शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

आधार कार्डसाठी नागरिकांच्या रांगा कायम; शासनाच्या डिजिटल सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 23:41 IST

ग्रामीण भागातील ई-सेवा केंद्र, संग्राम केंद्र बंदच

दासगाव : विविध दाखले आणि शासकीय लाभासाठी लागणाऱ्या आधार कार्डसाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील ई सेवा केंद्र, संग्राम केंद्र कुचकामी ठरले तर मुबलक आधार केंद्रांमुळे नागरिकांना रांगाच रांगा लावाव्या लागत आहेत. आधार कार्ड लवकर मिळावे म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना पहाटेच शहरात येऊन आधारसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे.

विविध शासकीय दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड गरजेचे आहे. नागरिक ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्त्वपूर्ण असल्याने गेल्या काही वर्षांपासून आधार कार्ड काढणे बंधनकारक झाले आहे. सुरुवातीस नागरिकांनी काढलेल्या आधार कार्डमध्ये अनेक चुका झाल्या आहेत. यामध्ये स्पेलिंग दुरुस्ती, जन्मतारीख बदल, सदोष छायाचित्रामुळे अनेक नागरिकांना शासकीय दाखले मिळण्यात आणि शासकीय योजनांचा लाभ घेताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अशा दुरुस्तीसाठी आता गर्दी वाढू लागली आहे. त्यातच प्रत्येक विद्यार्थी, बालक यांनादेखील शालेय पोषण आहार, शिष्यवृत्तीकरिता आधार महत्त्वाचे आहे. विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनादेखील आधारसाठी धावपळ करावी लागत आहे.

महाड तालुक्यात केंद्र शासनाच्या भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने महाडमध्ये बँक ऑफ इंडिया, महाड पोस्ट कार्यालय, महाड नगरपालिका आणि अन्य एक खाजगी अशी फक्त चार केंद्रे अस्तित्वात आहेत. यातील पोस्ट कार्यालयात ठरावीक दिवशीच आधारबाबत काम केले जाते. बँक ऑफ इंडिया या ठिकाणीदेखील अर्ज मिळत नसल्याने नागरिकांना धावपळ करावी लागते. यामुळे महाड नगरपालिकेच्या आधार केंद्रावर नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. या ठिकाणी संपूर्ण महाड तालुक्यातून नागरिक आधारसाठी येत असल्याने अनेकांना वेळ आणि इंटरनेटच्या खंडित सुविधेमुळे अनेक वेळा परत जावे लागते. तर अनेकांना परत जावे लागू नये म्हणून पहाटे चार वाजता रांगेत उभे राहावे लागत आहे. 

महाड तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महाऑनलाइन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ई सेवा केंद्रांची संख्या जवळपास ६० आहे. मात्र, ई सेवा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणा केला तरी प्रशासकीय पातळीवर कामे होत नसल्याचे समोर आल्याने अनेक जण एजंटचा आधार घेतात. महाड तालुक्यात केंद्र शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटने जोडण्यासाठी दूरसंचार विभागाकडून जोडणी करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात दूरध्वनी सेवा ठप्प आहे तर अनेक गावांत आजही मोबाइल सेवा मिळत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयात बसविण्यात आलेली इंटरनेट यंत्रणा धूळखात पडून आहे. यामुळे या ठिकाणी सुरू करण्यात आलेले संग्राम केंद्रदेखील ठप्प आहे. ग्रामीण भागात आधारसह अन्य दाखले गावातच मिळावेत म्हणून संग्राम केंद्र आणि ई सेवा केंद्र सुरू झाले खरे मात्र हा उद्देश अद्याप साध्य झालेला नाही.

टॅग्स :digitalडिजिटलAdhar Cardआधार कार्ड