शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

रावढळ पूल धोकादायक स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:48 IST

ज्या तालुक्यात सावित्री पूल दुर्घटना घडली, त्याच महाड तालुक्यात आजही दुरवस्था झालेल्या पुलांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

सिकंदर अनवारे ।दासगाव : ज्या तालुक्यात सावित्री पूल दुर्घटना घडली, त्याच महाड तालुक्यात आजही दुरवस्था झालेल्या पुलांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धोकादायक पुलांची यादी आ. भरत गोगावले यांनी यापूर्वीच दिली आहे. याच यादीतील नागेश्वरी नदीवरील रावढळ पूल शेवटच्या घटका मोजत आहे. चबुतरा, रस्त्याचा स्लॅब ढासळण्याच्या स्थितीत असतानाही पुलावरून छोटी-मोठी प्रवासी वाहने आणि मालवाहतूक केली जात आहे. धोकादायक पुलांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे दुसरी एखादी पूल दुर्घटना घडण्याची वाट शासन पाहत आहेत का? असा प्रश्न प्रवासी आणि नागरिकांकडून उपस्थित के ला जात आहे.गतवर्षी मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पूल दुर्घटनेने प्रशासन आणि सर्व सामान्य जनता हादरली. वाहून गेलेल्या गाड्या, मृत प्रवासी आणि जनतेच्या तीव्र भावना याचा विचार करत सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी सावित्री पूल पुनर्बांधणीची घोषणा केली आणि ती घोषणा पूर्ण झाली. सावित्री पूल दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले, तर इतर पुलांच्या दुरुस्तीकडे शासन दुर्लक्ष करीत आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. सावित्री दुर्घटनेप्रमाणे दुसरी एखादी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन बघत आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या आणि संभाव्य धोकादायक पुलावर बांधकाम विभागाने हॅलोजन लाइट लावली आहे. हा केविलवाणा प्रयोग करीत असताना, या हॅलोजन लाइटमुळे पुलाची दुर्घटना थांबणार आहे की प्रवाशांना जीव वाचणार आहे, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.महाड तालुक्यातून वाहणाºया नद्यांवरील अनेक पूल धोकादायक स्थितीत आहेत. त्यामध्ये आकले, लाडवली, टोल, रावढळ आदी पुलांचा समावेश होतो. सावित्री पूल दुर्घटनेच्या वेळी महाडचे आ. भरत गोगावले यांनी नूतनीकरणासाठी या पुलाची यादी नितीन गडकरी यांना दिली होती. सावित्री पुलाचे काम पूर्ण झाले असले, तरी सध्या संभाव्य धोकादायक या जुन्या पुलांबाबत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. खाडीपट्ट्यातील नागरिकांनी, रिक्षा संघटनेने या पुलाच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी मागणी केली आहे. पुलाच्या धोकादायक स्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, याची कोणतीच गंभीर दखल आजपर्यंत शासनाने घेतलेली नाही. सावित्री पूल पडल्यानंतर ज्याप्रमाणे नवीन पूल उभा राहिला, त्याचप्रमाणे शासन हा पूल देखील पडण्याची वाट पाहत आहे का? असा वास्तववादी प्रश्न खाडीपट्ट्यातील नागरिक करीत आहेत.