ज्या तालुक्यात सावित्री पूल दुर्घटना घडली, त्याच महाड तालुक्यात आजही दुरवस्था झालेल्या पुलांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धोकादायक पुलांची यादी आ. भरत गोगावले यांनी यापूर्वीच दिली आहे. याच यादीतील नागेश्वरी नदीवरील रावढळ पूल शेवटच्या घटका मोजत आहे. चबुतरा, रस्त्याचा स्लॅब ढासळण्याच्या स्थितीत असतानाही पुलावरून छोटी-मोठी प्रवासी वाहने आणि मालवाहतूक केली जात आहे. धोकादायक पुलांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे दुसरी एखादी पूल दुर्घटना घडण्याची वाट शासन पाहत आहेत का? असा प्रश्न प्रवासी आणि नागरिकांकडून उपस्थित के ला जात आहे.गतवर्षी मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पूल दुर्घटनेने प्रशासन आणि सर्व सामान्य जनता हादरली. वाहून गेलेल्या गाड्या, मृत प्रवासी आणि जनतेच्या तीव्र भावना याचा विचार करत सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी सावित्री पूल पुनर्बांधणीची घोषणा केली आणि ती घोषणा पूर्ण झाली. सावित्री पूल दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले, तर इतर पुलांच्या दुरुस्तीकडे शासन दुर्लक्ष करीत आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. सावित्री दुर्घटनेप्रमाणे दुसरी एखादी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन बघत आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या आणि संभाव्य धोकादायक पुलावर बांधकाम विभागाने हॅलोजन लाइट लावली आहे. हा केविलवाणा प्रयोग करीत असताना, या हॅलोजन लाइटमुळे पुलाची दुर्घटना थांबणार आहे की प्रवाशांना जीव वाचणार आहे, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.महाड तालुक्यातून वाहणाºया नद्यांवरील अनेक पूल धोकादायक स्थितीत आहेत. त्यामध्ये आकले, लाडवली, टोल, रावढळ आदी पुलांचा समावेश होतो. सावित्री पूल दुर्घटनेच्या वेळी महाडचे आ. भरत गोगावले यांनी नूतनीकरणासाठी या पुलाची यादी नितीन गडकरी यांना दिली होती. सावित्री पुलाचे काम पूर्ण झाले असले, तरी सध्या संभाव्य धोकादायक या जुन्या पुलांबाबत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. खाडीपट्ट्यातील नागरिकांनी, रिक्षा संघटनेने या पुलाच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी मागणी केली आहे. पुलाच्या धोकादायक स्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, याची कोणतीच गंभीर दखल आजपर्यंत शासनाने घेतलेली नाही. सावित्री पूल पडल्यानंतर ज्याप्रमाणे नवीन पूल उभा राहिला, त्याचप्रमाणे शासन हा पूल देखील पडण्याची वाट पाहत आहे का? असा वास्तववादी प्रश्न खाडीपट्ट्यातील नागरिक करीत आहेत.